शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

budget 2021 : करसवलती की करभार? आज अर्थसंकल्प; अर्थव्यवस्थेला आर्थिक लसीची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2021 09:15 IST

budget 2021: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन ११ वाजता संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

नवी दिल्ली -  कोरोनामुळे खंक झालेल्या अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी रोजगारनिर्मितीला चालना देण्याबरोबरच सामान्यांना प्राप्तिकरात सवलती, ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ, आरोग्य क्षेत्राला उभारी, उद्योगांना भरघोस सवलती इत्यादींसाठी सर्वंकष तरतुदी करण्याची आवश्यकता भासणार असून आज, १ फेब्रुवारी रोजी सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडून याच अपेक्षा असतील.केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन ११ वाजता संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. कोरोनाच्या महासाथीने आपली गडद छाया अर्थव्यवस्थेवर सोडली आहे. टाळेबंदीने आक्रसलेला रोजगाराचा बाजार आर्थिक लसीच्या प्रतीक्षेत आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवसंजीवनीची अपेक्षा आहे. आरोग्य क्षेत्रही बूस्टरच्या अपेक्षेत आहे.  तर उद्योगांना सवलतींची आवश्यकता आहे. इंधनदर रोज नवे विक्रम स्थापित करत असल्याने महागाईने मेटाकुटीला आलेल्या जनतेला अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. 

निर्गुंतवणुकीतून २ लाख कोटी उभारण्याचे लक्ष्यसरकारी उपक्रमातील सार्वजनिक कंपन्यांमधून निर्गुंतवणूक करत त्यातून २ लाख कोटी रुपये महसूल उभारण्याचा सरकारचा मानस आहे. त्यातून मिळालेल्या पैशांतून पायाभूत सुविधांवर भर देऊन रोजगार निर्मितीला चालना दिली जाईल, असाही अंदाज अर्थतज्ज्ञांकडून वर्तवला जात आहे. शेती क्षेत्रालाही अपेक्षाशेतीविषयक कायद्यांना होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या अर्थसंकल्पात शेती क्षेत्रासाठी नेमकी किती तरतूद केली जाते, याकडे संपूर्ण देशाचेच लक्ष असेल.नवे रोजगार निर्माण करण्याची चिंता कोरोनापाठोपाठ आलेल्या टाळेबंदीमुळे अनेकांच्या रोजगारांवर संक्रांत आली आहे. लाखो कामगारांच्या वेतनात मोठी कपात करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत प्राप्तिकरात सवलती मिळतात किंवा कसे, याकडे करदात्यांचे लक्ष असेल. संरक्षणावरील खर्चातही वाढ?गेल्या आठ महिन्यांनापासून लडाख तसेच इतर सीमा भागांवर ठाण मांडून बसलेले चिनी लष्कर आणि पाकिस्तानचा वाढता उपद्रव, हे पाहता अर्थसंकल्पात संरक्षणावरही मोठी तरतूद असणे अपेक्षित आहे. 

तारेवरची कसरतएकूणच घटलेला महसूल, कोरोनाकहरामुळे बुडालेले रोजगार, आरोग्य क्षेत्रावर पडलेला ताण या सर्वांवर मात करण्यासाठी करसवलती द्यायच्या की, महसूल वाढीसाठी सामान्यांवर करभार वाढवायचा, याचा सांगोपांग विचार करून तशा पद्धतीचा अर्थसंकल्प देशापुढे सादर करण्याचे आव्हान अर्थमंत्री सीतारामन यांच्यापुढे आहे.

टॅग्स :budget 2021बजेट 2021Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनIndiaभारत