शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
2
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
3
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
4
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
5
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
6
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
7
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
8
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
9
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
10
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
11
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
12
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
13
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
14
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
15
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
16
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
17
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
18
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
19
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
20
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?

250 खातेदारांकडून काळ्य़ा पैशाची कबुली

By admin | Updated: November 27, 2014 01:38 IST

250 खातेधारकांनी विदेशातील बँकेत आपला पैसा जमा असल्याची कबुलीही दिलेली आहे, अशी माहिती वित्तमंत्री अरुण जेटली यांनी बुधवारी राज्यसभेत दिली.

नवी दिल्ली : विदेशात बँक खाते असलेल्या 427 भारतीयांची नावे सरकारला कळालेली आहेत आणि त्यापैकी 250 खातेधारकांनी विदेशातील बँकेत आपला पैसा जमा असल्याची कबुलीही दिलेली आहे, अशी माहिती वित्तमंत्री अरुण जेटली यांनी बुधवारी राज्यसभेत दिली. विदेशात जमा असलेला हा काळा पैसा भारतात परत आणण्याच्या दिशेने सरकारने उचित पावले उचललेली आहेत, असे जेटली यांनी सांगितले.
काळ्या पैशाच्या मुद्यावरून विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरले. सत्तेवर आल्यानंतर 1क्क् दिवसाच्या आत विदेशात जमा असलेला काळा पैसा परत आणू आणि प्रत्येक भारतीयाच्या खात्यात 15 ते 2क् लाख रुपये जमा करू, या भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या काळात दिलेल्या आश्वासनाचे काय झाले, असा सवाल विरोधकांनी सरकारला केला. मात्र जेटली यांनी त्याला उत्तर दिले नाही. जेटली यांचे उत्तर पूर्ण होण्याआधीच काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, संयुक्त जनता दल, समाजवादीपार्टी आणि माकप सदस्यांनी सभात्याग केला. निवडणुकीच्या आधी व नंतरच्या काळात भाजपाच्या सरकारने दिलेल्या आश्वासनांवर शरसंधान करीत काँग्रेसने बुधवारी सत्तारूढ पक्षावर राजकीय लाभाकरिता काळ्या पैशाबाबत देशाची दिशाभूल केल्याचा आरोप करून त्याने त्याकरिता देशाची जाहीर माफी मागावी, अशी मागणी विरोधकांनी लोकसभेत केली. काळ्या पैशावरील या चर्चेत भाजपाच्या अनुरागसिंग ठाकूर यांनी काँग्रेसलाही यावेळी प्रतिटोला दिला. 
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या मंगळवारी या मुद्यावर झालेल्या गोंधळानंतर लोकसभेत काँग्रेसचे नेते मल्लिकाजरुन खरगे बुधवारी या विषयाची चर्चा सुरू करताना महणाले, ‘निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान मोदींनी, परदेशात असलेला काळा पैसा भारतात आणून देशातील प्रत्येक व्यक्तीला त्यातील 15 लाख रुपये दिले जातील, असे सांगून जनतेच्या भावनांसोबत खेळ केल्याचे म्हटले. आता ते पंतप्रधान झाले आहेत आणि त्यांच्याजवळ सर्व यंत्रणा व ताकद आहे. मी आपणास दुखवू इच्छित नाही मात्र स्मरण करून देऊ इच्छितो की, आपले सरकार सत्तेत आल्यानंतर 1क्क् दिवसात परदेशातील काळा पैसा भारतात आणू असे आश्वासन भाजपा नेत्यांनी दिले होते मात्र त्यातील एक पैसाही अद्याप भारतात आलेला नाही.’
सर्व संदिग्ध खातेधारकांच्या नावांचा खुलासा करण्याबाबत सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या वक्तव्याबाबत खरगे यांनी, संयुक्त पुरोगामी आघाडीचेही हेच म्हणणो होते, असे प्रतिपादन केले. जर हीच गोष्ट सांगायची होती तर संपुआ सरकारला बदनाम कशाला केले, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.  याआधीही भाजपा सत्तेत होती. त्यामुळे सरकारसमोरील अडचणींची त्याला कल्पना आहे. मात्र या पक्षाने 125 कोटी नागरिकांची दिशाभूल केली. खोटे बोलणो व खोटी आश्वासने दिल्याबद्दल या सरकारने व पक्षाने देशाची माफी मागावी अशीही मागणी त्यांनी यावेळी केली. नागरिकांच्या भावनांना भडकावल्याने देशाचा काय फायदा झाला असा प्रश्न विचारून त्यांनी, जनतेशी बोलताना तारतम्याने बोलले पाहिजे, असे मत व्यक्त केले. 
भाजपा सदस्य अनुरागसिंग ठाकूर यांनी काँग्रेसवर परदेशी बँकांमध्ये काळा पैसा ठेवणा:यांना पाठीशी घालण्याचा आरोप करून भाजपा सरकारने सत्तेत आल्यानंतर विशेष तपास पथकाच्या स्थापनेचा निर्णय घेतल्याचे म्हटले. या निर्णयाला काँग्रेस सातत्याने टाळत आली असल्याचाही  उल्लेख केला.  लोकसभेत उर्व रित चर्चा गुरुवारी झाल्यावर वित्तमंत्री जेटली त्यास उत्तर देतील. 
(लोकमत न्यूज नेटवर्क) 
 
थोडा वेळ लागेल
विदेशात काळा पैसा असलेल्या लोकांचा सरकार अतिशय सक्रियपणो माग काढेल आणि शोध घेईल. सर्व खातेधारकांची नावे कळल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. विदेशात जमा असलेला काळा पैसा परत आणणो ही एक प्रक्रिया आहे, जी थोडा वेळ घेईल. - अरुण जेटली, वित्तमंत्री
 
आश्वासनाचे काय ? 
आपले सरकार सत्तेत आल्यानंतर 1क्क् दिवसात परदेशातील काळा पैसा भारतात आणू असे आश्वासन भाजपा नेत्यांनी दिले होते मात्र त्यातील एक पैसाही अद्याप भारतात आलेला नाही.
- मल्लिकाजरुन खरगे, 
काँग्रेसचे नेते