शहरं
Join us  
Trending Stories
1
एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
2
अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप
3
मोठी दुर्घटना: पुलावरच दोन बसची समोरासमोर धडक; एका नेपाळी महिलेचा मृत्यू, ३५ हून अधिक प्रवासी जखमी
4
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
5
Asia Cup Rising Stars 2025 : विदर्भकराची मॅच विनिंग फिफ्टी! भारतीय संघाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
6
डॉ. उमरला करायचा होता 9/11 सारखा घातपात, पण मुजम्मिल सोबत झाले मतभेद अन् फेल झाला संपूर्ण मनसुबा!
7
ऑटोमोबाईल क्षेत्रातील चमत्कार! होंडाकडे आहे जगातील सर्वात 'स्वस्त' प्रायव्हेट जेट; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
8
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
9
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
10
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
12
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
13
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
14
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
16
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
17
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
18
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
19
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
20
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

मंदीत नोटाबंदी आगीत तेल ओतण्यासारखीच; यशवंत सिन्हांचा मोदी सरकारला घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2017 12:52 IST

सरकारने नोटाबंदीचा घेतलेला निर्णय हा आगीत तेल ओतण्यासारखाच आहे, अशी टीका भाजपा नेते यशवंत सिन्हा केली आहे.

ठळक मुद्दे सरकारने नोटाबंदीचा घेतलेला निर्णय हा आगीत तेल ओतण्यासारखाच आहे, अशी टीका भाजपा नेते यशवंत सिन्हा केली आहे.नोटाबंदीच्या घेतलेल्या निर्णयवार टीका करून यशवंत सिन्हा यांनी मोदी सरकारला घरचा आहेर दिला आहे. यशवंत सिन्हा यांनी त्यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावरही हल्लाबोल केला आहे.

नवी दिल्ली-  देशाचा जीडीपी सातत्याने घसरतो आहे. त्यामुळे आर्थिक मंदीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. जीडीपीची घसरण होत असताना सरकारने नोटाबंदीचा घेतलेला निर्णय हा आगीत तेल ओतण्यासारखाच आहे, अशी टीका भाजपा नेते यशवंत सिन्हा केली आहे. नोटाबंदीच्या घेतलेल्या निर्णयवार टीका करून यशवंत सिन्हा यांनी मोदी सरकारला घरचा आहेर दिला आहे. यावेळी यशवंत सिन्हा यांनी त्यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावरही हल्लाबोल केला आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.

माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी सध्याच्या आर्थिक मंदीसदृश्य परिस्थितीवरही चिंता व्यक्त केली. आपल्या अर्थमंत्र्यांनी अर्थव्यवस्थेला चौपट करण्याचं काम केलं आहे. यामुद्द्यावर मी बोलायचा ऐवजी जर गप्प बसलो तर राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यात मी अपयशी ठरेल. त्यामुळे आता मला बोलावंच लागेल, असं म्हणत सिन्हा यांनी अरूण जेटलींवर टीका केली आहे. पक्षाविरोधात बोलण्याची हिंमत न करणारे लोक माझ्या या वक्तव्याने दुखावले जातील याची कल्पना असल्याचंही सिन्हा म्हणाले आहेत. अरुण जेटली या सरकारमधील सक्षम मंत्री असल्याचं समजलं जातं. २०१४ मध्ये भाजपा सरकारमध्ये अरुण जेटलींनाच अर्थमंत्रिपद दिलं जाईल, असे बोललं जात होतं. त्यांची पात्रता पाहता त्यांच्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थ मंत्रालय, संरक्षण आणि कंपनी व्यवहार मंत्रालयाची जबाबदारी सोपवली होती, असंही ते म्हणाले. अर्थ मंत्रालयाचे काम किती कठिण आहे याची मलाही जाणीव आहे. २४ तास काम करावं लागतं. याचाच अर्थ सुपरमॅन अरुण जेटलींनाही हे काम कठिण वाटलं असेल, असं सिन्हा म्हणाले आहेत. 

कच्चा तेलाच्या वाढत्या किंमती आणि बँकांच्या वाढत्या एनपीएवर यशवंत सिन्हा यांनी चिंता व्यक्त केली आहे. या समस्यांना चांगल्या पद्धतीने हाताळता आल्या असत्या, असंही सिन्हा म्हणाले. खासगी गुंतवणुकीत घट झाली आहे. गेल्या दोन दशकांत इतकी कमी गुंतवणूक कधीच झाली नव्हती. औद्योगिक उत्पादनही खूपच घसरलं आहे. कृषी क्षेत्र संकटात आहे तसंच उत्पादन, रोजगार, सेवा ही क्षेत्रंही संकटात आहेत. निर्यात ठप्प झाली आहे. जवळपास सर्वच क्षेत्रांची हीच परिस्थिती आहे, अशा महत्त्वाच्या मुद्द्यांकडे यशवंत सिन्हा यांनी लक्ष वेधलं आहे. 

नोटाबंदीचा निर्णय हे तर आर्थिक संकट असल्याचं सिद्ध झालं आहे. सरकारकडून नोटाबंदीचा निर्णय खूप चुकीच्या पद्धतीने लागू करण्यात आला. जीएसटीमुळे व्यापाऱ्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. अनेक उद्योग बंद पडले. रोजगार क्षेत्रावर परिणाम झाला. अनेकांनी नोकऱ्या गमावल्या आहेत. आर्थिक विकास दरात त्यामुळे सातत्याने घट होते आहे. जीडीपी 5.7 टक्क्यांवर आला. नोटाबंदीमुळे ही परिस्थिती निर्माण झाली नाही, असं सरकारच्या प्रवक्त्यांकडून सांगितलं जातं. नोटाबंदीने तर या आगीत तेल ओतण्याचं काम केलं आहे, अशी थेट टीका यशवंत सिन्हा यांनी केली आहे.