शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

सर्जिकल स्ट्राईकनंतर मृतदेह ट्रकमध्ये भरुन नेले - प्रत्यक्षदर्शींची माहिती

By admin | Updated: October 5, 2016 11:23 IST

भारतीय लष्कराच्या स्पेशल फोर्सेसच्या कमांडोनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवादी तळांवर केलेल्या कारवाईवरुन देशात सध्या राजकारण सुरु आहे.

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. ५ - भारतीय लष्कराच्या स्पेशल फोर्सेसच्या कमांडोनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवादी तळांवर केलेल्या कारवाईवरुन देशात सध्या राजकारण सुरु आहे. भारतीय लष्कराने अशी कुठलीही सर्जिकल स्ट्राईक केली नसल्याचा पाकिस्तानी लष्कराचा दावा आहे तर, भारतातील काही मूठभर राजकारणी या कारवाईचे पुरावे मागत आहेत. 
 
त्या पार्श्वभूमीवर पाकव्याप्त काश्मीरमध्ये रहाणा-या प्रत्यक्षदर्शींनी भारतीय लष्कराच्या कारवाईत दहशतवाद्यांसह त्यांचे तळ उद्धवस्त झाल्याची माहिती दिली आहे. २९ सप्टेंबरची सकाळ होण्याआधीच जे दहशतवादी या कारवाईत मारले गेले त्यांचे मृतदेह ट्रकमध्ये भरुन अज्ञात स्थळी नेण्यात आले. तिथे या मृतदेहांचे दफन करण्यात आले. 
 
आणखी वाचा 
 
इंडियन एक्सप्रेस या वर्तमानपत्राने नियंत्रण रेषेपलीकडे रहाणा-या नागरीकांशी संर्पक साधून याबद्दल माहिती जाणून घेतली. दहशतवादी भारताच्या हद्दीत घुसखोरी करण्यासाठी जिथे थांबायचे ती इमारत स्पेशल फोर्सेच्या कमांडोनी नष्ट केली. इंडियन एक्सप्रेसने प्रत्यक्षदर्शी आणि गुप्तचर यंत्रणांकडून जी माहिती मिळवलीय त्यानुसार या कारवाईत ३८ पेक्षा कमी दहशतवादी मारले गेलेत. 
 
सीमेजवळच्या गावातील भारतीय नागरीकांचे काही नातेवाईक पाकव्याप्त काश्मीरमध्ये रहातात. इंडियन एक्सप्रेसने सीमेवरील गावक-यांच्या मदतीने पाकव्याप्त काश्मीरमध्ये रहाणा-या त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला.  चॅटवरुन त्यांना काही प्रश्न विचारले. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांची नावे गुप्त ठेवण्यात आली आहेत. 
 
नियंत्रण रेषेपासून ४ किमी अंतरावरील दुधनियाल या खेडेगावातील मुख्य बाजारातून दोन प्रत्यक्षदर्शींनी काही इमारती आगीत भस्मसात झाल्याचे पाहिले. येथील अलहवाई ब्रिज शेवटचे ठिकाण आहे जिथे दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्यापूर्वी सर्व साहित्य पुरवले जाते. मध्यरात्री या भागात गोळीबार आणि स्फोटाचे मोठे आवज झाल्याचे प्रत्यशदर्शीनी स्थानिकांच्या हवाल्याने सांगितले. 
 
रात्री गोळीबाराच्या आवाजामुळे येथील लोक बाहेर पडले नाहीत त्यामुळे त्यांनी भारतीय सैनिकांना पाहिले नाही. पाच ते सहा मृतदेह ट्रकमध्ये भरुन चालहाना येथील लष्कर-ए-तोयबाच्या तळावर नेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी  सांगितले. 
 
दुस-यादिवशी शुक्रवारी चालहाना येथील एका मशिदीत साथीदारांच्या मृत्यूचा बदला घेण्याची शपथ घेण्यात आली असे प्रत्यक्षदर्शींना स्थानिकांकडून माहिती देण्यात आली. या दहशतवाद्यांनी सीमेचे संरक्षण करण्यात कमी पडल्याबद्दल पाकिस्तानी लष्कराला दोष दिला. भारताच्या या कारवाईमुळे मात्र लष्कर आणि अन्य दहशतवादी गटांना मोठा धक्का बसला आहे.