शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
12
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
13
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
14
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
15
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
16
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
17
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
18
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
19
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 

अवकाशात हाडे ठिसूळ होतात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2024 11:45 IST

भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स अन्य एका सहकाऱ्यासह तिसऱ्यांदा अवकाशात ५ जून २०२४ रोजी झेपावल्या होत्या. विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना घेऊन जाणारे बोईंगचे स्टारलाइनर अवकाशात गेले. आता त्यांना आयएसएस (इंटरनॅशनल स्पेस सेंटर) मधून परत येण्यात अडचण येत आहे. अंतराळयानात हेलियमची गळती होत असल्याने त्यांना तिथेच राहावे लागत आहे. गळती थांबवून त्यांना लवकर परत आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

लीना बोकील, अंतराळ आणि खगोलशास्त्र अभ्यासकआयएसएस हे पृथ्वीपासून ३५० ते ४०० कि.मी.वर अवकाशात फिरत राहते. स्पेस सेंटर म्हणजे फिरती प्रयोगशाळा आहे. अवकाशात हे सेंटर पृथ्वीभोवती फिरते. एका तासात ५८ हजार किलोमीटर अंतर ते सेंटर कापते.

दोघे ज्या यानात गेले, त्यातील थ्रस्टरमध्ये गळती होत आहे. या यानात २८ थ्रस्टर आहेत. थ्रस्टर म्हणजे इंजिनसारखे. त्या थ्रस्टरची दुरुस्ती होत आहे. एक तर तिथले तापमान विचित्र असते. खूपजण विचारतात की, समस्या येणार असल्याचे लक्षात आले नाही का, तिथे समस्या का आली, तर असे होते की, तिथल्या वातावरणात काय अडचणी येतील, ते इथे पृथ्वीवरून कळत नाही. सर्व थ्रस्टर तपासून पाठवलेले असतात. इथे जी समस्या आली नाही, ती तिथे आली. ‘नासा’मध्ये बसलेले इंजिनिअर हे त्याची दुरुस्ती करत आहेत. हे काम संगणकीय प्रणालीद्वारे होत असते. 

४ ऑगस्टला, म्हणजे आज सुनीता विलियम्सला अंतराळात दाेन महिने पूर्ण हाेतील.

अंतराळवीरांच्या सुरक्षेची काळजीस्पेस सेंटरमध्ये पूर्वीपासून काही अंतराळवीर आहेत, त्यांना हे दोघे मदत करत आहेत. ते काही दिवसांत परत येणार होते, पण ४० दिवस होऊनही अजून तिथेच आहेत. खरं तर या उशिराने त्यांना काही धोका नाही. इंधन संपले तरी त्यांना पुरवले जाते. स्पेस सेंटरला नेहमीच सर्व गोष्टी पुरविल्या जातात. त्यामुळे त्यांना खाण्यापिण्याची कमतरता नाही.

अंतराळवीर जेव्हा अवकाशात जातात, तेव्हा त्यांच्या सुरक्षेला खूप महत्त्व दिलेले असते. यापूर्वी कोलंबिया यान पडले होते. त्यात आपल्या कल्पना चावला मृत्युमुखी पडल्या होत्या. त्यामुळे आता अंतराळवीरांची खूप काळजी घेतली जाते. 

गुरुत्वाकर्षण नसल्याचा शरीरावर हाेताे परिणाम- अवकाशात गुरुत्वाकर्षण नाही. त्यामुळे पायांचे स्नायू काम करत नाहीत. पृथ्वीवर आपल्या गुडघ्यांवर सर्व ताण येत असतो, पण तिथे काहीच होत नाही. तिथे ते तरंगत राहतात. त्यांच्या शरीराची हालचाल होत नसते. त्यामुळे त्यांची हाडे ठिसूळ होण्याचा धोका असतो; कारण ते कार्यरत नसतात. कॅल्शिअम कमी होत जाते. - चाळिशी किंवा पन्नाशीनंतर पण हे अंतराळवीर खूप फिट असतात; परंतु, तिथे जाऊन आल्यावर हाडांची समस्या जाणवू लागते. म्हणून त्यांना तिथे आहार आणि डाएट वेळच्या वेळी घ्यावा लागतो.  - अतिशय कमी पाणी ते पितात. इथे आपल्याला भूक लागते. तिथे खूप कमी खातात. त्यांचा नेहमीचा आहार कमीच असतो. तिथले वातावरण हे २४ तास एकच असते. - पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे शरीरातील रक्त पायाकडे प्रवाही होत असते, पण स्पेसमध्ये रक्तप्रवाह डोक्याकडे जात असतो. त्यामुळे डोळ्यांवर आणि मेंदूवर अधिक ताण येतो. जेव्हा हे अंतराळवीर परत येतात, तेव्हा त्यांना क्वारंटाइन केले जाते. त्यांना परत सर्व गोष्टी हळूहळू दिल्या जातात.

भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स अन्य एका सहकाऱ्यासह तिसऱ्यांदा अवकाशात ५ जून २०२४ रोजी झेपावल्या होत्या. विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना घेऊन जाणारे बोईंगचे  स्टारलाइनर अवकाशात गेले. आता त्यांना आयएसएस (इंटरनॅशनल स्पेस सेंटर) मधून परत येण्यात अडचण येत आहे. अंतराळयानात हेलियमची गळती होत असल्याने त्यांना तिथेच राहावे लागत आहे. गळती थांबवून त्यांना लवकर परत आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. 

२००३ साली १ फेब्रुवारी राेजी काेलंबिया या अंतराळ यानाचा अपघात हाेऊन त्यातील कल्पना चावलासह ७ अंतराळवीर मृत्यूमुखी पडले हाेते. 

पाण्याविना राेप वाढवण्याचे प्रयत्नशून्य गुरुत्वाकर्षणामध्ये सिंचन कसे होते? त्याचा प्रयोग केला जात आहे. अंतराळात पाण्याविना रोप वाढविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.आपण जेव्हा चंद्रावर, मंगळ ग्रहावर जाऊन राहिलो, तर तिथे वृक्ष, पिके हवीत. म्हणून तसा प्रयोग स्पेस सेंटरमध्ये केला जात आहे. १८ दिवसांची मुदत- आता १८ दिवसांच्या आत त्यांनी परत यायचे आहे; कारण रशियाच्या यानातून त्यांचे दोन अंतराळवीर जाणार आहेत.- ते तिथे गेल्यावर गर्दी होईल. म्हणून रशियाचे दोघे गेल्यानंतर सुनीता विल्यम्स आणि त्यांचा सहकारी परत येणार आहे.  

टॅग्स :NASAनासा