शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह
3
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
4
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
5
हॉर्लिक्स, विक्स, झंडू बाम, डायपर, टुथपेस्ट... सर्वकाही स्वस्त; दिग्गज कंपन्यांनी जारी केली नवी लिस्ट
6
"एकटं वाटलं की मी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बसते...", रिंकूने सांगितलं कारण, म्हणाली...
7
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
8
‘टॅरिफ’मुळे प्लास्टिक उद्योग अडचणीत; ३ वर्षांत भारतातून इतर देशांमध्ये चौपटीने निर्यात वाढविण्याचे लक्ष्य
9
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
10
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
11
शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक; Sensex १४७ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; 'हे' प्रमुख स्टॉक्स घसरले
12
यूएई सामन्याआधी केलेलं नाटक पाकिस्तानच्या अंगलट, आयसीसीनं पाठवला ईमेल!
13
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
14
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
15
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
16
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
18
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
19
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
20
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!

एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 17:16 IST

Air India Plane Crash: जे भारतीय लोक लंडनला जात होते ते बऱ्यापैकी विमाधारक होते. त्यांच्या विम्याच्या रकमाही मोठ्या आहेत. अनेकांनी टर्म इन्शूरन्स काढलेले आहेत, तर काहींचे जीवन विमा व इतर पॉलिसी आहेत. 

एअर इंडियाच्या विमान अपघातात २७५ हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात विमानातून प्रवास करणारे सर्वच्या सर्व कुटुंब देखील संपले आहे. यामुळे विमा कंपन्यांसमोर पेच निर्माण झाला आहे. कारण विमाधारकासोबत त्यांनी दिलेल्या नॉमिनींचा देखील यात मृत्यू झाला आहे. यामुळे अशावेळी निर्माण होणारी गुंतागुंत कशी सोडवायची याच्या विवंचनेत या विमा कंपन्या आहेत. 

अहमदाबाद विमानतळाबाहेर झालेल्या या विमान अपघातात विमानातील २४१ तर घटनास्थळावरील २९ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ६० परदेशी नागरिक आहेत. परंतू, जे भारतीय लोक लंडनला जात होते ते बऱ्यापैकी विमाधारक होते. त्यांच्या विम्याच्या रकमाही मोठ्या आहेत. अनेकांनी टर्म इन्शूरन्स काढलेले आहेत, तर काहींचे जीवन विमा व इतर पॉलिसी आहेत. 

इरडाने विमा कंपन्यांना या मृतांची नावे आपल्या डेटाशी जुळवून विम्याची रक्कम लगेचच द्यावी असे आदेश दिले आहेत. विमा कंपन्या देखील तयार आहेत परंतू त्यांच्यासमोर मोठी समस्या उभी राहिली आहे. कारण या अपघातात पतीची विमा पॉलिसी असेल तर त्याची नॉमिनी पत्नी देखील मृत झालेली आहे. तसेच काहींची पत्नी व मुले देखील मृत झालेली आहेत. अशावेळी एक दीर्घ प्रक्रिया करावी लागणार आहे. ज्यामुळे विमा क्लेम सेटलमेंटला वेळ लागण्याची शक्यता आहे. 

एलआयसीचे अधिकारी आशिष शुक्ला यांच्यानुसार कंपनीला आतापर्यंत १० दावे प्राप्त झाले आहेत. त्यात असा एक दावा आहे ज्यात नॉमिनी असलेल्या पत्नीचाही मृत्यू झालेला आहे. जर विमाधारक आणि नॉमिनी या दोघांचाही मृत्यू झाला असेल, तर आम्ही 'क्लास वन' वारसांची तपासणी करतो, जसे की त्यांची मुले. जर एकापेक्षा जास्त मुले असतील तर प्रत्येकाने परस्पर संमती पत्र द्यावे लागते आणि कंपनीला नुकसानभरपाईचा बाँड सादर करावा लागतो. 

अशाच प्रकारचा दावा इफ्को टोकियो, टाटा एआयजीला देखील मिळाला आहे. या कंपन्यांना इरडाचे स्पष्ट आदेश आहेत. कोणाचा दावा फेटाळायचा नाहीय की विलंबही करायचा नाहीय. यामुळे सर्वच विमा कंपन्यांनी अहमदाबादमध्ये हेल्प सेंटर उघडले आहेत. त्याद्वारे हे विम्याचे दावे सोडविले जात आहेत. परंतू, ही प्रक्रिया पार पाडायची असेल तर काही दाव्यांना विलंब होणार आहे.  

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाPlane Crashविमान दुर्घटनाahmedabadअहमदाबाद