शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

जय जवान... लग्नाला उरले होते फक्त १७ दिवस, घरी आलं तिरंग्यात लपेटलेलं पार्थिव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2018 15:41 IST

देशाचं संरक्षण करताना विजय पांडे जम्मू-काश्मीरमध्ये शहीद

फतेहपूर: जम्मू-काश्मीरमध्ये देशाचं रक्षण करताना सीमा सुरक्षा दलाच्या दोन जवानांना वीरमरण आलं. यामध्ये उत्तर प्रदेशच्या फतेहपूरमधील विजय पांडे यांचा समावेश आहे. 20 जून रोजी विजय यांचा विवाह होणार होता. मात्र ज्या घरात काही दिवसानंतर लगीनघाई पाहायला मिळणार होती, त्या घरात आता आक्रोश ऐकू येत आहे. फतेहपूरमधील सठिगवा गावात विजय पांडे यांना अंतिम निरोप देण्यात आला आहे. यावेळी मोठ्या संख्येनं ग्रामस्थ उपस्थित होते. विजय पांडे यांच्या लग्नाची तयारी जवळपास पूर्ण झाली होती. त्यांच्या लग्नाच्या पत्रिकादेखील वाटण्यात आल्या होत्या. मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. अखनूरमध्ये कर्तव्य बजावत असताना पाकिस्तानच्या गोळीबारात विजय पांडे शहीद झाले. पांडे यांना रविवारी वीरमरण आलं. यावर्षी आतापर्यंत 18 जवानांनी पाकिस्तानच्या गोळीबारात आणि दहशतवाद्यांशी दोन हात करताना हौतात्म्य पत्करलं आहे. तर जवानांच्या कारवाईत आतापर्यंत 80 हून दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे. बीएसएफचे जम्मू फ्रंटियरचे महानिरीक्षक राम अवतार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैन्यानं रात्री सव्वाच्या सुमारास प्रगवालमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर गोळीबार सुरू केला. पाकिस्तानच्या सैनिकांनी सीमावर्ती भागातील भारतीय चौक्यांना लक्ष केलं. यामध्ये सहाय्यक उपनिरीक्षक एस. एन. यादव आणि कॉन्स्टेबल व्ही. के. पांडे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं. पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारामुळे सीमावर्ती भागातील स्थानिकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे.  

टॅग्स :SoldierसैनिकMartyrशहीदJammu Kashmirजम्मू-काश्मीरPakistanपाकिस्तान