शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

Budget 2019 : गरिबांना समर्पित असलेला अर्थसंकल्प - नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2019 16:20 IST

भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अंतरिम अर्थसंकल्पावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

ठळक मुद्देभाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अंतरिम अर्थसंकल्पावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. यंदाचा अर्थसंकल्प हा खऱ्या अर्थाने ऐतिहासिक असून गरीब, वंचित, कामगार, शेतकरी, मध्यमवर्गीय सर्वांनाच दिलासा देणारा ठरला आहे.आयकराचा ‘स्लॅब’ वाढविल्यामुळे मध्यम वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. 

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारकडून आपल्या कार्यकाळातील शेवटचा अंतरिम अर्थसंकल्प शुक्रवारी मांडण्यात आला. आगामी निवडणुकांच्या तोंडावर मोदी सरकारने घोषणांचा पाऊस पाडला. भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अंतरिम अर्थसंकल्पावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

'गरीब व वंचित जनतेला समर्पित असा हा अर्थसंकल्प आहे. शेतकऱ्यांना देखील ६ हजार रुपये प्रतिवर्षाला देण्याची घोषणा केल्याने एक मोठे पाठबळ मिळाले आहे. यंदाचा अर्थसंकल्प हा खऱ्या अर्थाने ऐतिहासिक असून गरीब, वंचित, कामगार, शेतकरी, मध्यमवर्गीय सर्वांनाच दिलासा देणारा ठरला आहे. देशातील मध्यमवर्ग विविध समस्यांचा सामना करत असतो. आयकराचा ‘स्लॅब’ वाढविल्यामुळे मध्यम वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे' असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. 

'उच्चमध्यमवर्गीय नागरिकांचेदेखील समाधान झाले आहे' 40 ते 50 कोटी लोकांना तर थेट फायदा होणार आहे. माझ्या खात्यालादेखील भरीव योगदान दिले आहे. देशातील राष्ट्रीय महामार्ग बांधकाम हे जगातील क्रमांक एकचे झाले आहे. नव्या भारताकडे आपण जात आहोत. सुखी, समृद्ध, अत्याधुनिक भारताकडे वेगाने प्रवास सुरू झाला आहे. नवीन भारताचा संकल्प या अर्थसंकल्पाद्वारे मांडण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने मांडलेल्या या अर्थसंकल्पाचे जनता समर्थन करेल. केवळ निवडणूकीच्या दृष्टीने या अर्थसंकल्पाकडे पाहणे योग्य ठरणार नसल्याचं गडकरींनी म्हटलं आहे. 

केंद्रीय अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे

  • असंघटित कामगारांसाठी मोदी सरकारची मोठी घोषणा, 21 हजार रुपये पगार असणाऱ्या असंघटित कामगारांना मासिक 3 हजार रुपये पेन्शन मिळणार, 10 कोटी कामगारांना याचा लाभ मिळणार 
  • 21 हजारपर्यंत पगार असलेल्या असंघटीत कामगारांना बोनस, कामगारांना 7 हजार रुपये बोनस देण्याची घोषणा.
  • पशू आणि मत्स्यपालनासाठी कर्जात 2 टक्क्यांची सवलत 
  • किसान सन्मान निधी योजनेसाठी 75 कोटी 
  • सरकार कामधेनू योजना सुरू करणार 
  • प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा देशातील 12 कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळणार 
  • दोन हेक्टरपर्यंत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला सहा हजार रुपये जमा होणार 
  • गरिबांना आम्ही आरक्षण दिलं, परंतु आरक्षण व्यवस्थेत कोणतीही छेडछाड केली नाही, आम्ही मनरेगासाठी आणखी निधी देऊ
  • यूपीए सरकारमुळे अर्थव्यवस्थेवरील बोजा वाढला
  • आज बँका कर्जवसुली करू शकत आहेत, जे लोक पैसे देत नव्हते, तेसुद्धा आता पैसे देत आहेत. बरेच जण कर्ज चुकवण्यासाठी पुढे सरसावले आहेत
  • एनपीए कमी करण्यावर आम्ही भर दिला, क्लीन बँकिंगच्या दिशेनं पाऊल टाकलं
टॅग्स :Budget 2019अर्थसंकल्प 2019Nitin Gadkariनितीन गडकरीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा