शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

सर्जिकल स्ट्राईकनंतर मृतदेह ट्रकमध्ये भरुन नेले - प्रत्यक्षदर्शींची माहिती

By admin | Updated: October 5, 2016 11:23 IST

भारतीय लष्कराच्या स्पेशल फोर्सेसच्या कमांडोनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवादी तळांवर केलेल्या कारवाईवरुन देशात सध्या राजकारण सुरु आहे.

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. ५ - भारतीय लष्कराच्या स्पेशल फोर्सेसच्या कमांडोनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवादी तळांवर केलेल्या कारवाईवरुन देशात सध्या राजकारण सुरु आहे. भारतीय लष्कराने अशी कुठलीही सर्जिकल स्ट्राईक केली नसल्याचा पाकिस्तानी लष्कराचा दावा आहे तर, भारतातील काही मूठभर राजकारणी या कारवाईचे पुरावे मागत आहेत. 
 
त्या पार्श्वभूमीवर पाकव्याप्त काश्मीरमध्ये रहाणा-या प्रत्यक्षदर्शींनी भारतीय लष्कराच्या कारवाईत दहशतवाद्यांसह त्यांचे तळ उद्धवस्त झाल्याची माहिती दिली आहे. २९ सप्टेंबरची सकाळ होण्याआधीच जे दहशतवादी या कारवाईत मारले गेले त्यांचे मृतदेह ट्रकमध्ये भरुन अज्ञात स्थळी नेण्यात आले. तिथे या मृतदेहांचे दफन करण्यात आले. 
 
आणखी वाचा 
 
इंडियन एक्सप्रेस या वर्तमानपत्राने नियंत्रण रेषेपलीकडे रहाणा-या नागरीकांशी संर्पक साधून याबद्दल माहिती जाणून घेतली. दहशतवादी भारताच्या हद्दीत घुसखोरी करण्यासाठी जिथे थांबायचे ती इमारत स्पेशल फोर्सेच्या कमांडोनी नष्ट केली. इंडियन एक्सप्रेसने प्रत्यक्षदर्शी आणि गुप्तचर यंत्रणांकडून जी माहिती मिळवलीय त्यानुसार या कारवाईत ३८ पेक्षा कमी दहशतवादी मारले गेलेत. 
 
सीमेजवळच्या गावातील भारतीय नागरीकांचे काही नातेवाईक पाकव्याप्त काश्मीरमध्ये रहातात. इंडियन एक्सप्रेसने सीमेवरील गावक-यांच्या मदतीने पाकव्याप्त काश्मीरमध्ये रहाणा-या त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला.  चॅटवरुन त्यांना काही प्रश्न विचारले. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांची नावे गुप्त ठेवण्यात आली आहेत. 
 
नियंत्रण रेषेपासून ४ किमी अंतरावरील दुधनियाल या खेडेगावातील मुख्य बाजारातून दोन प्रत्यक्षदर्शींनी काही इमारती आगीत भस्मसात झाल्याचे पाहिले. येथील अलहवाई ब्रिज शेवटचे ठिकाण आहे जिथे दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्यापूर्वी सर्व साहित्य पुरवले जाते. मध्यरात्री या भागात गोळीबार आणि स्फोटाचे मोठे आवज झाल्याचे प्रत्यशदर्शीनी स्थानिकांच्या हवाल्याने सांगितले. 
 
रात्री गोळीबाराच्या आवाजामुळे येथील लोक बाहेर पडले नाहीत त्यामुळे त्यांनी भारतीय सैनिकांना पाहिले नाही. पाच ते सहा मृतदेह ट्रकमध्ये भरुन चालहाना येथील लष्कर-ए-तोयबाच्या तळावर नेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी  सांगितले. 
 
दुस-यादिवशी शुक्रवारी चालहाना येथील एका मशिदीत साथीदारांच्या मृत्यूचा बदला घेण्याची शपथ घेण्यात आली असे प्रत्यक्षदर्शींना स्थानिकांकडून माहिती देण्यात आली. या दहशतवाद्यांनी सीमेचे संरक्षण करण्यात कमी पडल्याबद्दल पाकिस्तानी लष्कराला दोष दिला. भारताच्या या कारवाईमुळे मात्र लष्कर आणि अन्य दहशतवादी गटांना मोठा धक्का बसला आहे.