शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

भारत जोडाेचा बूस्टर डोस! विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत कसोटी लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2023 06:22 IST

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी वेळोवेळी ही निवडणूक यात्रा नसून विचारधारेची यात्रा असल्याचे म्हटले होते.

नवी दिल्ली/जयपूर/भोपाळ : काँग्रेसने भारत जोडो यात्रेचे वर्णन ‘बूस्टर डोस’ असे केले आहे; परंतु, राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश, कर्नाटक या विधानसभा निवडणुका  होणाऱ्या राज्यांत ही यात्रा पक्षाला नवजीवन देण्यात यशस्वी हाेईल का, याची चर्चा सुरू झाली आहे.

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी वेळोवेळी ही निवडणूक यात्रा नसून विचारधारेची यात्रा असल्याचे म्हटले होते. असे असले तरी राजकीय पंडितांचे म्हणणे आहे की, तिची खरी कसोटी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान लागेल. या वर्षी नऊ राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यातील कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणा या चार राज्यांमधून ही यात्रा गेली.

राजस्थानचा प्रश्न कायम- कर्नाटक आणि मध्य प्रदेशसारख्या राज्यांमध्ये काँग्रेसला या यात्रेने थोडाफार फायदा झाल्याचे दिसते; परंतु, राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्या छावणीतील गटबाजी भारत जोडो यात्रेपुरती थंडावली होती, त्यानंतर ती सुरूच असल्याचे चित्र आहे. - पायलट गटाकडून त्यांना मुख्यमंत्री बनविण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. काँग्रेसला राज्यात पुन्हा सत्तेत यायचे असेल तर गेहलोत- पायलट प्रश्न सोडवावा लागेल, अन्यथा यात्रेचा फायदा शून्य ठरेल, असे पक्ष कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

संघटनात्मक ऐक्य महत्त्वाचेकन्याकुमारी ते काश्मीर या चार हजार किमीपेक्षा जास्त अंतराच्या या यात्रेने या राज्यांतील पक्ष कार्यकर्त्यांमध्ये नक्कीच उत्साह आणला आहे; पण त्याचा विधानसभा निवडणुकीवर परिणाम होईल की नाही हे संबंधित राज्य काँग्रेस पाठपुरावा ठेवू शकते का, यावर अवलंबून असेल. तसेच, पारंपरिकपणे गटबाजीने ग्रासलेल्या राजस्थान, कर्नाटक आणि तेलंगणा यांसारख्या राज्यांमध्ये संघटनात्मक ऐक्य हे एक महत्त्वाचे आव्हान आहे. 

भाजप देणार ‘शेतकरी यात्रे’ने उत्तर- आगामी विधानसभा आणि २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेऊन राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. ‘भारत जोडो’ यात्रा पूर्ण केलेल्या काँग्रेसकडून सध्या ‘हाथ से हाथ जोडो’ अभियान सुरू असताना, आता भाजपने २४ फेब्रुवारीपासून अर्थसंकल्पीय घोषणांच्या व्यापक प्रचारासाठी एक लाख गावांमध्ये पदयात्रा काढून, एक कोटी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.- भाजप किसान मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजकुमार चहर म्हणाले, अर्थसंकल्पातील घोषणा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ६ ते १२ फेब्रुवारीदरम्यान देशभरात ‘शेतकरी चावडी’चे आयोजन करण्यात येणार आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसPunjabपंजाब