शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

१२ वर्षांच्या पाकिस्तानी मुलासाठी सीमा उघडली; पित्याने म्हटले 'भारत महान आहे'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2020 16:32 IST

पाकिस्तानचा हा मुलगा कोणी राजनैतिक अधिकाऱ्याचा किंवा राजकीय नेत्याचा मुलगा नव्हता. पण दोन्ही देश त्याच्यासाठी दुश्मनी विसरले.

इस्लामाबाद : जम्मू काश्मीरमध्ये ३७० कलम हटविल्यानंतर कदाचित एकही दिवस असा नसेल की भारतपाकिस्तानच्या सीमेवर गोळीबार झाला नसेल. यामुळे दोन्ही देशांमधील तणाव एवढा वाढलेला आहे की तिथून केवळ पक्षीच ये जा करू शकतात. रेल्वे, बस सेवा बंद करून टाकलेल्या आहेत. नागरिकांची ये-जा ही थांबवलेली आहे. अशा काळात भारतानेपाकिस्तानच्या अवघ्या १२ वर्षांच्या मुलासाठी अटारी बॉर्डरवरील दरवाजे उघडत शत्रूत्व काहीकाळासाठी बाजुला ठेवले होते.

पाकिस्तानचा हा मुलगा कोणी राजनैतिक अधिकाऱ्याचा किंवा राजकीय नेत्याचा मुलगा नव्हता. तर त्याला हृदयरोग होता. साबीह शिराज असे या मुलाचे नाव आहे. त्याचा जीव वाचविण्यासाठी भारताने आपले हृदय विशाल करत पाकिस्तानच्या सर्व कूकर्मांकडे दुर्लक्ष केले. साबीहवर २५ फेब्रुवारीला हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली. साबीह त्याच्या आई-वडिलांसोबत १८ फेब्रुवारीला भारतात आला होता. त्याच्यावर नोएडातील जेपी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर साबीहला 16 मार्चपर्यंत निरिक्षणाखाली ठेवण्यात आले होते. १८ मार्चला त्याला सोडण्यात आले. मुलगा आणि आई वडील तिघेही अटारी बॉर्डरवर आले. मात्र, त्यांना पाकिस्तानात जाण्यासाठी खूप संकटांना सामोरे जावे लागले. 

साबीह याचे वडील शिराज अरशद यांनी सीमेपलिकडे जाण्यासाठी भारतीय इमिग्रेशन अधिकाऱ्यांना खूप विनंती केली. त्यांना मुलाची हृदय शस्त्रक्रिया झाल्याचेही सांगितले मात्र, त्यांनी नकार दिला. कारण पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी ४० काश्मीरी मुलींना भारतात पाठविण्यास नकार दिला होता. यावर भारताच्या जवानाने पाकिस्तानच्या इमिग्रेशन अधिकाऱ्याशी बोलण्यास सांगितले. मात्र तिथूनही नकारच आला. यानंतर शिराज यांनी पाकिस्तानच्या एका पत्रकाराला याची माहिती दिली. त्याने अमृतसरचे पत्रकार रविंदर सिंह रॉबिन यांच्या कानावर ही गोष्ट घातली. रॉबिन अटारी बॉर्डरवर मदतीसाठी पोहोचले मात्र, तोपर्यंत इमिग्रेशन अधिकारी निघून गेले होते. रॉबिन यांनी या कुटुंबाची अमृतसरच्या घरी राहण्याची सोय केली. 

दुसऱ्या दिवशी दोन्ही पत्रकारांनी आपापल्या देशांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. अखेर पाकिस्तानच्या दिल्लीतील दुतावासातून त्या तिघांना पाकिस्तानमध्ये जाण्यासाठी पास जारी करण्यात आले. दुसऱ्या दिवशी भारतीय जवानांनी आपल्याला प्रोटोकॉलनुसार पाकिस्तानच्या सीमेवर नेऊन सोडल्याचे शिराज यांनी सांगितले. आपल्या मुलाच्या उपचारासाठी भारताने शत्रूत्व बाजुला ठेवल्याचे उद्गार त्यांनी काढले. भारत हा महान देश आहे, आमचे हृदय जिकल्याचे, त्यांनी यावेळी म्हटले. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतJammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370Ceasefire Violationशस्त्रसंधी उल्लंघन