शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

डॉ.आंबेडकर व मोदी ब्राह्मण, श्रीकृष्ण ओबीसी; भाजपा नेत्याची मुक्ताफळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2018 15:25 IST

विद्यासंपन्न ब्राह्मणांना सत्तेची हाव कधीच नव्हती. त्यांनी नेहमीच संपूर्ण समाजाचा विचार केला.

अहमदाबाद: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच वादग्रस्त वक्तव्य न करण्याचा इशारा देऊनही भाजपाच्या वाचाळवीर नेत्यांच्या वर्तणुकीत कोणताही फरक पडलेला दिसत नाही. गुजरातमधील विधानसभेचे अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी यांनी नुकत्याच केलेल्या एका वक्तव्यावरून त्याचा प्रत्यय आला. गांधीनगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ब्राह्मण व्यापार परिषदेत ते बोलत होते. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्राह्मण असल्याचे म्हटले. तसेच श्रीकृष्ण ओबीसी होता, संदीपन ऋषींनी त्यांना देव केले. विद्यासंपन्न ब्राह्मणांना सत्तेची हाव कधीच नव्हती. त्यामुळेच चंद्रगुप्त मौर्य, श्रीराम आणि श्रीकृष्णाच्या यशात ब्राह्मणांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. चंद्रगुप्त मौर्याच्या काळात चाणक्यही राजा होऊ शकला असता. मात्र, चाणक्याला सत्तेची हाव नव्हती. ब्राह्मणांनी नेहमीच संपूर्ण समाजाचा विचार केला, असे त्रिवेदी यांनी म्हटले. त्रिवेदींनी हे विधान केले त्यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री विजय रुपानी आणि उपमुख्यमंत्री नितीन पटेल हेदेखील उपस्थित होते. त्यामुळे आता त्रिवेदींची कानउघडणी होणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार आणि आमदारांनी ऊठसूठ कोणत्याही विषयावर तोंड उघडून माध्यमांना मसाला पुरविण्याचे आणि परिणामी पक्षाला व सरकारला नाहक वाईटपणा आणण्याचे प्रकार बंद करावेत, असा इशारावजा सल्ला दिला होता. नको त्या विषयावर पांडित्य दाखविण्याऐवजी या मंडळींनी ज्यासाठी लोकांनी निवडून दिले आहे, ते आपले लोकसेवेचे काम करावे, असे त्यांनी सांगितले होते. मात्र, मोदींचा हा सल्ला भाजपच्या नेत्यांनी फारसा मनावर घेतलेला दिसत नाही.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर