शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
2
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
3
जिथे INS विक्रांतचा तळ, जवळच अणुकेंद्र, तिथे उडत उडत पोहोचला चिनी हेर, असा सापडला जाळ्यात
4
SMAT 2025 Final Live Streaming : पुण्याच्या मैदानात रंगणार फायनलचा थरार! ईशान किशन कॅप्टन्सीत इतिहास रचणार?
5
पोर्टफोलिओ करा स्ट्रॉन्ग! ऑटोपासून हेल्थकेअरपर्यंत 'हे' ५ शेअर्स देणार बंपर परतावा; पाहा सविस्तर विश्लेषण
6
"युती झाली नसती तर शिंदेसेनेत..."; मंत्री प्रताप सरनाईक यांचं भाजपा महायुतीबाबत मोठं विधान
7
अति घाई, संकटात नेई! स्कूटी-कारची जोरदार धडक; Video पाहून तुम्हीच सांगा चूक नेमकी कोणाची?
8
'ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेशी युती नको'; भाजप पदाधिकाऱ्यांचा एकत्र लढण्याला विरोध, जिल्हाध्यक्षांना पत्र
9
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली! जाणून घ्या, योजनेसंदर्भात सविस्तर
10
७.५ कोटी प्रवाशांना लाभ, १६४ सेवा, भारतीयांसाठी ‘वंदे भारत’ वरदान; मेक इन इंडियाचा चमत्कार!
11
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
12
मनगटावर 'कोटींची' माया! श्रीमंतांमध्ये का वाढतेय 'रिचर्ड मिल'ची क्रेझ? वाचा, ११ कोटींच्या घड्याळाचे गुपित
13
इन्स्टाग्रामवर मुलींशी मैत्री! तीन मैत्रिणींना घेऊन जात असताना शिर्डीत नीरजवर चॉपरने जीवघेणा हल्ला
14
Gold Silver Price Today: चांदीचा नवा विक्रम, सोन्याचे दरही गगनाला भिडले; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट किंमत
15
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
16
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
17
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
18
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
19
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
20
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
Daily Top 2Weekly Top 5

अवकाशात हाडे ठिसूळ होतात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2024 11:45 IST

भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स अन्य एका सहकाऱ्यासह तिसऱ्यांदा अवकाशात ५ जून २०२४ रोजी झेपावल्या होत्या. विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना घेऊन जाणारे बोईंगचे स्टारलाइनर अवकाशात गेले. आता त्यांना आयएसएस (इंटरनॅशनल स्पेस सेंटर) मधून परत येण्यात अडचण येत आहे. अंतराळयानात हेलियमची गळती होत असल्याने त्यांना तिथेच राहावे लागत आहे. गळती थांबवून त्यांना लवकर परत आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

लीना बोकील, अंतराळ आणि खगोलशास्त्र अभ्यासकआयएसएस हे पृथ्वीपासून ३५० ते ४०० कि.मी.वर अवकाशात फिरत राहते. स्पेस सेंटर म्हणजे फिरती प्रयोगशाळा आहे. अवकाशात हे सेंटर पृथ्वीभोवती फिरते. एका तासात ५८ हजार किलोमीटर अंतर ते सेंटर कापते.

दोघे ज्या यानात गेले, त्यातील थ्रस्टरमध्ये गळती होत आहे. या यानात २८ थ्रस्टर आहेत. थ्रस्टर म्हणजे इंजिनसारखे. त्या थ्रस्टरची दुरुस्ती होत आहे. एक तर तिथले तापमान विचित्र असते. खूपजण विचारतात की, समस्या येणार असल्याचे लक्षात आले नाही का, तिथे समस्या का आली, तर असे होते की, तिथल्या वातावरणात काय अडचणी येतील, ते इथे पृथ्वीवरून कळत नाही. सर्व थ्रस्टर तपासून पाठवलेले असतात. इथे जी समस्या आली नाही, ती तिथे आली. ‘नासा’मध्ये बसलेले इंजिनिअर हे त्याची दुरुस्ती करत आहेत. हे काम संगणकीय प्रणालीद्वारे होत असते. 

४ ऑगस्टला, म्हणजे आज सुनीता विलियम्सला अंतराळात दाेन महिने पूर्ण हाेतील.

