शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

"अर्थमंत्री हसत आहेत..., कमाल आहे..."! संसदेत राहुल गांधींच्या कोणत्या विधानावर हसल्या निर्मला सीतारमन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 16:16 IST

निर्मला सितारान यांच्याकडे बोट दाखवत राहुल गांधी म्हणाले, "अर्थमंत्री हसत आहेत. कमाल आहे. ही काही हसण्याची गोष्ट नाही, मॅडम."

काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी (29 जुलै 2024) लोकसभेत अर्थसंकल्पावर भाषण केले. यावेळी राहुल यांनी अर्थसंकल्पावरून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आणि दलित, मागास आणि गरीब वर्गाचा मुद्दा उपस्थित करत अर्थसंकल्पात त्यांच्यासाठी काहीही नसल्याचा दावा केला. बजेटला हल्वा संबोधत राहुल गांधी म्हणाले, 20 जणांनी बजेट तयार केले आहे, यात अल्पसंख्याक आणि मागास समाजाचे केवळ दोनच लोक होते.

भाषण सुरू असतानाच राहुल गांधी अर्थमंत्री निर्मला सीतारन यांच्याकडे बोट दाखवत म्हणाले, "आपण हसत आहात, पण ही हसण्यासारखी गोष्ट नाही. राहुल म्हणाले, 20 अधिकाऱ्यांनी भारताचा अर्थसंकल्प तयार केला आहे. म्हणजेच अर्थसंकल्पाचा हल्वा वाटण्याचे काम 20 जणांनी केले आहे. आता सभापती महोदय, त्या 20 लोकांमध्ये 90 टक्के लोकांपैकी केवळ दोनच आहेत. एक अल्पसंख्यक, एक ओबीसी आणि या फोटोत एकही नाही. 'तुम्ही फोटोकडे पाठ फिरवली. त्याला फोटोमध्ये दिसण्याचीही परवानगी नव्हती. 'फोटोमध्ये आपण मागे केले. फोटोमद्ये तर येऊच दिले नाही." 

यावेळी, राहुल गांधी यांनी संसदेत फोटो दाखवण्याचा प्रयत्न केला, मात्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्यांना रोखले आणि संसदेत असे फोटो दाखवण्याची परवानगी नसल्याचे सांगितले. राहुल गांधी म्हणाले, "मला वाटत होते की, अर्थसंकल्पात जात जनगणनेच्या मुद्द्यावर चर्चा होईल. जे संपूर्ण देशाला हवे आहे. 95 टक्के लोकांना जात जनगणना हवी आहे. दलित, आदिवासी, मागास, गरीब सामान्य जाती आणि अल्पसंख्यक, या सर्वांनाच जात जनगणना हवी आहे. कारण प्रत्येकाला आपला सहभाग काय आहे आणि वाटा काय आहे? हे जाणून घ्यायचे आहे. पण सर, मी बघत आहे की, सरकार हलव्याचे वाटप करत आहे आणि तो वाटणारे केवळ 2-3% लोक असतात आणि वाटतात कुणाला तर ते केवळ 2-3% लोक."

यावेळी, निर्मला सितारान यांच्याकडे बोट दाखवत राहुल गांधी म्हणाले, "अर्थमंत्री हसत आहेत. कमाल आहे. ही काही हसण्याची गोष्ट नाही, मॅडम. ही काही हसण्याची गोष्ट नाही. ही जात जनगणना आहे. यामुळे देश बदलेल." एवढेच नाही तर, "महोदय, पद्मव्यूह किंवा चक्रव्यूहच्या लोकांना वाटते की देशातील मागासलेले लोक अभिमन्यू आहेत. देशातील मागासलेले लोक अभिमन्यू नसून अर्जुन आहेत. ते तुमचे हे चक्रव्यूह तोडून टाकतील आणि I.N.D.I.A. आघाडीने पहिले पाऊल टाकले आहे," असेही राहुल म्हणाले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनlok sabhaलोकसभाcongressकाँग्रेसBJPभाजपा