शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

गुजरातमध्ये वरात आलेली दारात; पण प्यायलाही पाणी नव्हते...वाचा पुढे काय घडले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 13:58 IST

संखेडा तालुक्यात नरेश तडवी यांच्या मुलाचे मंगळवारी लग्न होते. मात्र, रोज सायंकाळी भारनियमन होते, तेथे सकाळीच वीज गायब झाली.

बडोदा : सध्या लग्नाचा सिझन सुरु आहे. वरात दारात आली आणि पाणीच नसेल तर वर-वधू पक्षावर काय परिस्थिती ओढवेल याचे प्रत्यंतर गुजरातच्या छोटा उदयपुर जिल्ह्यातील एका गावामध्ये आले. वरात दारात यायची असताना वीजच गायब झाली यामुळे बोअरवेलमधून वरपक्षाकडील मंडळी पाणीच काढू शकले नाहीत. आता 1000 लोकांच्या जेवणापासून पिण्याच्या पाण्याचा यक्षप्रश्न निर्माण झाला होता. एक आयडिया सुचली आणि हा प्रश्न गावकऱ्यांनी सोडविला. 

संखेडा तालुक्यात नरेश तडवी यांच्या मुलाचे मंगळवारी लग्न होते. मात्र, रोज सायंकाळी भारनियमन होते, तेथे सकाळीच वीज गायब झाली. यामुळे एवढ्या वऱ्हाडींसाठी पाणी कोठून आणायचे असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला. लग्न मंडपातून वऱ्हाडींना उपाशी पाठवायचे का? या विचारानेच चिंतेचे ढग त्यांच्या डोळ्यासमोर दाटू लागले. तडवी कुटुंबियांना गावातील प्रत्येक घरामध्ये घागरी घेऊन जलदान करण्यासाठी विनवणी करण्याची वेळ आली. लग्नामध्ये सजाधजायचे सोडून हे कुटुंबीय दारोदारी भटकू लागले होते.

 गावात एकच हातपंप होता. त्यावरून एवढ्या मंडळींसाठी पाणी काढायचे म्हटले तर दिवस लागणार होता. यामुळे दारोदारी जाऊन पाणी मागितल्याचे तडवी यांनी सांगितले. लोकांनी पाणी टंचाई असूनही दोन घागरी पाणी दिले. शेवटी गावाची आणि वरपक्षाची इज्जत वाचविण्यासाठी गावकऱ्यांनीच प्रत्येक घरातून दोन दोन घागरी पाणी जमा केले. 

आम्हाला असे दोन ड्रम भरून पाणी मिळाले. शिवाय अतिरिक्त पाण्यासाठी गावातील महिलांनी रांग लावून हातपंपातून पाणी उपसले. तोपर्यंत दुपार झाली होती. हजाराच्या आसपास वऱ्हाडी, पाहुणेमंडळी मंडपात दाखल झाले होते. गावकऱ्यांच्या मदतीमुळे मुलाचा विवाह संपन्न झाल्याचे तडवी यांनी सांगितले. 

पाण्याची समस्या बिकटगुजरातमधील हा आदिवासी भाग आहे. येथे कायमच पाण्याची टंचाई असते. अनेकदा लग्न समारंभ असल्यावर नववधूही पाहुण्यांच्या पाण्यासाठी हातपंपावर पाणी उपसताना दिसतात.  

टॅग्स :Gujaratगुजरातwater scarcityपाणी टंचाई