शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

सुखोई विमानांवरून पहिल्यांदाच होणार ब्राह्मोसची चाचणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2017 10:45 IST

शत्रूराष्ट्राच्या हद्दीत जाऊन विध्वंस घडवण्याची ब्राह्मोसची क्षमता सर्वश्रुत आहे. त्याबरोबरच अत्याधुनिक सुखोई विमाने ही भारताच्या हवाई ताफ्यामधील महत्त्वाचे अस्र आहेत.

नवी दिल्ली - शत्रूराष्ट्राच्या हद्दीत जाऊन विध्वंस घडवण्याची ब्राह्मोसची क्षमता सर्वश्रुत आहे. त्याबरोबरच अत्याधुनिक सुखोई विमाने ही भारताच्या हवाई ताफ्यामधील महत्त्वाचे अस्र आहेत. आता सुखोई विमानाची हल्ला करण्याची क्षमता वाढवण्यासाठी सुखोईच्या शस्त्रसाठ्यात ब्राह्मोस क्षेपणास्त्र जोडून शत्रूवर डबल अटॅक करण्याची तयारी संरक्षण यंत्रणांनी केली आहे. त्यानुसार पहिल्यांदाच ब्राह्मोस क्षेपणास्त्राची चाचणी सुखोई विमानांवरून ब्राह्मोस क्षेपणास्त्रांची चाचणी करण्यात येणार आहे. आवाजाच्या वेगापेक्षा सुमारे तिप्पट वेगाने हल्ला करण्याची क्षमता असलेल्या ब्राह्मोस क्षेपणास्त्राची या आठवड्यात पहिल्यांदाच सुखोई एमकेआय- 30 फायटर विमानावरून चाचणी होणार आहे. लढाऊ विमानावरून हल्ला करण्यास सक्षम असलेले ब्राम्होस क्षेपणास्त्र आणि सुखोई एमेआय फायटर जेटच्या या कॉम्बिनेशनकडे डेडल कॉम्बिनेशन म्हणून पाहिले जात आहे. हवेतून जमिनीवर मारा करता येणाऱ्या ब्राह्मोस क्षेपणास्त्राचा शत्रू सैन्याच्या सीमेवरील दहशतवादी तळांवर हल्ला करण्यासाठी वापर करता येऊ शकेल. ब्राह्मोस क्षेपणास्र भूमिगत परमाणू बंकर, कमांड आणि नियंत्रण कक्ष तसेच समुद्रावरून उडणारी विमाने यांना लक्ष्य करता येऊ शकेल. गेल्या दशकात लष्कराने 290 किमी पर्यंत मारक क्षमता असलेल्या ब्राह्मोस क्षेपणास्त्राला आपल्या ताफ्यात सामील केले होते. ब्राह्मोस क्षेपणास्त्रासाठी 27 हजार 150 कोटी रुपयांची ऑर्डर देण्यात आली आहे. तसेच लष्कर, नौदल, आणि हवाई दलाने या क्षेपणास्त्रांबाबत रस दाखवला आहे.   जून 2016 मध्ये भारत 34 देशांची संघटना असलेल्या मिसाईल टेक्नॉलॉजी कंट्रोल रिझिम या संघटनेचा सदस्य बनल्यापासून क्षेपणास्त्राच्या मारक क्षमतेवरील निर्बंध उठले आहे.  त्यामुळे सुरक्षा दले आता ब्राह्मोसच्या 450 किमीपर्यंत मारक क्षमता असलेल्या आवृत्तीची चाचणी करण्याच्या तयारीत आहेत. एमटीसीआरचे सदस्यत्व मिळाल्यानंतर भारत 300 किमी मारक क्षमता असलेल्या क्षेपणास्त्रांची निर्मिती करण्यास सक्षम होईल. सध्यातरी ब्राह्मोस क्षेपणास्त्राचे हायपरसोनिक व्हर्जन तयार कण्याची तयारी सुरू आहे. हे क्षेपणास्त्र माक 5 (ध्वनीच्या पाच पट वेगाने) वेगाने उड्डाण करण्यास सक्षम असेल.  

टॅग्स :Indiaभारत