शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मंदीत नोटाबंदी आगीत तेल ओतण्यासारखीच; यशवंत सिन्हांचा मोदी सरकारला घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2017 12:52 IST

सरकारने नोटाबंदीचा घेतलेला निर्णय हा आगीत तेल ओतण्यासारखाच आहे, अशी टीका भाजपा नेते यशवंत सिन्हा केली आहे.

ठळक मुद्दे सरकारने नोटाबंदीचा घेतलेला निर्णय हा आगीत तेल ओतण्यासारखाच आहे, अशी टीका भाजपा नेते यशवंत सिन्हा केली आहे.नोटाबंदीच्या घेतलेल्या निर्णयवार टीका करून यशवंत सिन्हा यांनी मोदी सरकारला घरचा आहेर दिला आहे. यशवंत सिन्हा यांनी त्यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावरही हल्लाबोल केला आहे.

नवी दिल्ली-  देशाचा जीडीपी सातत्याने घसरतो आहे. त्यामुळे आर्थिक मंदीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. जीडीपीची घसरण होत असताना सरकारने नोटाबंदीचा घेतलेला निर्णय हा आगीत तेल ओतण्यासारखाच आहे, अशी टीका भाजपा नेते यशवंत सिन्हा केली आहे. नोटाबंदीच्या घेतलेल्या निर्णयवार टीका करून यशवंत सिन्हा यांनी मोदी सरकारला घरचा आहेर दिला आहे. यावेळी यशवंत सिन्हा यांनी त्यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावरही हल्लाबोल केला आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.

माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी सध्याच्या आर्थिक मंदीसदृश्य परिस्थितीवरही चिंता व्यक्त केली. आपल्या अर्थमंत्र्यांनी अर्थव्यवस्थेला चौपट करण्याचं काम केलं आहे. यामुद्द्यावर मी बोलायचा ऐवजी जर गप्प बसलो तर राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यात मी अपयशी ठरेल. त्यामुळे आता मला बोलावंच लागेल, असं म्हणत सिन्हा यांनी अरूण जेटलींवर टीका केली आहे. पक्षाविरोधात बोलण्याची हिंमत न करणारे लोक माझ्या या वक्तव्याने दुखावले जातील याची कल्पना असल्याचंही सिन्हा म्हणाले आहेत. अरुण जेटली या सरकारमधील सक्षम मंत्री असल्याचं समजलं जातं. २०१४ मध्ये भाजपा सरकारमध्ये अरुण जेटलींनाच अर्थमंत्रिपद दिलं जाईल, असे बोललं जात होतं. त्यांची पात्रता पाहता त्यांच्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थ मंत्रालय, संरक्षण आणि कंपनी व्यवहार मंत्रालयाची जबाबदारी सोपवली होती, असंही ते म्हणाले. अर्थ मंत्रालयाचे काम किती कठिण आहे याची मलाही जाणीव आहे. २४ तास काम करावं लागतं. याचाच अर्थ सुपरमॅन अरुण जेटलींनाही हे काम कठिण वाटलं असेल, असं सिन्हा म्हणाले आहेत. 

कच्चा तेलाच्या वाढत्या किंमती आणि बँकांच्या वाढत्या एनपीएवर यशवंत सिन्हा यांनी चिंता व्यक्त केली आहे. या समस्यांना चांगल्या पद्धतीने हाताळता आल्या असत्या, असंही सिन्हा म्हणाले. खासगी गुंतवणुकीत घट झाली आहे. गेल्या दोन दशकांत इतकी कमी गुंतवणूक कधीच झाली नव्हती. औद्योगिक उत्पादनही खूपच घसरलं आहे. कृषी क्षेत्र संकटात आहे तसंच उत्पादन, रोजगार, सेवा ही क्षेत्रंही संकटात आहेत. निर्यात ठप्प झाली आहे. जवळपास सर्वच क्षेत्रांची हीच परिस्थिती आहे, अशा महत्त्वाच्या मुद्द्यांकडे यशवंत सिन्हा यांनी लक्ष वेधलं आहे. 

नोटाबंदीचा निर्णय हे तर आर्थिक संकट असल्याचं सिद्ध झालं आहे. सरकारकडून नोटाबंदीचा निर्णय खूप चुकीच्या पद्धतीने लागू करण्यात आला. जीएसटीमुळे व्यापाऱ्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. अनेक उद्योग बंद पडले. रोजगार क्षेत्रावर परिणाम झाला. अनेकांनी नोकऱ्या गमावल्या आहेत. आर्थिक विकास दरात त्यामुळे सातत्याने घट होते आहे. जीडीपी 5.7 टक्क्यांवर आला. नोटाबंदीमुळे ही परिस्थिती निर्माण झाली नाही, असं सरकारच्या प्रवक्त्यांकडून सांगितलं जातं. नोटाबंदीने तर या आगीत तेल ओतण्याचं काम केलं आहे, अशी थेट टीका यशवंत सिन्हा यांनी केली आहे.