शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

भारत जोडाेचा बूस्टर डोस! विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत कसोटी लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2023 06:22 IST

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी वेळोवेळी ही निवडणूक यात्रा नसून विचारधारेची यात्रा असल्याचे म्हटले होते.

नवी दिल्ली/जयपूर/भोपाळ : काँग्रेसने भारत जोडो यात्रेचे वर्णन ‘बूस्टर डोस’ असे केले आहे; परंतु, राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश, कर्नाटक या विधानसभा निवडणुका  होणाऱ्या राज्यांत ही यात्रा पक्षाला नवजीवन देण्यात यशस्वी हाेईल का, याची चर्चा सुरू झाली आहे.

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी वेळोवेळी ही निवडणूक यात्रा नसून विचारधारेची यात्रा असल्याचे म्हटले होते. असे असले तरी राजकीय पंडितांचे म्हणणे आहे की, तिची खरी कसोटी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान लागेल. या वर्षी नऊ राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यातील कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणा या चार राज्यांमधून ही यात्रा गेली.

राजस्थानचा प्रश्न कायम- कर्नाटक आणि मध्य प्रदेशसारख्या राज्यांमध्ये काँग्रेसला या यात्रेने थोडाफार फायदा झाल्याचे दिसते; परंतु, राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्या छावणीतील गटबाजी भारत जोडो यात्रेपुरती थंडावली होती, त्यानंतर ती सुरूच असल्याचे चित्र आहे. - पायलट गटाकडून त्यांना मुख्यमंत्री बनविण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. काँग्रेसला राज्यात पुन्हा सत्तेत यायचे असेल तर गेहलोत- पायलट प्रश्न सोडवावा लागेल, अन्यथा यात्रेचा फायदा शून्य ठरेल, असे पक्ष कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

संघटनात्मक ऐक्य महत्त्वाचेकन्याकुमारी ते काश्मीर या चार हजार किमीपेक्षा जास्त अंतराच्या या यात्रेने या राज्यांतील पक्ष कार्यकर्त्यांमध्ये नक्कीच उत्साह आणला आहे; पण त्याचा विधानसभा निवडणुकीवर परिणाम होईल की नाही हे संबंधित राज्य काँग्रेस पाठपुरावा ठेवू शकते का, यावर अवलंबून असेल. तसेच, पारंपरिकपणे गटबाजीने ग्रासलेल्या राजस्थान, कर्नाटक आणि तेलंगणा यांसारख्या राज्यांमध्ये संघटनात्मक ऐक्य हे एक महत्त्वाचे आव्हान आहे. 

भाजप देणार ‘शेतकरी यात्रे’ने उत्तर- आगामी विधानसभा आणि २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेऊन राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. ‘भारत जोडो’ यात्रा पूर्ण केलेल्या काँग्रेसकडून सध्या ‘हाथ से हाथ जोडो’ अभियान सुरू असताना, आता भाजपने २४ फेब्रुवारीपासून अर्थसंकल्पीय घोषणांच्या व्यापक प्रचारासाठी एक लाख गावांमध्ये पदयात्रा काढून, एक कोटी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.- भाजप किसान मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजकुमार चहर म्हणाले, अर्थसंकल्पातील घोषणा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ६ ते १२ फेब्रुवारीदरम्यान देशभरात ‘शेतकरी चावडी’चे आयोजन करण्यात येणार आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसPunjabपंजाब