शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

Budget 2018 : भारताला ‘आयुष्यमान’ कवच, ५० कोटींहून अधिक नागरिक आरोग्य विम्याच्या छत्राखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 04:22 IST

देशातील सुमारे निम्म्या लोकसंख्येला आरोग्य विम्याच्या छत्राखाली आणून भारतीय अर्थव्यवस्थेला ‘सामाजिक सुरक्षा व्यवस्थे’चे भक्कम कवच देण्याच्या दिशेने पहिले दमदार पाऊल टाकणा-या अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पाला ‘आयुष्यमान भारता’चे नवे प्रतिकवच बनवले आहे.

देशातील सुमारे निम्म्या लोकसंख्येला आरोग्य विम्याच्या छत्राखाली आणून भारतीय अर्थव्यवस्थेला ‘सामाजिक सुरक्षा व्यवस्थे’चे भक्कम कवच देण्याच्या दिशेने पहिले दमदार पाऊल टाकणाºया अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पाला ‘आयुष्यमान भारता’चे नवे प्रतिकवच बनवले आहे. या वर्षी प्रथमच अर्थसंकल्पात आरोग्य योजनेवर मोठ्या प्रमाणात भर देण्यात आला असून, ‘स्वस्थ भारत, समृद्ध भारत’च्या दिशेने जाण्यासाठी हे आवयक आहे, असे अरुण जेटली म्हणाले.देशातल्या १० कोटी गरीब कुटुंबांना दरवर्षी प्रति कुटुंब पाच लाख रुपयांच्या आरोग्यविम्याचे संरक्षण देऊ करणारी ही योजना जगातली सर्वांत मोठी आणि व्यापक सरकार पुरस्कृत आरोग्यविमा योजना असल्याचेही अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जाहीर केले.दहा कोटी कुटुंबातल्या किमान पन्नास कोटी नागरिकांना, म्हणजे सुमारे निम्म्या लोकसंख्येला आरोग्य विम्याचे संरक्षण देणाºया या योजनेसाठी सरकारच्या तिजोरीवर दोन ते अडीच लाख कोटी रुपयांचा भार पडेल, असेही ते म्हणाले.याखेरीज नागरिकांना घरपोच आरोग्यसेवा मिळाव्यात यासाठी देशात दीड लाख आरोग्य सुविधा केंद्रे स्थापन करण्याची योजनाही प्रस्तावित आहे. निमशहरी, ग्रामीण व दुर्गम भागांत अत्यावश्यक आरोग्य सेवा आणि सल्ला पोहोचविण्याचे काम ही केंद्रे करतील. त्यासाठी अर्थसंकल्पात बाराशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या केंद्रांमध्ये अत्यावश्यक औषधे मोफत मिळतील. शिवाय गरोदर स्त्रियांसाठी प्रसूती-साह्य, आरोग्य-तपासणी व सल्ला सुविधाही असतील. बड्या उद्योगांनी आपल्या सामाजिक उत्तरदायित्व निधीचा उपयोग करून ही केंद्रे दत्तक घ्यावीत आणि समाजसेवी संस्था व दानशूर व्यक्तींनीही त्यांच्या उभारणीत हातभार लावावा यासाठी सरकार प्रयत्न करेल, असे ते म्हणाले.‘आयुष्यमान भारत’ या महत्त्वाकांक्षी आरोग्य कार्यक्रमाला आवश्यक बळ मिळावे यासाठी देशात २४ नवी सरकारी वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. दर तीन लोकसभा मतदारसंघांमध्ये मिळून किमान एक सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि त्याला संलग्न असे सुसज्ज हॉस्पिटल असेल, या पद्धतीने हे नियोजन केले जाईल. सुसज्ज रुग्णालयांची ही साखळी उभारण्यासाठी सध्याच्या जिल्हा आरोग्य केंद्रांनाही नवसंजीवनी दिली जाणार आहे.आजारपणाचा सामना करताना मध्यमवर्गीय व गरीब कुटुंबांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहतो वा घरातील वस्तू विकण्याची वेळ येते. तसे होऊ नये याची काळजी ‘आयुष्यमान भारत’ अभियानातल्या या योजना उचलतील. या योजनांमधून लाखो रोजगारांची निर्मिती होईल आणि त्यातला मोठा वाटा स्त्रियांना मिळेल असा दावा त्यांनी केला.

 

टॅग्स :Budget 2018अर्थसंकल्प २०१८IndiaभारतHealthआरोग्य