शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

"अर्थमंत्री हसत आहेत..., कमाल आहे..."! संसदेत राहुल गांधींच्या कोणत्या विधानावर हसल्या निर्मला सीतारमन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 16:16 IST

निर्मला सितारान यांच्याकडे बोट दाखवत राहुल गांधी म्हणाले, "अर्थमंत्री हसत आहेत. कमाल आहे. ही काही हसण्याची गोष्ट नाही, मॅडम."

काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी (29 जुलै 2024) लोकसभेत अर्थसंकल्पावर भाषण केले. यावेळी राहुल यांनी अर्थसंकल्पावरून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आणि दलित, मागास आणि गरीब वर्गाचा मुद्दा उपस्थित करत अर्थसंकल्पात त्यांच्यासाठी काहीही नसल्याचा दावा केला. बजेटला हल्वा संबोधत राहुल गांधी म्हणाले, 20 जणांनी बजेट तयार केले आहे, यात अल्पसंख्याक आणि मागास समाजाचे केवळ दोनच लोक होते.

भाषण सुरू असतानाच राहुल गांधी अर्थमंत्री निर्मला सीतारन यांच्याकडे बोट दाखवत म्हणाले, "आपण हसत आहात, पण ही हसण्यासारखी गोष्ट नाही. राहुल म्हणाले, 20 अधिकाऱ्यांनी भारताचा अर्थसंकल्प तयार केला आहे. म्हणजेच अर्थसंकल्पाचा हल्वा वाटण्याचे काम 20 जणांनी केले आहे. आता सभापती महोदय, त्या 20 लोकांमध्ये 90 टक्के लोकांपैकी केवळ दोनच आहेत. एक अल्पसंख्यक, एक ओबीसी आणि या फोटोत एकही नाही. 'तुम्ही फोटोकडे पाठ फिरवली. त्याला फोटोमध्ये दिसण्याचीही परवानगी नव्हती. 'फोटोमध्ये आपण मागे केले. फोटोमद्ये तर येऊच दिले नाही." 

यावेळी, राहुल गांधी यांनी संसदेत फोटो दाखवण्याचा प्रयत्न केला, मात्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्यांना रोखले आणि संसदेत असे फोटो दाखवण्याची परवानगी नसल्याचे सांगितले. राहुल गांधी म्हणाले, "मला वाटत होते की, अर्थसंकल्पात जात जनगणनेच्या मुद्द्यावर चर्चा होईल. जे संपूर्ण देशाला हवे आहे. 95 टक्के लोकांना जात जनगणना हवी आहे. दलित, आदिवासी, मागास, गरीब सामान्य जाती आणि अल्पसंख्यक, या सर्वांनाच जात जनगणना हवी आहे. कारण प्रत्येकाला आपला सहभाग काय आहे आणि वाटा काय आहे? हे जाणून घ्यायचे आहे. पण सर, मी बघत आहे की, सरकार हलव्याचे वाटप करत आहे आणि तो वाटणारे केवळ 2-3% लोक असतात आणि वाटतात कुणाला तर ते केवळ 2-3% लोक."

यावेळी, निर्मला सितारान यांच्याकडे बोट दाखवत राहुल गांधी म्हणाले, "अर्थमंत्री हसत आहेत. कमाल आहे. ही काही हसण्याची गोष्ट नाही, मॅडम. ही काही हसण्याची गोष्ट नाही. ही जात जनगणना आहे. यामुळे देश बदलेल." एवढेच नाही तर, "महोदय, पद्मव्यूह किंवा चक्रव्यूहच्या लोकांना वाटते की देशातील मागासलेले लोक अभिमन्यू आहेत. देशातील मागासलेले लोक अभिमन्यू नसून अर्जुन आहेत. ते तुमचे हे चक्रव्यूह तोडून टाकतील आणि I.N.D.I.A. आघाडीने पहिले पाऊल टाकले आहे," असेही राहुल म्हणाले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनlok sabhaलोकसभाcongressकाँग्रेसBJPभाजपा