शहरं
Join us  
Trending Stories
1
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
2
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
3
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
4
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
5
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
6
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
7
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
8
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
9
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
10
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
11
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
12
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
13
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
14
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
15
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
16
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
17
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
18
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
19
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
20
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?

१२ वर्षांच्या पाकिस्तानी मुलासाठी सीमा उघडली; पित्याने म्हटले 'भारत महान आहे'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2020 16:32 IST

पाकिस्तानचा हा मुलगा कोणी राजनैतिक अधिकाऱ्याचा किंवा राजकीय नेत्याचा मुलगा नव्हता. पण दोन्ही देश त्याच्यासाठी दुश्मनी विसरले.

इस्लामाबाद : जम्मू काश्मीरमध्ये ३७० कलम हटविल्यानंतर कदाचित एकही दिवस असा नसेल की भारतपाकिस्तानच्या सीमेवर गोळीबार झाला नसेल. यामुळे दोन्ही देशांमधील तणाव एवढा वाढलेला आहे की तिथून केवळ पक्षीच ये जा करू शकतात. रेल्वे, बस सेवा बंद करून टाकलेल्या आहेत. नागरिकांची ये-जा ही थांबवलेली आहे. अशा काळात भारतानेपाकिस्तानच्या अवघ्या १२ वर्षांच्या मुलासाठी अटारी बॉर्डरवरील दरवाजे उघडत शत्रूत्व काहीकाळासाठी बाजुला ठेवले होते.

पाकिस्तानचा हा मुलगा कोणी राजनैतिक अधिकाऱ्याचा किंवा राजकीय नेत्याचा मुलगा नव्हता. तर त्याला हृदयरोग होता. साबीह शिराज असे या मुलाचे नाव आहे. त्याचा जीव वाचविण्यासाठी भारताने आपले हृदय विशाल करत पाकिस्तानच्या सर्व कूकर्मांकडे दुर्लक्ष केले. साबीहवर २५ फेब्रुवारीला हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली. साबीह त्याच्या आई-वडिलांसोबत १८ फेब्रुवारीला भारतात आला होता. त्याच्यावर नोएडातील जेपी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर साबीहला 16 मार्चपर्यंत निरिक्षणाखाली ठेवण्यात आले होते. १८ मार्चला त्याला सोडण्यात आले. मुलगा आणि आई वडील तिघेही अटारी बॉर्डरवर आले. मात्र, त्यांना पाकिस्तानात जाण्यासाठी खूप संकटांना सामोरे जावे लागले. 

साबीह याचे वडील शिराज अरशद यांनी सीमेपलिकडे जाण्यासाठी भारतीय इमिग्रेशन अधिकाऱ्यांना खूप विनंती केली. त्यांना मुलाची हृदय शस्त्रक्रिया झाल्याचेही सांगितले मात्र, त्यांनी नकार दिला. कारण पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी ४० काश्मीरी मुलींना भारतात पाठविण्यास नकार दिला होता. यावर भारताच्या जवानाने पाकिस्तानच्या इमिग्रेशन अधिकाऱ्याशी बोलण्यास सांगितले. मात्र तिथूनही नकारच आला. यानंतर शिराज यांनी पाकिस्तानच्या एका पत्रकाराला याची माहिती दिली. त्याने अमृतसरचे पत्रकार रविंदर सिंह रॉबिन यांच्या कानावर ही गोष्ट घातली. रॉबिन अटारी बॉर्डरवर मदतीसाठी पोहोचले मात्र, तोपर्यंत इमिग्रेशन अधिकारी निघून गेले होते. रॉबिन यांनी या कुटुंबाची अमृतसरच्या घरी राहण्याची सोय केली. 

दुसऱ्या दिवशी दोन्ही पत्रकारांनी आपापल्या देशांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. अखेर पाकिस्तानच्या दिल्लीतील दुतावासातून त्या तिघांना पाकिस्तानमध्ये जाण्यासाठी पास जारी करण्यात आले. दुसऱ्या दिवशी भारतीय जवानांनी आपल्याला प्रोटोकॉलनुसार पाकिस्तानच्या सीमेवर नेऊन सोडल्याचे शिराज यांनी सांगितले. आपल्या मुलाच्या उपचारासाठी भारताने शत्रूत्व बाजुला ठेवल्याचे उद्गार त्यांनी काढले. भारत हा महान देश आहे, आमचे हृदय जिकल्याचे, त्यांनी यावेळी म्हटले. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतJammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370Ceasefire Violationशस्त्रसंधी उल्लंघन