शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
3
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
4
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
5
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
6
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
7
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
8
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
9
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
10
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
11
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
12
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
13
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
14
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
15
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?
16
Extra Marital Affairs:मुलाचं लग्न ठरलं आणि होणाऱ्या सूनेच्या बापावरच जडला महिलेचा जीव; लग्नाआधीच दोघे गेले पळून
17
Rain Alert: कमी दाबाचे क्षेत्र कायम, या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस पडणार?
18
शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
19
धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
20
खात्यात ८ लाख जमा केले अन् प्राप्तिकर विभागाची 'टॅक्स' नोटीस; ६ वर्षांच्या लढ्यानंतर करदात्याचा विजय!

अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद, भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 06:32 IST

Supreme Court News: भारतीय न्यायव्यवस्थेत समावेशकतेच्या दिशेने एक ऐतिहासिक टप्पा गाठत दृष्टिदोष असलेल्या ॲड. अंचल भाटेजा यांनी ६ जून रोजी सर्वोच्च न्यायालयात आपला पहिला युक्तिवाद केला. सर्वोच्च न्यायालयात दृष्टिहीन वकिलाने नोंदवलेली ही पहिलीच उपस्थिती आहे.

-डॉ. खुशालचंद बाहेती नवी दिल्ली - भारतीय न्यायव्यवस्थेत समावेशकतेच्या दिशेने एक ऐतिहासिक टप्पा गाठत दृष्टिदोष असलेल्या ॲड. अंचल भाटेजा यांनी ६ जून रोजी सर्वोच्च न्यायालयात आपला पहिला युक्तिवाद केला. सर्वोच्च न्यायालयात दृष्टिहीन वकिलाने नोंदवलेली ही पहिलीच उपस्थिती आहे.

कमी दृष्टी घेऊन जन्मलेल्या आणि नंतर पूर्णपणे दृष्टी गमावलेल्या अंचल यांनी अपार संघर्षातून आपले यश मिळवले. बोर्ड परीक्षा देण्याआधीच त्यांची दृष्टी पूर्णपणे गेली. मात्र त्यांनी हार न मानता ऑडिओबुक्सच्या साहाय्याने शिक्षण पूर्ण केले आणि पहिल्या अंध सीएलएटी परीक्षार्थी म्हणून नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी, बंगलोर येथे प्रवेश घेतला. २०२३ मध्ये त्यांनी कायद्याची पदवी मिळवली.

भाटेजा यांनी ६ जून रोजी उत्तराखंड सिव्हिल जज्ज भरतीसाठी १६ मे २०२५ रोजी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या १०० टक्के दृष्टिदोष असलेल्या याचिकाकर्त्याचे प्रतिनिधित्व केले. न्यायमूर्ती संजय करोल आणि एस. सी. शर्मा यांच्या खंडपीठापुढे ही याचिका तातडीने सुनावणीसाठी घ्यावी, यासाठी युक्तिवाद केला. न्यायालयाने सोमवार, ९ जून रोजी सुनावणी घेण्याचे मान्य केले आहे.

अंचल यांची सोशल मीडियावर भावनिक पोस्ट ‘हा क्षण आनंद आणि सौम्य दु:ख यांचा संगम आहे. मला अभिमान आहे, अशा जागेत मी उभी आहे, जी माझ्यासारख्या व्यक्तीसाठी कधीच डिझाइन केली नव्हती; पण मला हेही वाटते की मी ‘पहिली’ नसती तर बरे झाले असते, असे अंचल यांनी म्हटले आहे.सप्टेंबर २०२३ मध्ये ॲड. सारा सनी या पहिल्या मूकबधिर वकिलाने सर्वोच्च न्यायालयात सांकेतिक भाषेत युक्तिवाद केला होता. सौरव रॉय चौधरी यांनी त्यांना अनुवादक म्हणून मदत केली. 

पहिले दृष्टिहीन...भारतातील पहिले दृष्टिहीन न्यायाधीश टी.चक्रवर्ती होते. ते १ जून २००९ रोजी तमिळनाडूच्या कोइम्बतूरमध्ये तृतीय अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश बनले. यानंतर २०१८ मध्ये राजस्थानमध्ये  दृष्टिहीन ब्रह्मानंद शर्मा न्यायाधीश बनले. ३ मार्च २०२५ रोजी एका ऐतिहासिक निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने घोषित केले आहे की, दृष्टिहीन उमेदवार न्यायालयीन सेवांसाठी पात्र आहेत.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय