शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद, भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 06:32 IST

Supreme Court News: भारतीय न्यायव्यवस्थेत समावेशकतेच्या दिशेने एक ऐतिहासिक टप्पा गाठत दृष्टिदोष असलेल्या ॲड. अंचल भाटेजा यांनी ६ जून रोजी सर्वोच्च न्यायालयात आपला पहिला युक्तिवाद केला. सर्वोच्च न्यायालयात दृष्टिहीन वकिलाने नोंदवलेली ही पहिलीच उपस्थिती आहे.

-डॉ. खुशालचंद बाहेती नवी दिल्ली - भारतीय न्यायव्यवस्थेत समावेशकतेच्या दिशेने एक ऐतिहासिक टप्पा गाठत दृष्टिदोष असलेल्या ॲड. अंचल भाटेजा यांनी ६ जून रोजी सर्वोच्च न्यायालयात आपला पहिला युक्तिवाद केला. सर्वोच्च न्यायालयात दृष्टिहीन वकिलाने नोंदवलेली ही पहिलीच उपस्थिती आहे.

कमी दृष्टी घेऊन जन्मलेल्या आणि नंतर पूर्णपणे दृष्टी गमावलेल्या अंचल यांनी अपार संघर्षातून आपले यश मिळवले. बोर्ड परीक्षा देण्याआधीच त्यांची दृष्टी पूर्णपणे गेली. मात्र त्यांनी हार न मानता ऑडिओबुक्सच्या साहाय्याने शिक्षण पूर्ण केले आणि पहिल्या अंध सीएलएटी परीक्षार्थी म्हणून नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी, बंगलोर येथे प्रवेश घेतला. २०२३ मध्ये त्यांनी कायद्याची पदवी मिळवली.

भाटेजा यांनी ६ जून रोजी उत्तराखंड सिव्हिल जज्ज भरतीसाठी १६ मे २०२५ रोजी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या १०० टक्के दृष्टिदोष असलेल्या याचिकाकर्त्याचे प्रतिनिधित्व केले. न्यायमूर्ती संजय करोल आणि एस. सी. शर्मा यांच्या खंडपीठापुढे ही याचिका तातडीने सुनावणीसाठी घ्यावी, यासाठी युक्तिवाद केला. न्यायालयाने सोमवार, ९ जून रोजी सुनावणी घेण्याचे मान्य केले आहे.

अंचल यांची सोशल मीडियावर भावनिक पोस्ट ‘हा क्षण आनंद आणि सौम्य दु:ख यांचा संगम आहे. मला अभिमान आहे, अशा जागेत मी उभी आहे, जी माझ्यासारख्या व्यक्तीसाठी कधीच डिझाइन केली नव्हती; पण मला हेही वाटते की मी ‘पहिली’ नसती तर बरे झाले असते, असे अंचल यांनी म्हटले आहे.सप्टेंबर २०२३ मध्ये ॲड. सारा सनी या पहिल्या मूकबधिर वकिलाने सर्वोच्च न्यायालयात सांकेतिक भाषेत युक्तिवाद केला होता. सौरव रॉय चौधरी यांनी त्यांना अनुवादक म्हणून मदत केली. 

पहिले दृष्टिहीन...भारतातील पहिले दृष्टिहीन न्यायाधीश टी.चक्रवर्ती होते. ते १ जून २००९ रोजी तमिळनाडूच्या कोइम्बतूरमध्ये तृतीय अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश बनले. यानंतर २०१८ मध्ये राजस्थानमध्ये  दृष्टिहीन ब्रह्मानंद शर्मा न्यायाधीश बनले. ३ मार्च २०२५ रोजी एका ऐतिहासिक निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने घोषित केले आहे की, दृष्टिहीन उमेदवार न्यायालयीन सेवांसाठी पात्र आहेत.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय