शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

रोहिंग्यांची घुसखोरी रोखण्यासाठी बीएसएफने 50 संवेदनशील ठिकाणी वाढवली गस्त, आसाममध्ये हायअलर्ट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 19:35 IST

]म्यानमानमधून निर्वासित झालेल्या रोहिंग्यांप्रश्नी केंद्र सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. रोहिंग्या निर्वारित अवैधरित्या भारतात घुसण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे त्यांची घुसखोरी रोखण्यासाठी बीएसएफने 50 संवेदनशील ठिकाणांवरील गस्त वाढवली आहे.

नवी दिल्ली  -  म्यानमानमधून निर्वासित झालेल्या रोहिंग्यांप्रश्नी केंद्र सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. रोहिंग्या निर्वारित अवैधरित्या भारतात घुसण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे त्यांची घुसखोरी रोखण्यासाठी बीएसएफने 50 संवेदनशील ठिकाणांवरील गस्त वाढवली आहे. त्याबरोबरच आसाममध्ये रोहिंग्यांनी घुसखोरी करण्याची शक्यता लक्षात घेऊन आसाममध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.  बीएसएसफने पश्चिम बंगालला लागून असलेल्या भारत आणि बांगला देशच्या सीमेवर रोहिंग्या मुस्लिमांची अवैध घुसखोरी रोखण्यासाठी गस्त वाढवली आहे. बीएसएफचे महानिरीक्षक (दक्षिण बंगाल) पीएसआर अंजनेयुलू यांनी सांगितले की, "याआधी आम्ही घुसखोरी होण्याची शक्यता असलेली 22 ठिकाणे निश्चित केली होती. आता मात्र या ठिकाणांची संख्या 50 पर्यंत वाढवण्यात आली आहेत. ही ठिकाणे संवेदनशील आहेत. या ठिकाणांहून बांगलादेशी आणि रोहिंग्या, दोघेही सीमा पार करून भारतात घुसखोरी करू शकतात, त्यामुळे आम्ही, गस्त वाढवली आहे." बीएसएफने संवेदनशील घोषित केलेल्या क्षेत्रांमध्ये पेत्रापोल, जयंतीपूर, हरिदासपूर, गोपालपारा आणि तेतुलबेराई यांचा समावेश आहे. दक्षिण बंगाल फ्रंटियरच्या बीएसएफ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही वर्षांत 175 रोहिंग्यांना अटक करण्यात आली आहे. ज्यातील सात रोहिंग्यांना याचवर्षी अटक करण्यात आली आहे. रोहिंग्यांची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांच्या ठिकाणांचा शोध घेण्यासाठी बीएसएफकडून आपल्या स्थानिक सूत्रांमध्ये वाढ करण्यात येत आहे. तसेच विविध केंद्रीय यंत्रणांसोबत बीएसएफ काम  करत आहे.  भारताची बांगलादेशला लागून असलेली एकूण सीमा 4 हजार 096 किमी एवढी आहे. त्यापैकी तब्बल 2 हजार 216 मीटर सीमा एकट्या पश्चिम बंगालला लागून आहे. रोहिंग्या निर्वासितांबाबत सर्वोच्च न्यायालयात म्हणणे मांडताना केंद्र सरकारने त्यांचा उल्लेख अवैध प्रवासी असा केला होता. तसेच त्यांचे भारतात येऊन वास्तव्य करणे देशाच्या सुरक्षेसाठी धोका असल्याचे केंद्राने सर्वोच्च न्यायालयात सांगितसे होते. बंगालप्रमाणेच आसाममध्येही रोहिंग्या निर्वासितांची अवैध घुसखोरी रोखण्यासाठी हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. आसाम पोलिसांनी हायअलर्टची घोषणा केली आहे. रोहिंग्यांना भारतात घुसखोरी करण्यासाठी मदत करणाऱ्या तीन भारतीय दलालांना  त्रिपुरामधील सोनापूर येथे अटक करण्यात आल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. याआधी आसाम त्रिपुरा सीमेवर सहा संशयित रोहिंग्यांना ताब्यात घेण्यात आले होते.  

टॅग्स :BSFसीमा सुरक्षा दलIndiaभारतRohingyaरोहिंग्या