अंतराळवीरांच्या सुरक्षेची काळजीस्पेस सेंटरमध्ये पूर्वीपासून काही अंतराळवीर आहेत, त्यांना हे दोघे मदत करत आहेत. ते काही दिवसांत परत येणार होते, पण ४० दिवस होऊनही अजून तिथेच आहेत. खरं तर या उशिराने त्यांना काही धोका नाही. इंधन संपले तरी त्यांना पुरवले जाते. स्पेस सेंटरला नेहमीच सर्व गोष्टी पुरविल्या जातात. त्यामुळे त्यांना खाण्यापिण्याची कमतरता नाही.

अंतराळवीर जेव्हा अवकाशात जातात, तेव्हा त्यांच्या सुरक्षेला खूप महत्त्व दिलेले असते. यापूर्वी कोलंबिया यान पडले होते. त्यात आपल्या कल्पना चावला मृत्युमुखी पडल्या होत्या. त्यामुळे आता अंतराळवीरांची खूप काळजी घेतली जाते. 

गुरुत्वाकर्षण नसल्याचा शरीरावर हाेताे परिणाम- अवकाशात गुरुत्वाकर्षण नाही. त्यामुळे पायांचे स्नायू काम करत नाहीत. पृथ्वीवर आपल्या गुडघ्यांवर सर्व ताण येत असतो, पण तिथे काहीच होत नाही. तिथे ते तरंगत राहतात. त्यांच्या शरीराची हालचाल होत नसते. त्यामुळे त्यांची हाडे ठिसूळ होण्याचा धोका असतो; कारण ते कार्यरत नसतात. कॅल्शिअम कमी होत जाते. - चाळिशी किंवा पन्नाशीनंतर पण हे अंतराळवीर खूप फिट असतात; परंतु, तिथे जाऊन आल्यावर हाडांची समस्या जाणवू लागते. म्हणून त्यांना तिथे आहार आणि डाएट वेळच्या वेळी घ्यावा लागतो.  - अतिशय कमी पाणी ते पितात. इथे आपल्याला भूक लागते. तिथे खूप कमी खातात. त्यांचा नेहमीचा आहार कमीच असतो. तिथले वातावरण हे २४ तास एकच असते. - पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे शरीरातील रक्त पायाकडे प्रवाही होत असते, पण स्पेसमध्ये रक्तप्रवाह डोक्याकडे जात असतो. त्यामुळे डोळ्यांवर आणि मेंदूवर अधिक ताण येतो. जेव्हा हे अंतराळवीर परत येतात, तेव्हा त्यांना क्वारंटाइन केले जाते. त्यांना परत सर्व गोष्टी हळूहळू दिल्या जातात.

भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स अन्य एका सहकाऱ्यासह तिसऱ्यांदा अवकाशात ५ जून २०२४ रोजी झेपावल्या होत्या. विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना घेऊन जाणारे बोईंगचे  स्टारलाइनर अवकाशात गेले. आता त्यांना आयएसएस (इंटरनॅशनल स्पेस सेंटर) मधून परत येण्यात अडचण येत आहे. अंतराळयानात हेलियमची गळती होत असल्याने त्यांना तिथेच राहावे लागत आहे. गळती थांबवून त्यांना लवकर परत आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. 

२००३ साली १ फेब्रुवारी राेजी काेलंबिया या अंतराळ यानाचा अपघात हाेऊन त्यातील कल्पना चावलासह ७ अंतराळवीर मृत्यूमुखी पडले हाेते. 

पाण्याविना राेप वाढवण्याचे प्रयत्नशून्य गुरुत्वाकर्षणामध्ये सिंचन कसे होते? त्याचा प्रयोग केला जात आहे. अंतराळात पाण्याविना रोप वाढविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.आपण जेव्हा चंद्रावर, मंगळ ग्रहावर जाऊन राहिलो, तर तिथे वृक्ष, पिके हवीत. म्हणून तसा प्रयोग स्पेस सेंटरमध्ये केला जात आहे. १८ दिवसांची मुदत- आता १८ दिवसांच्या आत त्यांनी परत यायचे आहे; कारण रशियाच्या यानातून त्यांचे दोन अंतराळवीर जाणार आहेत.- ते तिथे गेल्यावर गर्दी होईल. म्हणून रशियाचे दोघे गेल्यानंतर सुनीता विल्यम्स आणि त्यांचा सहकारी परत येणार आहे.  

टॅग्स :NASAनासा