शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी मैदानात...
3
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
4
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
5
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
6
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
7
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
8
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
9
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
10
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
11
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
12
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
13
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
14
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
15
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
16
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
17
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
18
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
19
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
20
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 

बीएसएनएल विभागाचा भोंगळ कारभार

By admin | Published: August 23, 2015 8:40 PM

महान : स्थानिक महान येथे अनेक वर्षापासून भारत संचार निगम लिमिटेडचे मोठे टॉवर उभारलेले असून याच टॉवरच्या माध्यमातून महान येथील भारतीय स्टेट बँक, जिल्हा मध्यवर्ती बँकेसह दोन सेतू केंद्र व अन्य ग्राहकांना दूरसंचार सेवा मिळून त्यांचे कामकाज चालते. परंतु दीड महिन्यापासून बीएसएनएलची इंटरनेट सेवा व्यवस्थित मिळत नसल्याने याचा फटका दूरसंचारच्या ग्राहकांना व विशेषत: शेतकर्‍यांना बसत आहे. विद्युत पुरवठा बंद झाल्यावर महान येथील बीएसएनएलची नेट सेवा लगेच बंद पडते. वीजपुरवठा सुरू झाल्यावर २० मिनिटे झाल्यानंतरच इंटरनेटची सेवा सुरू होते.

महान : स्थानिक महान येथे अनेक वर्षापासून भारत संचार निगम लिमिटेडचे मोठे टॉवर उभारलेले असून याच टॉवरच्या माध्यमातून महान येथील भारतीय स्टेट बँक, जिल्हा मध्यवर्ती बँकेसह दोन सेतू केंद्र व अन्य ग्राहकांना दूरसंचार सेवा मिळून त्यांचे कामकाज चालते. परंतु दीड महिन्यापासून बीएसएनएलची इंटरनेट सेवा व्यवस्थित मिळत नसल्याने याचा फटका दूरसंचारच्या ग्राहकांना व विशेषत: शेतकर्‍यांना बसत आहे. विद्युत पुरवठा बंद झाल्यावर महान येथील बीएसएनएलची नेट सेवा लगेच बंद पडते. वीजपुरवठा सुरू झाल्यावर २० मिनिटे झाल्यानंतरच इंटरनेटची सेवा सुरू होते.
टॉवरस्थित बॅटरी व्यवस्िति नसल्यामुळे नेट सेवा लगेच सुरू करण्यासाठी अडथळा निर्माण होत असल्याचे सांगितले जाते. इंटरनेटची सुविधा व्यवस्थित मिळत नसल्याने बँकेत कनेक्टीव्हिटी मिळत नाही. त्या कारणाने बँक खातेदारांना ताटकळत बसून त्रास सहन करावा लागते. शेतीसंबंधित योजनांसाठी आवश्यक असणारा सातबारा, ८ (अ), उत्पन्नाचा दाखला व अन्य कागदपत्रे काढण्यासाठी इंटरनेट सुरू असणे अत्यंत आवश्यक असते. परंतु इंटरनेटच्या असुविधेमुळे शेतकर्‍यांनासुद्धा सेतू केंद्रात बसून इंटरनेट सुरू होण्याची प्रतीक्षा करावी लागते तर बीएसएनएल मोबाइलधारकांच्या मोबाइलमध्ये रेंज राहत नसल्यामुळे त्यांनादेखील त्रास सहन करावा लागतो. इंटरनेट सुविधेबात संबंधितांना विचारले असता त्यांचेकडून उडवाउडवीची उत्तरे मिळतात. महान हे बार्शीटाकळी तालुक्यातील जास्त लोकसंख्येचे मोठे गाव असून महान गावाला जोडलेली अनेक लहान-मोठी खेडी, गावे जोडली असल्याने शेतकर्‍यांना महत्त्वाची कागदपत्रे काढण्यासाठी महान येथे यावे लागते. परंतु बीएसएनएलच्या भोंगळ कारभारामुळे त्या शेतकर्‍यांना नाइलाजास्तव बार्शीटाकळीला जाऊन कागदपत्रे आणावी लागत आहेत.
***कोट***
महानस्थित टॉवरजवळ बॅटरीचे दोन सेट आहेत. त्यामधील एक सेट चालू आहे. या बॅटरीचा प्रयोग दोन वेळा केला आहे. परंतु, महान येथे सतत सहा तासापर्यंत वीज भारनियमन घेण्यात येत असल्यामुळे बॅटरीमधील सेल जळतात. म्हणून बॅटरी काम करत नाही. वीजप्रवाह खंडित होताच ऑपरेटर जनरेटर सुरू असतो. परंतु, चार दिवस रात्री ३.३० ते सकाळी ९.३० वाजेपर्यंत वीज भारनियमन असल्याने ऑपरेटर रात्रीच्यावेळी जनरेटर कसं सुरू करणार, हा प्रश्नच आहे. वीज भारनियमन सहा तासाऐवजी कमी तासाचे केल्यास ही समस्या मार्गी लागेल व मेन्टेनेसचे काम चालू होऊ शकते.
- एस. ए. वरांगे, तंत्रज्ञ बीएसएनएल, बार्शीटाकळी
(***पुढील मजकूर जोड १ वर***)