शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
4
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
5
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
6
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
9
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
10
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
11
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
12
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
13
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
14
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
15
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
16
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
17
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
18
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
19
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
20
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी

Budget 2020: आयपीओसाठी एलआयसी पहिलीच सरकारी विमा कंपनी नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2020 3:00 PM

केंद्र सरकारने निधी जमविण्यासाठी सरकारी कंपन्या विकायला काढल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. यावेळी बीपीसीएल, एअर इंडिया विक्रीला काढल्यावरून हे आरोप करण्यात येत होते.

ठळक मुद्देआज सरकारने एलआयसीमधील सरकारची भागीदारी विकण्याची घोषणा केली.एलआयसी ही पहिलीच सरकारी विमा कंपनी नसून याआधी दोन कंपन्यांचे आयपीओ सरकारने आणले आहेत.एलआयसी सध्या इरडाच्या नियंत्रणाखाली येते.

मुंबई : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या एलआयसीबाबत आज सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामधून मोठी घोषणा करण्यात आली आहे. एलआयसीमधील आपली भागीदारी विकण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. तसेच आयडीबीआय बँकेमधील आपली भागीदारीसुद्धा सरकार विकणार आहे. मात्र, विमा क्षेत्रातील सरकारी कंपनीमधील भागीदारी विकण्यात येणारी एलआयसी ही पहिलीच कंपनी नाहीय. तर याआधी तीन वर्षांपूर्वी दोन सरकारी विमा कंपन्यांचे आयपीओ तयार करण्यात आलेले आहेत. 

केंद्र सरकारने निधी जमविण्यासाठी सरकारी कंपन्या विकायला काढल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. यावेळी बीपीसीएल, एअर इंडिया विक्रीला काढल्यावरून हे आरोप करण्यात येत होते. यानंतर बीएसएनएल, एलआयसी या मोठ्या सरकारी कंपन्यांचा नंबर असल्याचे म्हटले जात होते. आज सरकारने एलआयसीमधील सरकारची भागीदारी विकण्याची घोषणा केली.

एलआयसी ही पहिलीच सरकारी विमा कंपनी नसून याआधी दोन कंपन्यांचे आयपीओ सरकारने आणले आहेत. तीन वर्षांपूर्वी जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन आणि न्यू इंडिया अशुरन्सचे आयपीओ शेअर बाजारात नोंद करण्यात आले आहेत. एलआयसीच्या भागीदारी विक्रीचा फायदा सरकारला होणार असला तरीही त्यासाठी सरकारला कायद्यात बदल करावे लागणार आहेत. सरकारने नुकताच आयआरसीटीसीचा आयपीओ उभारला होता. मात्र, आयआरसीटीसी ही कमर्शिअल उद्देशाने स्थापन केलेली कंपनी होती. एलआयसीच्या बाबतीत तसे नाही. 

एलआयसी सध्या इरडाच्या नियंत्रणाखाली येते. मात्र, एलआयसी कायदा 1956 नुसार इरडाने दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त समभाग विकण्यासाठी एलआयसीला परवानगी नाही. एलआयसी कायद्याच्या सेक्शन 37 नुसार एलआयसी पॉलिसी धारकाच्या कुटुंबाला आर्थिक सुरक्षा मिळावी यासाठी सरकारने सर्व पॉलिसींना बोनससह ठराविक रक्कम द्यावी लागते. यामुळे या कायद्यानुसार एलआयसी आणखी समभाग विकू शकत नाही. हा कायदा बदलावा लागणार आहे.

सरकार एलआयसीमधील आपली भागीदारी विकणार, अर्थसंकल्पामधून मोठी घोषणा

मोदी सरकारचे 'उड्डाण'; देशभरात 100 विमानतळ कार्यरत करणार

नितीन गडकरींचे खाते सुस्साट; तब्बल 19 हजार किमींचे महामार्ग बांधणार

एलआयसीचा आयपीओ आल्यास....एलआयसीचा आयपीओ आल्यास त्याचा सर्वात मोठा फटका रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला बसण्याची शक्यता आहे. सध्या या कंपन्या शेअर बाजारात आघाडीवर आहेत. लोकांच्या एलआयसीवरील विश्वासामुळे हे होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. 

टॅग्स :budget 2020बजेटbudget did you knowबजेट माहितीBudget Sessionअर्थसंकल्पीय अधिवेशनLIC - Life Insurance CorporationएलआयसीNarendra Modiनरेंद्र मोदी