शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

ज्या नमाजामुळे लोकांना त्रास होतो, तो नमाज योग्य नाही- सोनू निगम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 22:05 IST

उद्यानातील नमाजावर सोनू निगमचं परखड भाष्य

मुंबई: उत्तर प्रदेशातील नोएडामधील एका उद्यानात केल्या जाणाऱ्या नमाज पठणावर प्रशासनानं बंदी घातल्यानंतर यावरुन राजकारण तापलं. या मुद्द्यावरुन विविध राजकीय पक्षांकडून विधानं केली जात आहेत. याआधी अजानच्या आवाजावर टीका करणाऱ्या गायक सोनू निगमनंदेखील यावर भाष्य केलं आहे. ज्या ठिकाणच्या नमाजामुळे लोकांना त्रास होतो, तो नमाज योग्य नाही, असं सोनू निगमनं म्हटलं आहे. हिंदी वृत्तवाहिनी 'आज तक'च्या एका कार्यक्रमात सोनू निगम सहभागी झाला होता. यावेळी उत्तर प्रदेशातील नोएडामधील घटनेवर सोनूनं आपलं मत व्यक्त केलं. 'रस्त्यावर गोंधळ घालण्याला मी धर्म मानत नाही. जे चूक आहे, ते चूकच आहे आणि ते बंद करायला हवं. कायदा सर्वांसाठी समान आहे,' असं सोनू म्हणाला. कोणताही धर्म हे करत असला तरी जे चूक आहे ते चूकच असेल, असंदेखील तो म्हणाला. 'सार्वजनिक ठिकाणं ही जनतेची असतात. त्या ठिकाणी हिंदू जातात, मुस्लिम जातात आणि नास्तिकदेखील जातात. त्या ठिकाणी धर्माला मानणारे जातात आणि धर्म न मानणारेही जातात. मग एका धर्माला उद्यान कसं काय दिलं जाऊ शकतं?' असा सवाल त्यानं उपस्थित केला. आम्ही फार आधीपासून उद्यानात नमाज पठणाला येतो असा स्थानिकांचा दावा आहे, याबद्दल तुम्हाला काय वाटतं, असा प्रश्न सूत्रसंचालकानं सोनूला विचारला. यावर सती प्रथा पण फार पूर्वीपासून सुरू होती. बालविवाहची प्रथादेखील अतिशय आधीपासून सुरू होती, असं सोनू म्हणाला. माझा कोणत्याही पक्षाशी संबंध नाही. फक्त लोकांनी थोडं सजग व्हायला हवं, असं आवाहन त्यानं केलं.  

टॅग्स :Sonu nigamसोनू निगमMuslimमुस्लीमHinduहिंदूUttar Pradeshउत्तर प्रदेश