शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

Budget 2025: अर्थसंकल्पात 'GYAN' वर फोकस, शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री धनधान्य योजनेची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 11:42 IST

कृषी क्षेत्रात गुंतवणूक वाढवून शेतकऱ्यांचं सरासरी उत्पन्न वाढवण्यावर लक्ष दिले जाईल असंही निर्मला सीतारामन यांनी सांगितले.

नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात GYAN म्हणजेच गरीब, युवा, अन्नदाता आणि नारी शक्ती यावर सरकारने फोकस दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आम्ही अर्थव्यवस्थेला गती दिली आहे असं सांगत केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी 'प्रधानमंत्री धनधान्य योजना'घोषित केली. त्याशिवाय किसान क्रेडिट कार्डची मर्यादा ५ लाखापर्यंत वाढवण्यात आल्याचं अर्थमंत्र्‍यांनी सांगितले.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, देशातील शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री धनधान्य योजना लागू करणार आहोत. राज्य सरकारसोबत मिळून केंद्र ही योजना राबवेल. या योजनेचा १.७ कोटी शेतकऱ्यांना फायदा मिळणार आहे. फार्म ग्रोथ, ग्रामीण विकास, उत्पादन यावर आम्ही भर देत आहोत. देशातील १०० जिल्ह्यात धनधान्य योजना सुरू करणार आहोत. त्याशिवाय बिहारच्या लोकांचं उत्पन्न वाढवण्यासाठी मखाना बोर्डाची स्थापना केली जाईल. दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळणाऱ्या कर्जाची मर्यादा ३ लाखाहून ५ लाख इतकी करण्यात येईल असं त्यांनी सांगितले. 

तसेच फळ, भाज्या उत्पादन वाढीवर भर दिला जाणार आहे. राज्यांसोबत मिळून केंद्र सरकार धनधान्य योजना राबवू. आसाममध्ये नवीन यूरिया प्लॅंट उघडला जाईल. कृषी विकासावर भर देत ज्या जिल्ह्यात कमी उत्पादन असेल अशा १०० जिल्ह्यांवर पहिल्या टप्प्यात फोकस ठेवला जाईल. कृषी उत्पादन वाढवणे, सिंचन वाढीवर भर दिला जाईल, ग्रामीण भागात विकास, कृषी क्षेत्रात गुंतवणूक वाढवून शेतकऱ्यांचं सरासरी उत्पन्न वाढवण्यावर लक्ष दिले जाईल असंही निर्मला सीतारामन यांनी सांगितले. 

दरम्यान, पुढील ६ वर्ष मसूर, तूरसारख्या डाळींच्या उत्पादन वाढीवर लक्ष दिले जाईल. कापूस उत्पादन वाढवण्याचं पुढील ५ वर्षाचं मिशन असेल. त्यातून देशातील कापड उद्योग मजबूत होईल. भारतात फुटवेअर आणि लेदर क्षेत्राच्या मदतीसोबतच विना लेदरच्या फुटवेअरची योजना आणली जाईल. त्यातून २२ लाख रोजगार आणि ४ लाख कोटी व्यवसाय उबा राहिल. १.१ लाख कोटीहून अधिक यातून निर्यात केली जाईल. तसेच MSME सेक्टरचा विकास केला जाईल. सध्या १ कोटीहून अधिक MSME नोंदणी आहेत. त्यातून कोट्यवधी रोजगार निर्माण झालेत. भारत उत्पादन क्षेत्राचं हब बनतंय. आम्ही MSME सुक्ष्म उद्योजकांसाठी क्रेडिट गॅरंटी ५ कोटीवरून १० कोटीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतल्याचं अर्थमंत्र्‍यांनी सांगितले. 

टॅग्स :Budget 2025अर्थसंकल्प २०२५FarmerशेतकरीNirmala Sitaramanनिर्मला सीतारामन