शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
3
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?
4
Rain Alert: कमी दाबाचे क्षेत्र कायम, या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस पडणार?
5
शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
6
धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
7
खात्यात ८ लाख जमा केले अन् प्राप्तिकर विभागाची 'टॅक्स' नोटीस; ६ वर्षांच्या लढ्यानंतर करदात्याचा विजय!
8
Viral Video: हत्तीला पाहून सिंह मंडळींची 'हवा टाइट'... झाडाखाली बसले असताना काय घडलं, पाहा
9
थेट मंत्र्यांच्या ताफ्यालाच पाठलाग करून अडवले, वादावादी, कारची तोडफोड करण्याचा प्रयत्न, कारण काय?
10
Powai Hostage: रोहित आर्या प्रकरणातील नवी माहिती, मुलांसोबत ऑडिशनसाठी गेलेले पालक म्हणाले...
11
Abhishek Sharma Record Breaking Fifty : जिथं सगळ्यांनी नांगी टाकली, तिथं अभिषेक शर्माची विक्रमी खेळी
12
Rohit Arya: रोहित आर्याला मी वेगळे पैसे दिलेले, सरकारी बिलाशी संबंध नाही; दीपक केसरकरांची सारवासारव
13
प्रेयसीचा शो पाहण्यासाठी ५०० कोटी रुपयांचे सरकारी विमान वापरलं; काश पटेल वादाच्या भोवऱ्यात
14
कंडोम बनवणाऱ्या कंपनीचा शेअर करतोय मालामाल, खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; 2 महिन्यातच दिला बंपर परतावा!
15
तेलंगणामध्ये मोंथा वादळाचा कहर, १२ जणांचा मृत्यू; मुसळधार पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी, रस्तेही बंद
16
कोणता झेंडा घेऊ हाती अशी मनसैनिकांची अवस्था, राज ठाकरे कन्फ्यूज नेते; शिंदेसेनेची बोचरी टीका
17
Lenskart IPO: महागडा आहे का लेन्सकार्टचा आयपीओ? व्हॅल्यूएशनवरुन उपस्थित होताहेत प्रश्न, एक्सपर्ट म्हणाले...
18
अँड्रॉइड की अ‍ॅपल, मोबाईल घोटाळे रोखण्यात कोणती सिस्टीम चांगली? गुगलने केला धक्कादायक खुलासा
19
टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचताच आयसीसीने धमाका करून टाकला! ऑस्ट्रेलिया संघ बघतच राहिला...
20
सौदी अरेबिया फिफा विश्वचषकासाठी बांधणार 'स्काय स्टेडियम'; व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा?

भारतातील मोठ्या शहरांमध्ये प्रदूषणामुळे वाढतेय मृत्यूंची संख्या, धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 11:25 IST

Air Pollution: दक्षिण आशियातील  (South Asia) शहरांमध्ये वायू प्रदूषणाच्या प्रादुर्भावामुळे कमी वयातच लोकांच्या मृत्यूच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

लंडन : भारतातील मोठ्या शहरांमध्ये वायू प्रदूषणामुळे (Air Pollution) लोकांच्या अकाली मृत्यूची प्रकरणे वेगाने वाढत आहेत. गेल्या काही वर्षांत ही संख्या जवळपास एक लाखावर पोहोचली आहे, असे ब्रिटनमध्ये (Britain)करण्यात आलेल्या एका नवीन संशोधनात आढळून आले आहे.

युनिव्हर्सिटी ऑफ बर्मिंगहॅम (University of Birmingham) आणि युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन  (UCL) येथील संशोधकांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन गेल्या आठवड्यात 'सायन्स अॅडव्हान्सेस'मध्ये प्रकाशित झाले. त्यात म्हटले आहे की, वेगाने वाढणाऱ्या उष्णकटिबंधीय शहरांमध्ये 14 वर्षात जवळपास 180,000 लोकांचा मृत्यू वाढत्या वायू प्रदूषणामुळे (Air Pollution) झाला, त्यांना वाचवले जाऊ शकले असते.

या शहरांची वाईट अवस्थादक्षिण आशियातील  (South Asia) शहरांमध्ये वायू प्रदूषणाच्या प्रादुर्भावामुळे कमी वयातच लोकांच्या मृत्यूच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बांगलादेशातील (Bangladesh) ढाका (Dhaka) येथे अशी सर्वाधिक प्रकरणे समोर आली असून त्यांची संख्या 24 हजार होती. यासह, भारतातील मुंबई, बंगळुरू, कोलकाता, हैदराबाद, चेन्नई, सुरत, पुणे आणि अहमदाबादमध्ये अशी एकूण एक लाख प्रकरणे समोर आली आहेत.

पेंढा जाळण्याचे मोठे कारणप्रमुख संशोधक डॉ. करण वोहरा यांनी सांगितले की, जमीन साफ ​​करण्यासाठी आणि शेतातील पेंढा याची विल्हेवाट लावण्यासाठी जैव-इंधन उघडे जाळणे हे उष्णकटिबंधीय प्रदेशातील वायू प्रदूषणात (Air Pollution) झपाट्याने वाढ होण्याचे प्रमुख कारण आहे. तसेच, आमचे विश्लेषण असे सांगत आहे की, ही शहरे वायू प्रदूषणाच्या नव्या युगात प्रवेश करत आहेत. काही शहरांमध्ये, परिस्थिती एका वर्षात तितकी बिघडते आहे, जितकी इतर शहरांमध्ये एका दशकात बिघडते, असेही ते म्हणाले.  

टॅग्स :air pollutionवायू प्रदूषण