शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
3
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
4
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
5
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
6
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
7
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
8
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
9
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
10
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
11
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
12
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
13
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
14
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
15
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
16
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
17
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
18
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
19
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
20
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा

"अर्थमंत्री हसत आहेत..., कमाल आहे..."! संसदेत राहुल गांधींच्या कोणत्या विधानावर हसल्या निर्मला सीतारमन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 16:16 IST

निर्मला सितारान यांच्याकडे बोट दाखवत राहुल गांधी म्हणाले, "अर्थमंत्री हसत आहेत. कमाल आहे. ही काही हसण्याची गोष्ट नाही, मॅडम."

काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी (29 जुलै 2024) लोकसभेत अर्थसंकल्पावर भाषण केले. यावेळी राहुल यांनी अर्थसंकल्पावरून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आणि दलित, मागास आणि गरीब वर्गाचा मुद्दा उपस्थित करत अर्थसंकल्पात त्यांच्यासाठी काहीही नसल्याचा दावा केला. बजेटला हल्वा संबोधत राहुल गांधी म्हणाले, 20 जणांनी बजेट तयार केले आहे, यात अल्पसंख्याक आणि मागास समाजाचे केवळ दोनच लोक होते.

भाषण सुरू असतानाच राहुल गांधी अर्थमंत्री निर्मला सीतारन यांच्याकडे बोट दाखवत म्हणाले, "आपण हसत आहात, पण ही हसण्यासारखी गोष्ट नाही. राहुल म्हणाले, 20 अधिकाऱ्यांनी भारताचा अर्थसंकल्प तयार केला आहे. म्हणजेच अर्थसंकल्पाचा हल्वा वाटण्याचे काम 20 जणांनी केले आहे. आता सभापती महोदय, त्या 20 लोकांमध्ये 90 टक्के लोकांपैकी केवळ दोनच आहेत. एक अल्पसंख्यक, एक ओबीसी आणि या फोटोत एकही नाही. 'तुम्ही फोटोकडे पाठ फिरवली. त्याला फोटोमध्ये दिसण्याचीही परवानगी नव्हती. 'फोटोमध्ये आपण मागे केले. फोटोमद्ये तर येऊच दिले नाही." 

यावेळी, राहुल गांधी यांनी संसदेत फोटो दाखवण्याचा प्रयत्न केला, मात्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्यांना रोखले आणि संसदेत असे फोटो दाखवण्याची परवानगी नसल्याचे सांगितले. राहुल गांधी म्हणाले, "मला वाटत होते की, अर्थसंकल्पात जात जनगणनेच्या मुद्द्यावर चर्चा होईल. जे संपूर्ण देशाला हवे आहे. 95 टक्के लोकांना जात जनगणना हवी आहे. दलित, आदिवासी, मागास, गरीब सामान्य जाती आणि अल्पसंख्यक, या सर्वांनाच जात जनगणना हवी आहे. कारण प्रत्येकाला आपला सहभाग काय आहे आणि वाटा काय आहे? हे जाणून घ्यायचे आहे. पण सर, मी बघत आहे की, सरकार हलव्याचे वाटप करत आहे आणि तो वाटणारे केवळ 2-3% लोक असतात आणि वाटतात कुणाला तर ते केवळ 2-3% लोक."

यावेळी, निर्मला सितारान यांच्याकडे बोट दाखवत राहुल गांधी म्हणाले, "अर्थमंत्री हसत आहेत. कमाल आहे. ही काही हसण्याची गोष्ट नाही, मॅडम. ही काही हसण्याची गोष्ट नाही. ही जात जनगणना आहे. यामुळे देश बदलेल." एवढेच नाही तर, "महोदय, पद्मव्यूह किंवा चक्रव्यूहच्या लोकांना वाटते की देशातील मागासलेले लोक अभिमन्यू आहेत. देशातील मागासलेले लोक अभिमन्यू नसून अर्जुन आहेत. ते तुमचे हे चक्रव्यूह तोडून टाकतील आणि I.N.D.I.A. आघाडीने पहिले पाऊल टाकले आहे," असेही राहुल म्हणाले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनlok sabhaलोकसभाcongressकाँग्रेसBJPभाजपा