शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
3
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
4
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
5
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
6
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
7
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
8
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
9
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
10
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
11
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
12
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
13
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
14
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
15
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
16
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
17
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
18
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
19
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
20
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...

Ayodhya Ram Mandir: कायदा करा, अन्यथा...; रामदेव बाबांचा थेट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2018 15:51 IST

राम मंदिराच्या मुद्यावरुन आता रामदेव बाबादेखील आक्रमक

हरिद्वार: विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि शिवसेनेनं राम मंदिराच्या मुद्यावरुन मोदी सरकावर दबाव निर्माण केला आहे. यापाठोपाठ आता रामदेव बाबांनीदेखील सरकारला इशारा दिला आहे. लोकांच्या संयमाचा बांध फुटला आहे. त्यामुळे सरकारनं राम मंदिराच्या उभारणीसाठी कायदा करावा, असं रामदेव बाबांनी म्हटलं आहे. सरकारनं कायदा न केल्यास लोक स्वत: मंदिराची उभारणी सुरु करतील आणि त्यामुळे देशातील वातावरण बिघडेल, असा इशारादेखील त्यांनी दिला. ते हरिद्वारमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राम मंदिराच्या उभारणीची वाट पाहणाऱ्या लोकांचा संयम आता संपत आला आहे. राम मंदिरासाठी आता सरकारनं कायदा करावा. अन्यथा लोक स्वत:च राम मंदिर बांधण्यास सुरुवात करतील. असं घडल्यास देशातील परिस्थिती हाताबाहेर जाईल, असा सूचक इशारा रामदेव बाबांनी सरकारला दिला. सध्या देशात कोणीच भगवान रामाच्या विरोधात नाही. देशातील सर्व हिंदू, मुस्लिम आणि ख्रिस्ती बांधव त्यांचेच वंशज आहेत, असंही ते पुढे म्हणाले. राम मंदिर न उभारल्यास देशातील परिस्थिती बिघडेल, असा इशारा आधीदेखील रामदेव बाबांनी दिला होता. 'राम मंदिराच्या उभारणीचा रस्ता सर्वोच्च न्यायालयातून नव्हे, तर संसदेतून जातो. त्यामुळे सरकारनं यासाठी पुढाकार घ्यायला हवा. लोकांचा संयम संपत आला आहे. आता ते फार काळ मंदिरासाठी वाट पाहू शकत नाहीत,' असं रामदेव बाबांनी मुझफ्फरनगरमध्ये म्हटलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशभक्त आणि रामभक्त असल्याचंदेखील ते म्हणाले होते.  

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याBaba Ramdevरामदेव बाबाShiv Senaशिवसेना