शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
2
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
3
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
4
जिममध्ये जाणाऱ्यांनो सावधान! १९ वर्षीय विद्यार्थ्याचा प्रोटीन शेक प्यायल्याने मृत्यू; नेमकं काय घडलं?
5
IT Manager Gang Rape: हॉटेलमध्ये आले, दीड वाजेपर्यंत पार्टी आणि गुप्तांगावर जखमा; मॅनेजर सामूहिक बलात्कार प्रकरणाची Inside Story
6
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
7
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
8
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
9
VIDEO: डिटर्जंट, युरिया अन् रिफाईंड तेल; अंधेरीत नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांमध्ये भरलं भेसळयुक्त दूध, घरात सुरु होतं रॅकेट
10
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
11
दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की
12
PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली;शरद पवार गटाची काँग्रेस, उद्ववसेनेशी चर्चा सुरू
13
बॉक्सिंग डे कसोटीतील विजयासह इंग्लंडनं साधला मोठा डाव; ऑस्ट्रेलियाला धक्का देत टीम इंडियाशी बरोबरी
14
प्रेयसीच्या नादात हिमांशू भारद्वाजने आधी विकली स्वतःची किडनी, नंतर रॅकेटमध्ये झाला सामील
15
४० किलो स्फोटकांचा वापर आणि २०२३ पासून सुरू होती तयारी; लाल किल्ला स्फोट प्रकरणात खळबळजनक खुलासा!
16
Truecaller चा खेळ संपणार? TRAI च्या एका निर्णयामुळे २५ कोटी भारतीयांच्या फोनमधून 'हे' ॲप गायब होण्याची शक्यता!
17
शाकंभरी नवरात्र २०२५: पौषात रविवारपासून सुरु होतोय शाकंभरी नवरात्रोत्सव; काय आहे महत्त्व आणि कुलाचार?
18
महापालिका निवडणूक : "...तर ताकद दाखवावी लागेल", अमोल मिटकरींचा भाजपाला इशारा, जागांवरून काय फिस्कटले?
19
"यश त्याच्या डोक्यात गेलं आहे"; 'दृश्यम ३'च्या निर्मात्यांची अक्षय खन्नावर सडकून टीका, कायदेशीर नोटीस पाठवणार
20
एलपीजी ते बँकिंग आणि पॅन-आधार, १ जानेवारी २०२६ पासून काय काय बदलणार? थेट खिशावर होणार परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

मायावतींचा राजकीय डाव; आजपासून अयोध्येत बसपाचं ब्राह्मण सम्मेलन, ...म्हणून यूपीत महत्वाचं आहे 'हे' खास समिकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2021 09:37 IST

...तेव्हा मायावतींचे समिकरण अगदी फिट बसले होते आणि त्या सत्तेत आल्या होत्या. आता यावेळी त्या, दलित, ब्राह्मण आणि मुस्लीम समीकरण तयार करून सत्तेत येण्याच्या तयारीत

ठळक मुद्देदुपारी 1 वाजता अयोध्येतील तारा जी रिसॉर्टमध्ये या कार्यक्रमाला सुरुवात होईल. सायंकाळी सतीश चंद्र मिश्रा शरयू आरतीतही सहभागी होतील.बसपाच्या या ब्राह्मण सम्मेलनावरून वादही निर्माण झाला आहे.

लखनौ - उत्तर प्रदेशात पुढील वर्षात विधानसभा निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर मायावतींनी राजकीय खेळी खेळली आहे. उत्तर प्रदेशात जातीय समिकरण साधण्यासाठी आजपासून बसपा संपूर्ण राज्यात ब्राह्मण सम्मेलनाचे आयोजन करत आहे. विशेष म्हणजे रामाची नगरी असलेल्या अयोध्येतून ब्राह्मण सम्मेलनांची सुरुवात होत आहे. बसपा सरचिटणीस सतीश चंद्र मिश्रा यांच्याकडे याची जबाबदारी देण्यात आली आहे. अयोध्येनंतर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात, अशा प्रकारच्या सम्मेलनांचे आयोजन करण्यात येणार आहे. (BSP convention in ayodhya today ahead of assembly election in up)

दलित, ब्राह्मण आणि मुस्लीम समीकरण -दुपारी 1 वाजता अयोध्येतील तारा जी रिसॉर्टमध्ये या कार्यक्रमाला सुरुवात होईल. यानंतर सायंकाळी सतीश चंद्र मिश्रा शरयू आरतीतही सहभागी होतील. मायावतींनी 2007 मध्ये विधानसभा निवडणुकीत दलित आणि ब्राह्मण मतांवर लक्ष केंद्रित केले होते. तेव्हा मायावतींचे समिकरण अगदी फिट बसले होते आणि त्या सत्तेत आल्या होत्या. आता यावेळी त्या, दलित, ब्राह्मण आणि मुस्लीम समीकरण तयार करून सत्तेत येण्याच्या तयारीत आहेत.

या ठिकाणी पेच -बसपाच्या या ब्राह्मण सम्मेलनावरून वादही निर्माण झाला आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने उत्तर प्रदेशात राजकीय पक्षांच्या जातीय सम्मेलनांवर आणि रॅलींवर बंदी घातली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने 11 जुलै 2013 रोजी मोती लाल यादव यांनी दाखल केलेल्या पीआयएल क्रमांक 5889 वर सुनावणी करताना उत्तर प्रदेशात राजकीय पक्षांची जातीय आधारावरील सम्मेलने, रॅली आणि इतर कार्यक्रम आयोजित करण्यावर बंदी घातली होती. 

जस्टिस उमानाथ सिंह आणि जस्टिस महेंद्र दयाल यांच्या डिव्हिजन बेंचने निर्णय देताना म्हटले होते, की राजकीय पक्षांच्या जातीय सम्मेलनांमुळे समाजात मतभेद वाढतात आणि निष्पक्ष निवडणुकीलाही अडथळा निर्माण होतो. 

टॅग्स :mayawatiमायावतीUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliticsराजकारणElectionनिवडणूक