शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

आजच्या बजेटचा भाजपला निवडणुकीत फायदा होणार की नुकसान? सर्व्हेच्या निष्कर्षानं केलं अवाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 20:38 IST

अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर त्यावर सत्ताधारी आणि विरोधकांकडून विविध स्वरुपाच्या प्रतिक्रिया येत आहेत. मात्र निवडणुकीच्या रणधुमाळीत सादर झालेल्या या अर्थसंकल्पाचा भाजपला फायदा होणार का? असा प्रश्न प्रत्येकालाच पडला आहे.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंडसह पाच राज्यांतील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. अर्थमंत्र्यांनी या अर्थसंकल्पाला अमृत काळातील पुढील 25 वर्षांची ब्लू प्रिंट असल्याचे म्हटले आहे. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर त्यावर सत्ताधारी आणि विरोधकांकडून विविध स्वरुपाच्या प्रतिक्रिया येत आहेत. मात्र निवडणुकीच्या रणधुमाळीत सादर झालेल्या या अर्थसंकल्पाचा भाजपला फायदा होणार का? असा प्रश्न प्रत्येकालाच पडला आहे.

एबीपी न्यूज सी व्होटरने हा सर्व्हे केला आहे. या माध्यमाने निवडणूक होणाऱ्या राज्यांतील जनतेच्या मनाचा कौल जाणण्याचा प्रयत्न केला जात आहे. या सर्वेक्षणात, आजच्या अर्थसंकल्पाचा भाजपला फायदा होणार का? असा प्रश्न लोकांना विचारण्यात आला. 

या प्रश्नावर उत्तर देताना 45 टक्के लोकांनी 'होय' या अर्थसंकल्पाचा भाजपला फायदा होईल, असे म्हटले आहे. तर 39 टक्के लोकांनी 'नाही' या अर्थसंकल्पाचा भाजपला फायदा होणार नाही, असे म्हटले आहे. तसेच, 16 टक्के लोकांनी माहीत नाही अथवा सांगता येत नाही, असे उत्तर दिले आहे.

आजच्या अर्थसंकल्पाचा भाजपला फायदा होणार?हो - 45नाही - 39माहीत नाही - 16

अर्थसंकल्पासंदर्भात काय म्हणतायत सत्ताधारी अणी विरोधक -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पासंदर्भात प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, या अर्थसंकल्पाचा महत्त्वाचा पैलू म्हणजे, गरिबांचे कल्याण आहे. प्रत्येक गरीबाला पक्के घर असावे, नळाला पाणी, शौचालय, गॅसची सुविधा या सर्व गोष्टींवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. याच बरोबर आधुनिक इंटरनेट कनेक्टिव्हिटीवरही तेवढाच भर देण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी यांनी हा अर्थसंकल्प पीपल फ्रेंडली आणि प्रोग्रेसिव्ह असल्याचे म्हटले आहे.

अर्थसंकल्पासंदर्भात राहुल गांधी म्हणाले, 2022-23 च्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात पगारदार वर्ग, मध्यमवर्गीय, गरीब, शेतकरी, तरुण आणि छोट्या व्यापाऱ्यांसाठी काहीही नाही. राहूल गांधी यांनी ट्विट केले की, 'मोदी सरकारच्या बजेटमध्ये काहीही नाही. मध्यमवर्गीय, पगारदार वर्ग, गरीब आणि वंचित वर्ग, तरुण, शेतकरी आणि एमएसएमईसाठी काहीही नाही.'

टॅग्स :Union Budgetकेंद्रीय अर्थसंकल्प 2019Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाElectionनिवडणूक