शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

"२०१४ च्या निवडणुकांतील पराभवास सोनिया गांधी, मनमोहन सिंगच जबाबदार"

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2020 06:57 IST

माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या नव्या पुस्तकातील दावा

नवी दिल्ली : माझी राष्ट्रपतीपदी निवड झाल्यानंतर काँग्रेसने राजकीय दिशा गमावली, असा खळबळजनक दावा दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या ‘द प्रेसिडेन्शियल ईअर्स’ या नव्या पुस्तकात करण्यात आला आहे. २०१४च्या लोकसभा निवडणुकांत काँग्रेसच्या झालेल्या दारुण पराभवाला सोनिया गांधीमनमोहन सिंग हेच जबाबदार असल्याचेही मुखर्जी यांनी म्हटले आहे.रूपा पब्लिकेशनतर्फे हे नवे पुस्तक जानेवारी महिन्यामध्ये प्रसिद्ध होणार आहे. त्या पुस्तकात मुखर्जी यांनी म्हटले आहे की, २००४ साली जर माझ्याकडे पंतप्रधानपदाची जबाबदारी सोपविली असती तर २०१४ साली काँग्रेसला पराभव पत्करावा लागला नसता असे त्या पक्षातील काही नेत्यांचे मत होते. मी मनमोहन सिंग यांच्यापेक्षा अधिक उत्तम पंतप्रधान होऊ शकलो असतो, असे मुखर्जी यांनी या पुस्तकात सुचविले आहे. प्रणब मुखर्जी यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान व त्यांच्या कारभाराचे प्रतिबिंब देशाच्या स्थितीत उमटते. मनमोहन सिंग हे आघाडी वाचविण्यात मश्गुल होते व त्याचा परिणाम कारभारावर झाला. सोनिया गांधी काँग्रेस पक्षाचा कारभार हाकण्यास असमर्थ ठरत होत्या तर मनमोहन सिंग यांच्या संसदेतील मोठ्या अनुपस्थितीमुळे त्यांचा खासदारांशी व्यक्तिगत संपर्कही फारसा राहिला नाही. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांनी २०१५ साली केलेल्या भारत दौऱ्याच्या आठवणीही प्रणब मुखर्जी यांनी या पुस्तकात सांगितल्या आहेत.मोदींचा कारभार काहीसा हुकूमशाही पद्धतीचाप्रणब मुखर्जी यांनी नव्या पुस्तकात म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात काहीशा हुकूमशाही पद्धतीने कारभार करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या परिणामी सरकार, विधिमंडळ, न्याययंत्रणा यांच्यातील संबंध ताणले गेले. अशा गोष्टींबाबत पंतप्रधान मोदी यांनी दुसऱ्या कार्यकाळात सामंजस्याची भूमिका घेतली आहे का, याचे उत्तर येणारा काळच देईल. 

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीPranab Mukherjeeप्रणव मुखर्जीManmohan Singhमनमोहन सिंगcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी