शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

Budget 2018 : भारताला ‘आयुष्यमान’ कवच, ५० कोटींहून अधिक नागरिक आरोग्य विम्याच्या छत्राखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 04:22 IST

देशातील सुमारे निम्म्या लोकसंख्येला आरोग्य विम्याच्या छत्राखाली आणून भारतीय अर्थव्यवस्थेला ‘सामाजिक सुरक्षा व्यवस्थे’चे भक्कम कवच देण्याच्या दिशेने पहिले दमदार पाऊल टाकणा-या अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पाला ‘आयुष्यमान भारता’चे नवे प्रतिकवच बनवले आहे.

देशातील सुमारे निम्म्या लोकसंख्येला आरोग्य विम्याच्या छत्राखाली आणून भारतीय अर्थव्यवस्थेला ‘सामाजिक सुरक्षा व्यवस्थे’चे भक्कम कवच देण्याच्या दिशेने पहिले दमदार पाऊल टाकणाºया अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पाला ‘आयुष्यमान भारता’चे नवे प्रतिकवच बनवले आहे. या वर्षी प्रथमच अर्थसंकल्पात आरोग्य योजनेवर मोठ्या प्रमाणात भर देण्यात आला असून, ‘स्वस्थ भारत, समृद्ध भारत’च्या दिशेने जाण्यासाठी हे आवयक आहे, असे अरुण जेटली म्हणाले.देशातल्या १० कोटी गरीब कुटुंबांना दरवर्षी प्रति कुटुंब पाच लाख रुपयांच्या आरोग्यविम्याचे संरक्षण देऊ करणारी ही योजना जगातली सर्वांत मोठी आणि व्यापक सरकार पुरस्कृत आरोग्यविमा योजना असल्याचेही अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जाहीर केले.दहा कोटी कुटुंबातल्या किमान पन्नास कोटी नागरिकांना, म्हणजे सुमारे निम्म्या लोकसंख्येला आरोग्य विम्याचे संरक्षण देणाºया या योजनेसाठी सरकारच्या तिजोरीवर दोन ते अडीच लाख कोटी रुपयांचा भार पडेल, असेही ते म्हणाले.याखेरीज नागरिकांना घरपोच आरोग्यसेवा मिळाव्यात यासाठी देशात दीड लाख आरोग्य सुविधा केंद्रे स्थापन करण्याची योजनाही प्रस्तावित आहे. निमशहरी, ग्रामीण व दुर्गम भागांत अत्यावश्यक आरोग्य सेवा आणि सल्ला पोहोचविण्याचे काम ही केंद्रे करतील. त्यासाठी अर्थसंकल्पात बाराशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या केंद्रांमध्ये अत्यावश्यक औषधे मोफत मिळतील. शिवाय गरोदर स्त्रियांसाठी प्रसूती-साह्य, आरोग्य-तपासणी व सल्ला सुविधाही असतील. बड्या उद्योगांनी आपल्या सामाजिक उत्तरदायित्व निधीचा उपयोग करून ही केंद्रे दत्तक घ्यावीत आणि समाजसेवी संस्था व दानशूर व्यक्तींनीही त्यांच्या उभारणीत हातभार लावावा यासाठी सरकार प्रयत्न करेल, असे ते म्हणाले.‘आयुष्यमान भारत’ या महत्त्वाकांक्षी आरोग्य कार्यक्रमाला आवश्यक बळ मिळावे यासाठी देशात २४ नवी सरकारी वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. दर तीन लोकसभा मतदारसंघांमध्ये मिळून किमान एक सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि त्याला संलग्न असे सुसज्ज हॉस्पिटल असेल, या पद्धतीने हे नियोजन केले जाईल. सुसज्ज रुग्णालयांची ही साखळी उभारण्यासाठी सध्याच्या जिल्हा आरोग्य केंद्रांनाही नवसंजीवनी दिली जाणार आहे.आजारपणाचा सामना करताना मध्यमवर्गीय व गरीब कुटुंबांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहतो वा घरातील वस्तू विकण्याची वेळ येते. तसे होऊ नये याची काळजी ‘आयुष्यमान भारत’ अभियानातल्या या योजना उचलतील. या योजनांमधून लाखो रोजगारांची निर्मिती होईल आणि त्यातला मोठा वाटा स्त्रियांना मिळेल असा दावा त्यांनी केला.

 

टॅग्स :Budget 2018अर्थसंकल्प २०१८IndiaभारतHealthआरोग्य