शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

गुजरातमध्ये वरात आलेली दारात; पण प्यायलाही पाणी नव्हते...वाचा पुढे काय घडले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 13:58 IST

संखेडा तालुक्यात नरेश तडवी यांच्या मुलाचे मंगळवारी लग्न होते. मात्र, रोज सायंकाळी भारनियमन होते, तेथे सकाळीच वीज गायब झाली.

बडोदा : सध्या लग्नाचा सिझन सुरु आहे. वरात दारात आली आणि पाणीच नसेल तर वर-वधू पक्षावर काय परिस्थिती ओढवेल याचे प्रत्यंतर गुजरातच्या छोटा उदयपुर जिल्ह्यातील एका गावामध्ये आले. वरात दारात यायची असताना वीजच गायब झाली यामुळे बोअरवेलमधून वरपक्षाकडील मंडळी पाणीच काढू शकले नाहीत. आता 1000 लोकांच्या जेवणापासून पिण्याच्या पाण्याचा यक्षप्रश्न निर्माण झाला होता. एक आयडिया सुचली आणि हा प्रश्न गावकऱ्यांनी सोडविला. 

संखेडा तालुक्यात नरेश तडवी यांच्या मुलाचे मंगळवारी लग्न होते. मात्र, रोज सायंकाळी भारनियमन होते, तेथे सकाळीच वीज गायब झाली. यामुळे एवढ्या वऱ्हाडींसाठी पाणी कोठून आणायचे असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला. लग्न मंडपातून वऱ्हाडींना उपाशी पाठवायचे का? या विचारानेच चिंतेचे ढग त्यांच्या डोळ्यासमोर दाटू लागले. तडवी कुटुंबियांना गावातील प्रत्येक घरामध्ये घागरी घेऊन जलदान करण्यासाठी विनवणी करण्याची वेळ आली. लग्नामध्ये सजाधजायचे सोडून हे कुटुंबीय दारोदारी भटकू लागले होते.

 गावात एकच हातपंप होता. त्यावरून एवढ्या मंडळींसाठी पाणी काढायचे म्हटले तर दिवस लागणार होता. यामुळे दारोदारी जाऊन पाणी मागितल्याचे तडवी यांनी सांगितले. लोकांनी पाणी टंचाई असूनही दोन घागरी पाणी दिले. शेवटी गावाची आणि वरपक्षाची इज्जत वाचविण्यासाठी गावकऱ्यांनीच प्रत्येक घरातून दोन दोन घागरी पाणी जमा केले. 

आम्हाला असे दोन ड्रम भरून पाणी मिळाले. शिवाय अतिरिक्त पाण्यासाठी गावातील महिलांनी रांग लावून हातपंपातून पाणी उपसले. तोपर्यंत दुपार झाली होती. हजाराच्या आसपास वऱ्हाडी, पाहुणेमंडळी मंडपात दाखल झाले होते. गावकऱ्यांच्या मदतीमुळे मुलाचा विवाह संपन्न झाल्याचे तडवी यांनी सांगितले. 

पाण्याची समस्या बिकटगुजरातमधील हा आदिवासी भाग आहे. येथे कायमच पाण्याची टंचाई असते. अनेकदा लग्न समारंभ असल्यावर नववधूही पाहुण्यांच्या पाण्यासाठी हातपंपावर पाणी उपसताना दिसतात.  

टॅग्स :Gujaratगुजरातwater scarcityपाणी टंचाई