शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

Budget 2019 : गरिबांना समर्पित असलेला अर्थसंकल्प - नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2019 16:20 IST

भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अंतरिम अर्थसंकल्पावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

ठळक मुद्देभाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अंतरिम अर्थसंकल्पावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. यंदाचा अर्थसंकल्प हा खऱ्या अर्थाने ऐतिहासिक असून गरीब, वंचित, कामगार, शेतकरी, मध्यमवर्गीय सर्वांनाच दिलासा देणारा ठरला आहे.आयकराचा ‘स्लॅब’ वाढविल्यामुळे मध्यम वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. 

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारकडून आपल्या कार्यकाळातील शेवटचा अंतरिम अर्थसंकल्प शुक्रवारी मांडण्यात आला. आगामी निवडणुकांच्या तोंडावर मोदी सरकारने घोषणांचा पाऊस पाडला. भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अंतरिम अर्थसंकल्पावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

'गरीब व वंचित जनतेला समर्पित असा हा अर्थसंकल्प आहे. शेतकऱ्यांना देखील ६ हजार रुपये प्रतिवर्षाला देण्याची घोषणा केल्याने एक मोठे पाठबळ मिळाले आहे. यंदाचा अर्थसंकल्प हा खऱ्या अर्थाने ऐतिहासिक असून गरीब, वंचित, कामगार, शेतकरी, मध्यमवर्गीय सर्वांनाच दिलासा देणारा ठरला आहे. देशातील मध्यमवर्ग विविध समस्यांचा सामना करत असतो. आयकराचा ‘स्लॅब’ वाढविल्यामुळे मध्यम वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे' असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. 

'उच्चमध्यमवर्गीय नागरिकांचेदेखील समाधान झाले आहे' 40 ते 50 कोटी लोकांना तर थेट फायदा होणार आहे. माझ्या खात्यालादेखील भरीव योगदान दिले आहे. देशातील राष्ट्रीय महामार्ग बांधकाम हे जगातील क्रमांक एकचे झाले आहे. नव्या भारताकडे आपण जात आहोत. सुखी, समृद्ध, अत्याधुनिक भारताकडे वेगाने प्रवास सुरू झाला आहे. नवीन भारताचा संकल्प या अर्थसंकल्पाद्वारे मांडण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने मांडलेल्या या अर्थसंकल्पाचे जनता समर्थन करेल. केवळ निवडणूकीच्या दृष्टीने या अर्थसंकल्पाकडे पाहणे योग्य ठरणार नसल्याचं गडकरींनी म्हटलं आहे. 

केंद्रीय अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे

  • असंघटित कामगारांसाठी मोदी सरकारची मोठी घोषणा, 21 हजार रुपये पगार असणाऱ्या असंघटित कामगारांना मासिक 3 हजार रुपये पेन्शन मिळणार, 10 कोटी कामगारांना याचा लाभ मिळणार 
  • 21 हजारपर्यंत पगार असलेल्या असंघटीत कामगारांना बोनस, कामगारांना 7 हजार रुपये बोनस देण्याची घोषणा.
  • पशू आणि मत्स्यपालनासाठी कर्जात 2 टक्क्यांची सवलत 
  • किसान सन्मान निधी योजनेसाठी 75 कोटी 
  • सरकार कामधेनू योजना सुरू करणार 
  • प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा देशातील 12 कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळणार 
  • दोन हेक्टरपर्यंत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला सहा हजार रुपये जमा होणार 
  • गरिबांना आम्ही आरक्षण दिलं, परंतु आरक्षण व्यवस्थेत कोणतीही छेडछाड केली नाही, आम्ही मनरेगासाठी आणखी निधी देऊ
  • यूपीए सरकारमुळे अर्थव्यवस्थेवरील बोजा वाढला
  • आज बँका कर्जवसुली करू शकत आहेत, जे लोक पैसे देत नव्हते, तेसुद्धा आता पैसे देत आहेत. बरेच जण कर्ज चुकवण्यासाठी पुढे सरसावले आहेत
  • एनपीए कमी करण्यावर आम्ही भर दिला, क्लीन बँकिंगच्या दिशेनं पाऊल टाकलं
टॅग्स :Budget 2019अर्थसंकल्प 2019Nitin Gadkariनितीन गडकरीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा