शहरं
Join us  
Trending Stories
1
नफ़रत नहीं, नौकरी चुनो! 'इंडिया'चे सरकार बनतंय; ३० लाख रिक्त सरकारी पदे भरणार : राहुल गांधी
2
"आमचे अणुबॉम्ब कायम सज्ज असतात"; रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची अमेरिकेला खुली धमकी
3
“उद्धव ठाकरेंचे मानसिक संतुलन बिघडले, मानसोपचार तज्ज्ञांची गरज”: देवेंद्र फडणवीस
4
शेअर बाजार कोसळला; सेन्सेक्स 1000 तर निफ्टी 350 अंकांनी घसरले, 7 लाख कोटी बुडाले
5
...मग काय अमित शाह येताहेत का इंडिया आघाडीत?, आम्ही त्यांना पंतप्रधान करतो : संजय राऊत
6
Amit Shah : Video - "तीन टप्प्यात भाजपाने किती जागा जिंकल्या?"; अमित शाह यांची 'भविष्यवाणी'
7
'प्रत्येक गोष्टीला कारण असतं', हास्यजत्रा सोडल्यानंतर गौरव मोरेने चाहत्यांच्या प्रश्नांना दिलं उत्तर
8
"डबल इंजिन सरकारने शेतकरी, मजुरांना डबल झटका दिला; भाजपा संविधानाशी खेळतेय"
9
“बोरिवलीपासून कोकण रेल्वेला जोडणारी वाहतूकसेवा लवकरच सुरु करणार”: पीयूष गोयल 
10
जलेबी बाबाचा तुरूंगात मृत्यू! मादक पदार्थ देऊन महिलांवर करायचा बलात्कार, अनेकांना फसवले
11
"हो, कपिल शर्मा शोची कॉपी केली", 'चला हवा येऊ द्या'बाबत निलेश साबळेचं स्पष्ट वक्तव्य
12
Success Story: Google चे सीईओ सुंदर पिचाईंची क्लासमेट, IIT च्या 'त्या' बॅचची एकमेव महिला; आता बनली 'या' कंपन्यांची बॉस
13
Tata Harrier आणि Safari वर 1.25 लाखांपर्यंत डिस्काउंट तर अनेक कारवर मोठ्या ऑफर्स
14
देशाला दुसऱ्या फाळणीकडे नेण्याच्या काँग्रेसच्या षडयंत्राला 'उबाठा'चीही मान्यता; भाजपाचा हल्लाबोल 
15
भारतामध्ये ६५ वर्षांत हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली, अहवालावरून खळबळ, भाजपा-कांग्रेसचे आरोप प्रत्यारोप   
16
WhatsApp कॉल आता आणखी सोपे होणार! नवीन फीचर कॉल मॅनेजमेंटला सुपरफास्ट बनवणार
17
अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ! दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडी मोठं पाऊल उचलणार
18
अक्षय्य तृतीया: कर्माचे श्रेष्ठत्व सांगणारे, आद्य समाजसुधारक, संत महात्मा बसवेश्वरांची जयंती
19
IPL 2024: लखनौच्या फ्रँचायझीने पोलिसांचे १० कोटी रूपये थकवले; एका सामन्याची फी आहे...
20
१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी अमोल किर्तीकरांच्या प्रचारात?; Video व्हायरल

Budget 2019: व्याजसवलत दुप्पट, शेतकऱ्यांना साह्य, कामधेनू योजनेतून दिली भरघोस मदत!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2019 3:37 AM

१२ कोटी अल्पभूधारकांना लाभ; ७५,००० कोटी रुपयांची तरतूद

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारकडून आपल्या कार्यकाळातील शेवटचा अंतरिम अर्थसंकल्प शुक्रवारी लोकसभेत सादर करण्यात आला. या वेळी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी या अर्थसंकल्पात शेतकºयांसाठी पगार, व्याज सवलत दुप्पट आणि कामधेनू योजनेतून भरघोस मदत करण्याची घोषणा केली आहे.शेतकºयांचा विकास आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याची घोषणा सरकारने केली आहे. सातत्याने कष्ट करणाºया शेतकºयांना त्यांच्या निर्मितीचे संपूर्ण मूल्य मिळत नाही, त्यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याचे लक्ष्य सरकारपुढे आहे. इतिहासात प्रथमच शेतकºयांना ते पिकवित असलेल्या विविध २२ प्रकारच्या पिकांसाठी उत्पादनमूल्यापेक्षा ५0 टक्क्यांनी अधिक किमान आधारभूत रक्कम निश्चित करण्यात आली आहे.ग्रामीण अर्थकारणात शेती हा महत्त्वाचा भाग आहे. गेल्या साडेचार वर्षांत सरकारने राबविलेल्या विविध योजनांच्या आधारे शेतकºयांनी त्यांचे उत्पादन दुप्पट केले आहे, परंतु आंतरराष्ट्रीय बाजारात कृषिआधारित उत्पादनांच्या किमती कमी झाल्याने शेतकºयांचे उत्पन्न कमी झाले आहे. म्हणून बियाणे, श्ोतीउपयोगी अवजारे, मनुष्यबळ यासाठी सहकार्य करण्यासाठी, तसेच सावकाराच्या तावडीतून आणि कर्जबाजारी होण्यापासून वाचण्यासाठी यांचा समावेश आहे. अशा शेतकºयांसाठी विशेषत: अल्पभूधारक शेतकºयांसाठी सरकारने काही योजना आणल्या आहेत. या योजनेच्या माध्यमातून शेतकºयांना आणखी बळ देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीअल्पभूधारक शेतकºयांच्या उत्पन्नात वाढ होण्याच्या दृष्टीने सरकार पंतप्रधान श्ोतकरी सन्मान निधी अशी ऐतिहासिक योजना आणत आहे. या योजनेंतर्गत २ हेक्टर मर्यादा असलेल्या गरीब आणि अल्पभूधारक शेतकºयांच्या कुटुंबाना वार्षिक ६,000 रुपये दराने प्रत्यक्ष आर्थिक मदत देण्यात येणार आहे. प्रत्येकी २,000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांत ही मदत भारत सरकारतर्फे थेट शेतकºयांच्या खात्यात भरण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ जवळपास १२ कोटी अल्पभूधारक शेतकºयांना होणार आहे. विशेष म्हणजे, १ डिसेंबर, २0१८ पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात आली असून, ३१ मार्च, २0१९ पूर्वी या योजनेतील पहिला हप्ताही जमा होण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे. या योजनेसाठी सरकारने वार्षिक ७५,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. सरकार या योजनेची केवळ अंमलबजावणीच करणार नाही, तर पेरण्यांच्या हंगामावेळी आकस्मिक गरजांचीही पूर्तता करणार आहे. या योजनेसाठी २0१८-१९ या वर्षासाठी प्रस्तावित असलेल्या २0,000 कोटी रुपयांच्या तरतुदीत सुधारणा करत, सरकारने २0१९-२0 या वर्षासाठी ७५,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.प्रथमच उत्पादन खर्चाच्या ५० टक्के अधिक हमीभावइतिहासात प्रथमच शेतकºयांना ते पिकवित असलेल्या विविध २२ प्रकारच्या पिकांसाठी उत्पादनमूल्यापेक्षा ५0 टक्क्यांनी अधिक किमान आधारभूत रक्कम निश्चित केल्याने आता त्यांच्या निर्मितीचे संपूर्ण मूल्य त्यांना मिळू शकणार आहे. शेतकºयांचे उत्पन्न वाढणार आहे.

टॅग्स :Budget 2019अर्थसंकल्प 2019agricultureशेतीFarmerशेतकरी