शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

सीमेवर वाढतेय मुस्लिमांची लोकसंख्या; BSF ने व्यक्त केली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2018 12:49 IST

राजस्थानमध्ये भारत-पाक सीमेवर असणाऱ्या जैसलमेर जिल्ह्यातील वाढत्या लोकसंख्येवरून सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) चिंता व्यक्त केली आहे. याबाबत केंद्रीय गृह मंत्रालयालाही माहिती देण्यात आली आहे.

ठळक मुद्दे राजस्थानमध्ये भारत-पाक सीमेवर असणाऱ्या जैसलमेर जिल्ह्यातील वाढत्या लोकसंख्येवरून सीमा सुरक्षा दलाने चिंता व्यक्त केली आहे.पाक सीमेवरील मुस्लिमांची वाढती लोकसंख्या चिंताजनक असल्याचं बीएसएफने म्हटलं आहे. हिंदू आणि मुस्लिम समाजातील संवादही कमी होत चालला असल्याचं समोर आलं आहे. 

नवी दिल्ली - राजस्थानमध्ये भारत-पाक सीमेवर असणाऱ्या जैसलमेर जिल्ह्यातील वाढत्या लोकसंख्येवरून सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) चिंता व्यक्त केली आहे. याबाबत केंद्रीय गृह मंत्रालयालाही माहिती देण्यात आली आहे. पाक सीमेवरील मुस्लिमांची वाढती लोकसंख्या चिंताजनक असल्याचं बीएसएफने म्हटलं आहे. सीमा सुरक्षा दलाच्या सर्वेक्षणानुसार, सीमा परिसरात मुस्लिमांची लोकसंख्या वाढत आहे. तसेच मुस्लिम समाजात धार्मिक कट्टरता वाढत असून पारंपरिक राजस्थानी ओळख मागे पडत चालली आहे. हिंदू आणि मुस्लिम समाजातील संवादही कमी होत चालला असल्याचं समोर आलं आहे. 

सीमा सुरक्षा दलाने काही दिवसांपूर्वीच जैसलमेर भागात राहणाऱ्या लोकांचे सर्वेक्षण केले होते. त्यामध्ये अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. जैसलमेर परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या पेहरावात आणि केशरचनेत अमुलाग्र बदल होऊन त्यातून राजस्थानची छबी नाहीशी होत चालली आहे, असं धक्कादायक निरीक्षण सीमा सुरक्षा दलानं नोंदवलं आहे. तसेच सीमा भागातील मुस्लिम समाजाच्या लोकसंख्येत तब्बल 20 ते 22 टक्के वाढ झाली आहे. इतर धर्मियांची लोकसंख्या 8 ते 10 टक्क्यांनी वाढल्याचं सीमा सुरक्षा दलाच्या सर्वेक्षणात म्हटलं आहे.

सीमा सुरक्षा दलाने त्याच्या सर्वेक्षणात मुस्लिम समाजाच्या वाढत्या लोकसंख्येवरून या भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्यातरी या भागात धार्मिक तेढ नाही. परंतु, तेढ निर्माण होऊ नये, यासाठी खबरदारी घेणे आवश्यक असल्याचं म्हटलं आहे. मोहनगड, नचना आणि पोखरण येथे हिंदुत्त्ववादी संघटनांचे प्रमाण वाढले आहे. या संघटनांमध्ये स्थानिक हिंदू मोठ्या प्रमाणात सामील होत आहेत. यावर मुस्लीम समाजाचा आक्षेप आहे. मात्र, अद्याप यावरुन दोन्ही समाजात वाद झालेला नाही, असेही यात स्पष्ट करण्यात आले आहे. मोहनगड, नचना, बहला, पोखरण, साम, तनोट या भागांमध्ये सीमा सुरक्षा दलाने हे सर्वेक्षण केले आहे. त्याचा अहवाल केंद्रीय गृहमंत्रालयासह अन्य यंत्रणांना सुपूर्द करण्यात आला, अशी माहिती सीमा सुरक्षा दलाचे प्रमुख रजनीकांत मिश्रा यांनी दिली.

टॅग्स :BSFसीमा सुरक्षा दलRajasthanराजस्थान