शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

1971च्या युद्धाचे 'हिरो' मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं निधन, 'बॉर्डर'मध्ये सनी देओलनं केली होती भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2018 16:23 IST

बॉर्डर चित्रपटात ज्या कुलदीप सिंग चांदपुरी यांची भूमिका सनी देओलनं साकारली होती. त्यांचं आज निधन झालं आहे.

नवी दिल्ली- बॉर्डर चित्रपटात ज्या कुलदीप सिंग चांदपुरी यांची भूमिका सनी देओलनं साकारली होती. त्यांचं आज निधन झालं आहे. 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धात त्यांनी अतुलनीय शौर्याचा परिचय दिला होता. याच युद्धावर बॉर्डर चित्रपट तयार करण्यात आला आहे. भारत-पाकिस्तान युद्धात गाजवलेल्या पराक्रमामुळे मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांना महावीर चक्रानं गौरविण्यात आलं होतं.ब्रिगेडियर कुलदीप सिंग यांचा जन्म 22 नोव्हेंबर 1940ला गुर्जर शीख कुटुंबात झाला होता. भारतातल्या पंजाबमध्ये त्यांचं कुटुंब वास्तव्याला होतं. त्यांच्या जन्मानंतर कुटुंबीय बालाचौरमधल्या चांदपूरमध्ये वास्तव्याला गेले. 1962मध्ये त्यांनी होशियारपूरमधल्या गव्हर्नमेंट कॉलेजमधून पदवी संपादन केली होती. त्यानंतर ते भारतीय लष्करात सामील झाले. 1963मध्ये ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीच्या पंजाब रेजिमेंट 23व्या बटालियनमध्ये नियुक्त करण्यात आले. त्यानंतर 1965मध्ये त्यांनी युद्धात सहभाग घेतला. युद्धानंतर जवळपास वर्षभर ते इजिप्तमध्ये संयुक्त राष्ट्राच्या मोहिमेवर होते. ज्यावेळी पाकिस्ताननं लोंगेवालात हल्ला केला, तेव्हा ते मेजर पदावर कायरत होते आणि ते ब्रिगेडिअर पदावरून सेवानिवृत्त झाले. भारत आणि पाकिस्तानमध्ये 1971मध्ये युद्ध संपण्याच्या अंतिम टप्प्यात होते. त्याच दरम्यान त्यांना सूचना मिळाली की, पाकिस्तानची एक मोठी सैन्य तुकडी लोंगेवाला चौकीच्या दिशेनं येतेय. लोंगेवाला चौकीची सुरक्षा ज्या सैन्य तुकडीवर होती, त्याचं नेतृत्व कुलदीप सिंह चांदपुरी करत होते.चांदपुरीच्या नेतृत्वात त्यावेळी फक्त 90 जवान आणि जवळपास 30 जवान गस्तीवर होते. 120 सैनिकांचं पाठबळ असतानाही पाकिस्तानच्या सैन्याचा सामना करणं अवघड होतं. चांदपुरींनी ठरवलं असतं तर ते पुढची चौकी असलेल्या रामगड चौकीकडे गेले असते. परंतु त्यांनी लोंगेवाला चौकीची सुरक्षा करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर रात्री पाकिस्तानकडून हल्ल्याला सुरुवात झाली. पाकिस्तान तोफांमधून गोळ्यांची बरसात करत होता. त्याला भारतीय जवानांनी निडरपणे चोख उत्तर दिलं. भारतीय जवानांनी जीपवर असलेल्या रिकॉइललेस रायफल आणि मोर्टारच्या सहाय्यानं गोळीबाराला सुरुवात केली. पाकिस्तानकडे जवळपास 2 हजार जवान होते. तर आपल्याकडे फक्त 100 जवानांची फौज होती. परंतु आपल्या जवानांचं धैर्य मजबूत असल्यानं त्यांनी पाकिस्ताननं रोखून धरलं.पाकिस्तानची मनीषा लोंगेवाला चौकी ताब्यात घेऊन रामगढहून थेट जैसलमेरला पोहोचण्याची होती. परंतु  चांदपुरीच्या नेतृत्वातील सैन्य तुकडीनं त्यांना पुढे येऊ दिलं नाही. त्यानंतर 5 डिसेंबर 1971च्या पहाटेच भारतीय जवानांच्या मदतीला हवाई दल आलं. हवाई दलानं विमानातून हल्ला करत पाकिस्तानचे टँक आणि सैन्याला उद्ध्वस्त केलं. त्यामुळे पाकिस्तानच्या सैन्याला मागच्या मागे पळून जावं लागलं. 6 डिसेंबरला भारतीय हवाई दलाची हंटर विमानं पाकिस्तानवर अक्षरशः तुटून पडली आणि पाकिस्तानच्या सैन्याला पूर्णतः नेस्तनाबूत केलं. या हल्ल्यात पाकिस्तानचे 34 टँक उद्ध्वस्त झाले होते. तर जवळपास 500 जवान जखमी झाले होते, तर 200 जवानांचा मृत्यू झाला होता. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान