शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
5
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
6
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
7
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
8
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
9
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
10
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
11
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
12
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
13
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
14
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
15
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
16
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
17
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
18
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
19
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
20
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
Daily Top 2Weekly Top 5

1971च्या युद्धाचे 'हिरो' मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं निधन, 'बॉर्डर'मध्ये सनी देओलनं केली होती भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2018 16:23 IST

बॉर्डर चित्रपटात ज्या कुलदीप सिंग चांदपुरी यांची भूमिका सनी देओलनं साकारली होती. त्यांचं आज निधन झालं आहे.

नवी दिल्ली- बॉर्डर चित्रपटात ज्या कुलदीप सिंग चांदपुरी यांची भूमिका सनी देओलनं साकारली होती. त्यांचं आज निधन झालं आहे. 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धात त्यांनी अतुलनीय शौर्याचा परिचय दिला होता. याच युद्धावर बॉर्डर चित्रपट तयार करण्यात आला आहे. भारत-पाकिस्तान युद्धात गाजवलेल्या पराक्रमामुळे मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांना महावीर चक्रानं गौरविण्यात आलं होतं.ब्रिगेडियर कुलदीप सिंग यांचा जन्म 22 नोव्हेंबर 1940ला गुर्जर शीख कुटुंबात झाला होता. भारतातल्या पंजाबमध्ये त्यांचं कुटुंब वास्तव्याला होतं. त्यांच्या जन्मानंतर कुटुंबीय बालाचौरमधल्या चांदपूरमध्ये वास्तव्याला गेले. 1962मध्ये त्यांनी होशियारपूरमधल्या गव्हर्नमेंट कॉलेजमधून पदवी संपादन केली होती. त्यानंतर ते भारतीय लष्करात सामील झाले. 1963मध्ये ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीच्या पंजाब रेजिमेंट 23व्या बटालियनमध्ये नियुक्त करण्यात आले. त्यानंतर 1965मध्ये त्यांनी युद्धात सहभाग घेतला. युद्धानंतर जवळपास वर्षभर ते इजिप्तमध्ये संयुक्त राष्ट्राच्या मोहिमेवर होते. ज्यावेळी पाकिस्ताननं लोंगेवालात हल्ला केला, तेव्हा ते मेजर पदावर कायरत होते आणि ते ब्रिगेडिअर पदावरून सेवानिवृत्त झाले. भारत आणि पाकिस्तानमध्ये 1971मध्ये युद्ध संपण्याच्या अंतिम टप्प्यात होते. त्याच दरम्यान त्यांना सूचना मिळाली की, पाकिस्तानची एक मोठी सैन्य तुकडी लोंगेवाला चौकीच्या दिशेनं येतेय. लोंगेवाला चौकीची सुरक्षा ज्या सैन्य तुकडीवर होती, त्याचं नेतृत्व कुलदीप सिंह चांदपुरी करत होते.चांदपुरीच्या नेतृत्वात त्यावेळी फक्त 90 जवान आणि जवळपास 30 जवान गस्तीवर होते. 120 सैनिकांचं पाठबळ असतानाही पाकिस्तानच्या सैन्याचा सामना करणं अवघड होतं. चांदपुरींनी ठरवलं असतं तर ते पुढची चौकी असलेल्या रामगड चौकीकडे गेले असते. परंतु त्यांनी लोंगेवाला चौकीची सुरक्षा करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर रात्री पाकिस्तानकडून हल्ल्याला सुरुवात झाली. पाकिस्तान तोफांमधून गोळ्यांची बरसात करत होता. त्याला भारतीय जवानांनी निडरपणे चोख उत्तर दिलं. भारतीय जवानांनी जीपवर असलेल्या रिकॉइललेस रायफल आणि मोर्टारच्या सहाय्यानं गोळीबाराला सुरुवात केली. पाकिस्तानकडे जवळपास 2 हजार जवान होते. तर आपल्याकडे फक्त 100 जवानांची फौज होती. परंतु आपल्या जवानांचं धैर्य मजबूत असल्यानं त्यांनी पाकिस्ताननं रोखून धरलं.पाकिस्तानची मनीषा लोंगेवाला चौकी ताब्यात घेऊन रामगढहून थेट जैसलमेरला पोहोचण्याची होती. परंतु  चांदपुरीच्या नेतृत्वातील सैन्य तुकडीनं त्यांना पुढे येऊ दिलं नाही. त्यानंतर 5 डिसेंबर 1971च्या पहाटेच भारतीय जवानांच्या मदतीला हवाई दल आलं. हवाई दलानं विमानातून हल्ला करत पाकिस्तानचे टँक आणि सैन्याला उद्ध्वस्त केलं. त्यामुळे पाकिस्तानच्या सैन्याला मागच्या मागे पळून जावं लागलं. 6 डिसेंबरला भारतीय हवाई दलाची हंटर विमानं पाकिस्तानवर अक्षरशः तुटून पडली आणि पाकिस्तानच्या सैन्याला पूर्णतः नेस्तनाबूत केलं. या हल्ल्यात पाकिस्तानचे 34 टँक उद्ध्वस्त झाले होते. तर जवळपास 500 जवान जखमी झाले होते, तर 200 जवानांचा मृत्यू झाला होता. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान