शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'
2
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
3
भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... 
4
Breaking: भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; मुक्त व्यापार करार, थेट विमानसेवा अन् बरंच काही...
5
मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज
6
IND vs SA: शुबमन गिलच्या दुखापतीबद्दल बॅटिंग कोचने दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
7
२०० महिलांनी कोर्टातच घेतला जीव; मालेगावात जे घडता घडता राहिलं ते नागपूरमध्ये झालं होतं
8
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का, अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांचा राजीनामा
9
Viral : जगातला सगळ्यात आळशी व्यक्ती! स्पर्धा जिंकण्यासाठी तब्बल 'इतके' तास गादीवर झोपून राहिला
10
'अनगरच्या पाटलांचा माज आम्ही उतरवणार, चुकीला माफी नाही'; अजित पवारांच्या नेत्याचा थेट इशारा
11
बंगालमध्ये 'घमासान'! "परिस्थिती अत्यंत बिघडलीये, SIR त्वरित थांबवा..."; ममता बॅनर्जींच CECना पत्र, आणखी काय म्हणाल्या?
12
IND vs SA: हार्दिक पांड्या आफ्रिकेविरूद्धच्या वनडे मालिकेत खेळणार की नाही? वाचा ताजी अपडेट
13
लाकडाचेच ते...! चीनमधील १,५०० वर्षे जुन्या प्राचीन मंदिराचे पॅव्हेलिअन पेटले; पर्यटकांनी मेणबत्ती लावली अन्...
14
भारतात विकली जाणारी टेस्ला मॉडेल Y किती सुरक्षित; युरो एनकॅप क्रॅश टेस्टमध्ये मिळवले 'एवढे' स्टार रेटिंग!
15
पश्चिम बंगालमध्ये ९०० मतदारांची नावे यादीतून गायब; निवडणूक आयोगाचा संताप, बीएलओंवर कारवाईचे आदेश
16
लोकांचे पैसे गुंतविता गुंतविता Groww ने १९,००० कोटींचे नुकसान केले; गुंतवणूकदार डोके धरून बसले...
17
पती नव्हे राक्षस! पत्नीने मित्रांना विरोध केला म्हणून मारहाण, गर्भपात आणि नंतर अश्लील व्हिडीओ व्हायरल
18
'पाश्चिमात्य दबावातही भारत-रशिया संबंध मजबूत', अमेरिकेचा उल्लेख करत रशियाची मोठी प्रतिक्रिया
19
Nashik: येवल्यात छगन भुजबळांच्या 'पंच'मुळे उद्धवसेना 'सलाइन'वर, 'शिंदेसेने'लाही दिला शह
20
एकनाथ शिंदेंच्या तक्रारीनंतर अमित शाहांकडून रवींद्र चव्हाणांची पाठराखण; "पक्षबांधणी सुरूच ठेवा..."
Daily Top 2Weekly Top 5

सीमेवर वाढतेय मुस्लिमांची लोकसंख्या; BSF ने व्यक्त केली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2018 12:49 IST

राजस्थानमध्ये भारत-पाक सीमेवर असणाऱ्या जैसलमेर जिल्ह्यातील वाढत्या लोकसंख्येवरून सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) चिंता व्यक्त केली आहे. याबाबत केंद्रीय गृह मंत्रालयालाही माहिती देण्यात आली आहे.

ठळक मुद्दे राजस्थानमध्ये भारत-पाक सीमेवर असणाऱ्या जैसलमेर जिल्ह्यातील वाढत्या लोकसंख्येवरून सीमा सुरक्षा दलाने चिंता व्यक्त केली आहे.पाक सीमेवरील मुस्लिमांची वाढती लोकसंख्या चिंताजनक असल्याचं बीएसएफने म्हटलं आहे. हिंदू आणि मुस्लिम समाजातील संवादही कमी होत चालला असल्याचं समोर आलं आहे. 

नवी दिल्ली - राजस्थानमध्ये भारत-पाक सीमेवर असणाऱ्या जैसलमेर जिल्ह्यातील वाढत्या लोकसंख्येवरून सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) चिंता व्यक्त केली आहे. याबाबत केंद्रीय गृह मंत्रालयालाही माहिती देण्यात आली आहे. पाक सीमेवरील मुस्लिमांची वाढती लोकसंख्या चिंताजनक असल्याचं बीएसएफने म्हटलं आहे. सीमा सुरक्षा दलाच्या सर्वेक्षणानुसार, सीमा परिसरात मुस्लिमांची लोकसंख्या वाढत आहे. तसेच मुस्लिम समाजात धार्मिक कट्टरता वाढत असून पारंपरिक राजस्थानी ओळख मागे पडत चालली आहे. हिंदू आणि मुस्लिम समाजातील संवादही कमी होत चालला असल्याचं समोर आलं आहे. 

सीमा सुरक्षा दलाने काही दिवसांपूर्वीच जैसलमेर भागात राहणाऱ्या लोकांचे सर्वेक्षण केले होते. त्यामध्ये अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. जैसलमेर परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या पेहरावात आणि केशरचनेत अमुलाग्र बदल होऊन त्यातून राजस्थानची छबी नाहीशी होत चालली आहे, असं धक्कादायक निरीक्षण सीमा सुरक्षा दलानं नोंदवलं आहे. तसेच सीमा भागातील मुस्लिम समाजाच्या लोकसंख्येत तब्बल 20 ते 22 टक्के वाढ झाली आहे. इतर धर्मियांची लोकसंख्या 8 ते 10 टक्क्यांनी वाढल्याचं सीमा सुरक्षा दलाच्या सर्वेक्षणात म्हटलं आहे.

सीमा सुरक्षा दलाने त्याच्या सर्वेक्षणात मुस्लिम समाजाच्या वाढत्या लोकसंख्येवरून या भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्यातरी या भागात धार्मिक तेढ नाही. परंतु, तेढ निर्माण होऊ नये, यासाठी खबरदारी घेणे आवश्यक असल्याचं म्हटलं आहे. मोहनगड, नचना आणि पोखरण येथे हिंदुत्त्ववादी संघटनांचे प्रमाण वाढले आहे. या संघटनांमध्ये स्थानिक हिंदू मोठ्या प्रमाणात सामील होत आहेत. यावर मुस्लीम समाजाचा आक्षेप आहे. मात्र, अद्याप यावरुन दोन्ही समाजात वाद झालेला नाही, असेही यात स्पष्ट करण्यात आले आहे. मोहनगड, नचना, बहला, पोखरण, साम, तनोट या भागांमध्ये सीमा सुरक्षा दलाने हे सर्वेक्षण केले आहे. त्याचा अहवाल केंद्रीय गृहमंत्रालयासह अन्य यंत्रणांना सुपूर्द करण्यात आला, अशी माहिती सीमा सुरक्षा दलाचे प्रमुख रजनीकांत मिश्रा यांनी दिली.

टॅग्स :BSFसीमा सुरक्षा दलRajasthanराजस्थान