शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2024 15:11 IST

लग्नानंतर चार दिवसांनी सासरहून माहेरी आलेल्या नववधूचा अचानक मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

लग्नानंतर चार दिवसांनी सासरहून माहेरी आलेल्या नववधूचा अचानक मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बाथरूममध्ये तिचा मृतदेह आढळल्याने कुटुंबीय हादरले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून पंचनामा करून तो शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोस्टमार्टममध्ये मृत्यूचे कारण फुफ्फुसात पाणी भरल्याचं सांगण्यात आलं. सध्या व्हिसेरा रिपोर्ट वाट पाहत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये ही घटना घडली. 

नववधूच्या पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, नववधू बाथरूममध्ये गेली होती जिथे ती पाण्याच्या ड्रममध्ये पडलेली आढळली. तिला तातडीने मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मृत्यूचे कारण जाणून घेण्यासाठी पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. व्हिसेरा रिपोर्टनंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येईल.

मिळालेल्या माहितीनुसार, ममता कुशवाहा असं वधूचं नाव असून तिचे वय 23 वर्षे होतं. ममताच्या पतीचे नाव सुरेंद्र कुशवाहा आहे. ममताचं माहेर मध्य प्रदेशातील निवारी जिल्ह्यात आहे. कुटुंबीयांनी सांगितलं की, 23 एप्रिल रोजी ममताचं लग्न मोठ्या थाटामाटात झालं होतं. 24 एप्रिल रोजी पाठवणीनंतर ती सासरच्या घरी गेली

27 एप्रिल रोजी नववधू बाथरूममध्ये गेली होती. बराच वेळ ती बाथरूममधून बाहेर न आल्याने तिच्या कुटुंबीयांनी जाऊन पाहिले असता ती पाण्याच्या टाकीत पडल्याचं दिसलं. तिला तातडीने झाशी मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी आणण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. वधूचा मृत्यू नेमका कसा झाला हे गूढच आहे.

कुटुंबीयांनी सांगितलं की, लग्न होऊन अवघे चार-पाच दिवस झाले होते. हातावरची मेंदीही गेली नव्हती. अनेक विधी अजून व्हायच्या होत्या. याच दरम्यान नववधूचा अचानक मृत्यू झाला. दोन्ही कुटुंबांच्या आनंदाचे रूपांतर शोकात झाले. गोपीचंद कुशवाहा यांनी सांगितलं की, ममताला उपचारासाठी झाशीला घेऊन जात आहेत. काही वेळाने परत फोन आला आणि डॉक्टरांनी ममता यांना मृत घोषित केल्याची माहिती दिली. 

टॅग्स :marriageलग्न