शहरं
Join us  
Trending Stories
1
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
2
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
3
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? UAE विरुद्ध खेळणार नसल्याची मोठी माहिती आली समोर
4
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
5
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
6
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
7
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
8
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...
9
उल्हासनगरात अनोख्या पद्धतीचा निषेध! रस्त्यांवरील खड्ड्यात मनसे पदाधिकाऱ्यानी केली आंघोळ
10
इतकी हिम्मत येते कुठून? शालार्थ घोटाळ्यामधील ५० पैकी ३३ शिक्षकांची सुनावणीलाच दांडी!
11
भयंकर! आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या टीमवर जीवघेणा हल्ला, अनेक जण जखमी
12
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
13
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
14
"बाप्पा तुम्ही खूप भाग्यवान, नांगरलं कुणी, पेरलं कुणी अन्..."; पंकजा मुंडेंचा खासदार बजरंग सोनवणेंना टोला
15
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
16
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?
17
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
18
टाटा-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये वाढ! सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टी वधारले, कुठे झाली घसरण?
19
World Athletics Championships 2025 : नीरज चोप्राची फायनलमध्ये धडक; इथंही IND vs PAK महामुकाबला?
20
२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र

Budget 2020: निषेधाच्या नावाखाली हिंसाचार; राष्ट्रपतींनीच एका वाक्यात टोचले कान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2020 12:04 IST

आम्ही शेकडो स्वातंत्र्यसैनिकांचे स्वप्न पूर्ण केले आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या लोकांना इतर देशांप्रमाणेच अधिकार दिले आहेत.

नवी दिल्ली - संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली असून पहिल्या दिवशी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहाला संबोधित केलं. निषेधाच्या नावाखाली होणारा हिंसाचार हा समाज आणि देशाला कमकुवत करतो अशी खंत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी यावेळी व्यक्त केली. 

यावेळी रामनाथ कोविंद म्हणाले की, गेल्या सात महिन्यांत माझ्या सरकारच्या कामगिरीमुळे संसदेने अनेक लोकोपयोगी योजना आणल्या. मुस्लिम महिलांना न्याय देणारे तिहेरी तलाक विधेयक, देशाला सशक्तीकरण करणारा ग्राहक कायदा, चिट फंड कायदा, मुलांवरील गुन्हेगारी रोखण्यासाठी शिक्षेचा कायदा बनविला गेला.

सध्या देशामध्ये नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसीच्या विरोधात आंदोलन उभं केलं जात आहे. काही ठिकाणी या आंदोलनाने हिंसक स्वरुपही घेतलं. भारत बंदच्या पार्श्वभूमीवर अनेक भागात दगडफेक करण्यात आली. इतकचं नव्हे तर दिल्लीत गुरुवारी सीएएविरोधात सुरु असणाऱ्या आंदोलनात एका आंदोलनकर्त्यावर गोळी झाडण्याचाही प्रकारही घडला. शाहीनबाग येथे गेल्या महिनाभरापासून मुस्लीम महिला रस्त्यावर ठिय्या आंदोलन करत आहेत. मागील काही महिन्यापासून देशात कलम ३७० रद्द करणे, राम मंदीर निर्णय, नागरिकत्व सुधारणा कायदा, एनआरसी या अनेक मुद्द्यावरुन विरोध प्रदर्शन, निषेध आंदोलनं सुरु आहेत. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलेलं विधान महत्त्वपूर्ण मानलं जात आहे.   

करतारपूर साहिब कॉरिडोर विक्रमी वेळेत बांधला आणि तो देशाला समर्पित केला. माझ्या सरकारच्या योजनांमुळे प्रत्येक धर्मातील गरीबांना सुविधा मिळाल्या आहेत असं ते म्हणाले. 

रामजन्मभूमीवरील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर देशवासीयांनी ज्या पद्धतीने परिपक्व वर्तन केले ते स्वागतार्ह आहे. लोकशाहीमध्ये चर्चा महत्त्वपूर्ण आहे, परंतु निषेधाच्या नावाखाली होणारी हिंसाचार समाजाला दुर्बल बनवतो. संपूर्ण देशाला देण्यात आलेल्या मूलभूत अधिकारांचा हक्क जम्मू-काश्मीरमधील लोकांना नाही का?

आम्ही शेकडो स्वातंत्र्यसैनिकांचे स्वप्न पूर्ण केले आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या लोकांना इतर देशांप्रमाणेच अधिकार दिले आहेत. 2018 च्या शेवटी जम्मू-काश्मीरमधील पंचायतांमध्ये शांततापूर्ण निवडणुका घेण्यात आल्या. तेथे ब्लॉक डेव्हलपमेंट कौन्सिलच्या निवडणुकाही घेण्यात आल्या. आता बर्‍याच योजनांमध्ये पारदर्शक पद्धतीने बरेच फायदे मिळतात असं सांगत राष्ट्रपतींनी कलम ३७० कायदा हटवण्याचं समर्थन केलं. 

त्याचसोबत महात्मा गांधी यांनी ईश्वरापेक्षा स्वच्छता महत्वाची आहे अशी शिकवण दिली. त्यामुळे गावे आणि शहरे अधिक स्वच्छ आणि सुव्यवस्थित बनविणे ही आमची जबाबदारी आहे. 'सबका साथ, विकास' याला अनुसरुनच माझ्या सरकारचं काम प्रामाणिकपणाने सुरु आहे. भारत हा पहिला देश आहे ज्यात हजची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल आणि ऑनलाइन केली गेली आहे.

आपल्या भाषणात राष्ट्रपतींनी अल्पसंख्याक समाजासाठी सरकारने घेतलेल्या पुढाकारांचा उल्लेख केला. सरकार अल्पसंख्याकांच्या सामाजिक आणि शैक्षणिक विकासासाठी कार्यरत आहे. मुस्लीम विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली गेली आहे असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सांगितले. 

 

टॅग्स :budget 2020बजेटParliamentसंसदNarendra Modiनरेंद्र मोदीRamnath Kovindरामनाथ कोविंदCentral Governmentकेंद्र सरकारArticle 370कलम 370Jammu Kashmirजम्मू-काश्मीर