शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
2
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
3
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
4
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
5
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
6
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
7
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
8
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
9
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
10
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
11
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
12
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
13
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
14
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
15
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
16
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
18
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
19
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
20
'आता मतदार काय ते ठरवतील', विरोध करूनही दिलीप मानेना प्रवेश, सुभाष देशमुखांचा भाजपला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 17:16 IST

Air India Plane Crash: जे भारतीय लोक लंडनला जात होते ते बऱ्यापैकी विमाधारक होते. त्यांच्या विम्याच्या रकमाही मोठ्या आहेत. अनेकांनी टर्म इन्शूरन्स काढलेले आहेत, तर काहींचे जीवन विमा व इतर पॉलिसी आहेत. 

एअर इंडियाच्या विमान अपघातात २७५ हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात विमानातून प्रवास करणारे सर्वच्या सर्व कुटुंब देखील संपले आहे. यामुळे विमा कंपन्यांसमोर पेच निर्माण झाला आहे. कारण विमाधारकासोबत त्यांनी दिलेल्या नॉमिनींचा देखील यात मृत्यू झाला आहे. यामुळे अशावेळी निर्माण होणारी गुंतागुंत कशी सोडवायची याच्या विवंचनेत या विमा कंपन्या आहेत. 

अहमदाबाद विमानतळाबाहेर झालेल्या या विमान अपघातात विमानातील २४१ तर घटनास्थळावरील २९ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ६० परदेशी नागरिक आहेत. परंतू, जे भारतीय लोक लंडनला जात होते ते बऱ्यापैकी विमाधारक होते. त्यांच्या विम्याच्या रकमाही मोठ्या आहेत. अनेकांनी टर्म इन्शूरन्स काढलेले आहेत, तर काहींचे जीवन विमा व इतर पॉलिसी आहेत. 

इरडाने विमा कंपन्यांना या मृतांची नावे आपल्या डेटाशी जुळवून विम्याची रक्कम लगेचच द्यावी असे आदेश दिले आहेत. विमा कंपन्या देखील तयार आहेत परंतू त्यांच्यासमोर मोठी समस्या उभी राहिली आहे. कारण या अपघातात पतीची विमा पॉलिसी असेल तर त्याची नॉमिनी पत्नी देखील मृत झालेली आहे. तसेच काहींची पत्नी व मुले देखील मृत झालेली आहेत. अशावेळी एक दीर्घ प्रक्रिया करावी लागणार आहे. ज्यामुळे विमा क्लेम सेटलमेंटला वेळ लागण्याची शक्यता आहे. 

एलआयसीचे अधिकारी आशिष शुक्ला यांच्यानुसार कंपनीला आतापर्यंत १० दावे प्राप्त झाले आहेत. त्यात असा एक दावा आहे ज्यात नॉमिनी असलेल्या पत्नीचाही मृत्यू झालेला आहे. जर विमाधारक आणि नॉमिनी या दोघांचाही मृत्यू झाला असेल, तर आम्ही 'क्लास वन' वारसांची तपासणी करतो, जसे की त्यांची मुले. जर एकापेक्षा जास्त मुले असतील तर प्रत्येकाने परस्पर संमती पत्र द्यावे लागते आणि कंपनीला नुकसानभरपाईचा बाँड सादर करावा लागतो. 

अशाच प्रकारचा दावा इफ्को टोकियो, टाटा एआयजीला देखील मिळाला आहे. या कंपन्यांना इरडाचे स्पष्ट आदेश आहेत. कोणाचा दावा फेटाळायचा नाहीय की विलंबही करायचा नाहीय. यामुळे सर्वच विमा कंपन्यांनी अहमदाबादमध्ये हेल्प सेंटर उघडले आहेत. त्याद्वारे हे विम्याचे दावे सोडविले जात आहेत. परंतू, ही प्रक्रिया पार पाडायची असेल तर काही दाव्यांना विलंब होणार आहे.  

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाPlane Crashविमान दुर्घटनाahmedabadअहमदाबाद