शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

भारतातील मोठ्या शहरांमध्ये प्रदूषणामुळे वाढतेय मृत्यूंची संख्या, धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 11:25 IST

Air Pollution: दक्षिण आशियातील  (South Asia) शहरांमध्ये वायू प्रदूषणाच्या प्रादुर्भावामुळे कमी वयातच लोकांच्या मृत्यूच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

लंडन : भारतातील मोठ्या शहरांमध्ये वायू प्रदूषणामुळे (Air Pollution) लोकांच्या अकाली मृत्यूची प्रकरणे वेगाने वाढत आहेत. गेल्या काही वर्षांत ही संख्या जवळपास एक लाखावर पोहोचली आहे, असे ब्रिटनमध्ये (Britain)करण्यात आलेल्या एका नवीन संशोधनात आढळून आले आहे.

युनिव्हर्सिटी ऑफ बर्मिंगहॅम (University of Birmingham) आणि युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन  (UCL) येथील संशोधकांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन गेल्या आठवड्यात 'सायन्स अॅडव्हान्सेस'मध्ये प्रकाशित झाले. त्यात म्हटले आहे की, वेगाने वाढणाऱ्या उष्णकटिबंधीय शहरांमध्ये 14 वर्षात जवळपास 180,000 लोकांचा मृत्यू वाढत्या वायू प्रदूषणामुळे (Air Pollution) झाला, त्यांना वाचवले जाऊ शकले असते.

या शहरांची वाईट अवस्थादक्षिण आशियातील  (South Asia) शहरांमध्ये वायू प्रदूषणाच्या प्रादुर्भावामुळे कमी वयातच लोकांच्या मृत्यूच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बांगलादेशातील (Bangladesh) ढाका (Dhaka) येथे अशी सर्वाधिक प्रकरणे समोर आली असून त्यांची संख्या 24 हजार होती. यासह, भारतातील मुंबई, बंगळुरू, कोलकाता, हैदराबाद, चेन्नई, सुरत, पुणे आणि अहमदाबादमध्ये अशी एकूण एक लाख प्रकरणे समोर आली आहेत.

पेंढा जाळण्याचे मोठे कारणप्रमुख संशोधक डॉ. करण वोहरा यांनी सांगितले की, जमीन साफ ​​करण्यासाठी आणि शेतातील पेंढा याची विल्हेवाट लावण्यासाठी जैव-इंधन उघडे जाळणे हे उष्णकटिबंधीय प्रदेशातील वायू प्रदूषणात (Air Pollution) झपाट्याने वाढ होण्याचे प्रमुख कारण आहे. तसेच, आमचे विश्लेषण असे सांगत आहे की, ही शहरे वायू प्रदूषणाच्या नव्या युगात प्रवेश करत आहेत. काही शहरांमध्ये, परिस्थिती एका वर्षात तितकी बिघडते आहे, जितकी इतर शहरांमध्ये एका दशकात बिघडते, असेही ते म्हणाले.  

टॅग्स :air pollutionवायू प्रदूषण