शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

१४ महिन्यांपूर्वी सत्ता सोडणारे पुन्हा 'सिंहासना'वर, येडियुरप्पांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 18:36 IST

मोठ्या राजकीय उलथापालथीनंतर येडियुरप्पांनी मुख्यमंत्रिपद

बंगळुरु: प्रचंड राजकीय उलथापालथीनंतर भाजपाचे वरिष्ठ नेते बी. एस. येडियुरप्पा यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तीनच दिवसांपूर्वी कर्नाटकमधील काँग्रेस-जेडीएस सरकार कोसळलं. यानंतर आज येडियुरप्पांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राजभवनात त्यांचा शपथविधी संपन्न झाला. राज्यपाल वजूभाई वाला यांनी त्यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. येडियुरप्पांनी चौथ्यांदा कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.  कर्नाटकमधील काँग्रेस-जेडीएसचं सरकार बहुमत सिद्ध करु न शकल्यानं तीनच दिवसांपूर्वी कोसळलं. यानंतर आज येडियुरप्पांनी कर्नाटकचे २५ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. येडियुरप्पा यांना ३१ जुलैपर्यंत विधानसभेत बहुमत सिद्ध करावं लागेल. कर्नाटक विधानसभेतील सध्याची सदस्य संख्या २२२ इतकी आहे. १७ बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यावर निर्णय घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत. त्यातील ३ आमदारांना कालच विधानसभा अध्यक्षांनी अपात्र ठरवलं. त्यामुळे आता १४ आमदारांच्या राजीनाम्यावरील निर्णय प्रलंबित आहे. येडियुरप्पांना विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी ११२ आमदारांचा पाठिंबा गरजेचा आहे. यामध्ये बंडखोर आमदारांची भूमिका महत्त्वाची असेल. विधानसभेत भाजपाचे १०५ आमदार आहेत. त्यामुळे बहुमत सिद्ध करताना भाजपाला काँग्रेस, जेडीएसच्या बंडखोर आमदारांची आवश्यकता भासेल. या आमदारांनी येडियुरप्पांच्या बाजूनं मतदान केल्यास किंवा बहुमत चाचणीवेळी अनुपस्थित राहिल्यास भाजपाला मदत होईल. 

टॅग्स :Yeddyurappaयेडियुरप्पाBJPभाजपा