शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

तामिळनाडूत काँग्रेस मुख्यालयात जोरदार हाणामारी, 4 कार्यकर्ते जखमी, वाचा काय होते कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2022 12:31 IST

Tamilnadu: मंगळवारी रात्री चेन्नईतील काँग्रेस पक्षाच्या मुख्यालयात दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याचे वृत्त आहे. 

चेन्नई : कन्याकुमारी ते जम्मू -काश्मीर अशा भारत जोडो यात्रेचे कॉंग्रेसतर्फे आयोजन करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात भारत जोडो यात्रा सुरू आहे. या भारत जोडो यात्रेला मोठ्याप्रमाणात नागरिकांकडून प्रतिसाद मिळत आहे. असे असताना मंगळवारी रात्री चेन्नईतीलकाँग्रेस पक्षाच्या मुख्यालयात दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याचे वृत्त आहे. 

दरम्यान, तामिळनाडूतून निघालेल्या काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेनंतर मतदारसंघात पक्षाचा झेंडा फडकवण्याची चर्चा होती. यादरम्यान हाणामारीचे प्रकरण समोर आले आहे. टीएनसीसीचे खजिनदार आणि नांगुनेरीचे आमदार रुबी आर मनोहरन यांच्या समर्थकांमध्ये ही हिंसक हाणामारी झाली. TOI च्या वृत्तानुसार, टीएनसीसी मुख्यालय सत्यमूर्ती भवन येथे झालेल्या हाणामारीत पक्षाचे किमान चार कार्यकर्ते जखमी झाले आहेत. पक्षाने अद्याप पोलिसांत तक्रार दाखल केलेली नाही.

नुकतेच, काँग्रेसच्या कलक्कड आणि नांगुनेरी या दोन ब्लॉक अध्यक्षांच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर मनोहरन यांचे समर्थक पाच बसमधून पक्षाच्या मुख्यालयात पोहोचले होते. दरम्यान, स्थानिक आमदार मनोहरन यांच्या माहितीशिवाय ब्लॉक अध्यक्षांची निवड तिरुनेलवेली पूर्व डीसीसी अध्यक्ष केपीके जयकुमार यांच्या समर्थकांची करण्यात आली होती, असा आरोप करण्यात आला होता.

हा विरोध टीएनसीसी अध्यक्ष के. एस. अलागिरी यांनी एआयसीसी सचिव, माजी टीएनसीसी अध्यक्ष, कार्यकारी अध्यक्ष, माजी आमदार आणि खासदार आणि विद्यमान आमदार आणि खासदार यांच्यासोबत संसदेच्या निवडणुका आणि प्रत्येक विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे ध्वजस्तंभ लावण्याबाबत चर्चा करण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत झाला.

या बैठकीला उपस्थित असलेल्या पक्षाच्या एका नेत्याने सांगितले की, जेव्हा मनोहरन यांनी पक्षांतर्गत निवडणुका रद्द केल्या पाहिजेत असा आग्रह धरला तेव्हा अलागिरी म्हणाले की, टीएनसीसी प्रमुख या नात्याने त्यांनी कधीही निवडणुकीत हस्तक्षेप केला नाही आणि अशी भूमिका बजावण्याची कोणतीही शक्ती नव्हती. कारण त्यावर पक्षाच्या रिटर्निंग अधिकाऱ्यांचे देखरेख होते. दुसरीकडे, अलागिरी यांनी पक्षाच्या हायकमांडने 'अराजक घटकांविरुद्ध' कठोर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर पोलिसांनी जखमी काँग्रेस कार्यकर्त्यांची सुटका केली.

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूChennaiचेन्नईcongressकाँग्रेसBharat Jodo Yatraभारत जोडो यात्रा