शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
2
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
4
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
5
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
6
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
7
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
9
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
10
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
11
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
12
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
13
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
14
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
15
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
16
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
17
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
18
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
19
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
20
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...

मंदीत नोटाबंदी आगीत तेल ओतण्यासारखीच; यशवंत सिन्हांचा मोदी सरकारला घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2017 12:52 IST

सरकारने नोटाबंदीचा घेतलेला निर्णय हा आगीत तेल ओतण्यासारखाच आहे, अशी टीका भाजपा नेते यशवंत सिन्हा केली आहे.

ठळक मुद्दे सरकारने नोटाबंदीचा घेतलेला निर्णय हा आगीत तेल ओतण्यासारखाच आहे, अशी टीका भाजपा नेते यशवंत सिन्हा केली आहे.नोटाबंदीच्या घेतलेल्या निर्णयवार टीका करून यशवंत सिन्हा यांनी मोदी सरकारला घरचा आहेर दिला आहे. यशवंत सिन्हा यांनी त्यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावरही हल्लाबोल केला आहे.

नवी दिल्ली-  देशाचा जीडीपी सातत्याने घसरतो आहे. त्यामुळे आर्थिक मंदीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. जीडीपीची घसरण होत असताना सरकारने नोटाबंदीचा घेतलेला निर्णय हा आगीत तेल ओतण्यासारखाच आहे, अशी टीका भाजपा नेते यशवंत सिन्हा केली आहे. नोटाबंदीच्या घेतलेल्या निर्णयवार टीका करून यशवंत सिन्हा यांनी मोदी सरकारला घरचा आहेर दिला आहे. यावेळी यशवंत सिन्हा यांनी त्यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावरही हल्लाबोल केला आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.

माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी सध्याच्या आर्थिक मंदीसदृश्य परिस्थितीवरही चिंता व्यक्त केली. आपल्या अर्थमंत्र्यांनी अर्थव्यवस्थेला चौपट करण्याचं काम केलं आहे. यामुद्द्यावर मी बोलायचा ऐवजी जर गप्प बसलो तर राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यात मी अपयशी ठरेल. त्यामुळे आता मला बोलावंच लागेल, असं म्हणत सिन्हा यांनी अरूण जेटलींवर टीका केली आहे. पक्षाविरोधात बोलण्याची हिंमत न करणारे लोक माझ्या या वक्तव्याने दुखावले जातील याची कल्पना असल्याचंही सिन्हा म्हणाले आहेत. अरुण जेटली या सरकारमधील सक्षम मंत्री असल्याचं समजलं जातं. २०१४ मध्ये भाजपा सरकारमध्ये अरुण जेटलींनाच अर्थमंत्रिपद दिलं जाईल, असे बोललं जात होतं. त्यांची पात्रता पाहता त्यांच्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थ मंत्रालय, संरक्षण आणि कंपनी व्यवहार मंत्रालयाची जबाबदारी सोपवली होती, असंही ते म्हणाले. अर्थ मंत्रालयाचे काम किती कठिण आहे याची मलाही जाणीव आहे. २४ तास काम करावं लागतं. याचाच अर्थ सुपरमॅन अरुण जेटलींनाही हे काम कठिण वाटलं असेल, असं सिन्हा म्हणाले आहेत. 

कच्चा तेलाच्या वाढत्या किंमती आणि बँकांच्या वाढत्या एनपीएवर यशवंत सिन्हा यांनी चिंता व्यक्त केली आहे. या समस्यांना चांगल्या पद्धतीने हाताळता आल्या असत्या, असंही सिन्हा म्हणाले. खासगी गुंतवणुकीत घट झाली आहे. गेल्या दोन दशकांत इतकी कमी गुंतवणूक कधीच झाली नव्हती. औद्योगिक उत्पादनही खूपच घसरलं आहे. कृषी क्षेत्र संकटात आहे तसंच उत्पादन, रोजगार, सेवा ही क्षेत्रंही संकटात आहेत. निर्यात ठप्प झाली आहे. जवळपास सर्वच क्षेत्रांची हीच परिस्थिती आहे, अशा महत्त्वाच्या मुद्द्यांकडे यशवंत सिन्हा यांनी लक्ष वेधलं आहे. 

नोटाबंदीचा निर्णय हे तर आर्थिक संकट असल्याचं सिद्ध झालं आहे. सरकारकडून नोटाबंदीचा निर्णय खूप चुकीच्या पद्धतीने लागू करण्यात आला. जीएसटीमुळे व्यापाऱ्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. अनेक उद्योग बंद पडले. रोजगार क्षेत्रावर परिणाम झाला. अनेकांनी नोकऱ्या गमावल्या आहेत. आर्थिक विकास दरात त्यामुळे सातत्याने घट होते आहे. जीडीपी 5.7 टक्क्यांवर आला. नोटाबंदीमुळे ही परिस्थिती निर्माण झाली नाही, असं सरकारच्या प्रवक्त्यांकडून सांगितलं जातं. नोटाबंदीने तर या आगीत तेल ओतण्याचं काम केलं आहे, अशी थेट टीका यशवंत सिन्हा यांनी केली आहे.