शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: कलांमध्ये भाजपाची 'एक नंबर' कामगिरी; NDA ची सत्ता राखण्याच्या दिशेनं घोडदौड
2
Bihar Election 2025 Result: प्रशांत किशोर यांचे ३ उमेदवार आघाडीवर; एक्झिट पोल खरे ठरणार?
3
IND vs SA 1st Test : गिल पुन्हा अनलकी; अखेर बावुमानं संपवली दक्षिण आफ्रिकेची 'साडेसाती'
4
Bihar Election 2025 Result: सुरुवातीचे कल हाती; BJP-RJD मध्ये काँटे की टक्कर, NDA आघाडीवर
5
Stock Market Today: सुरुवातीच्या व्यवहारात १०० अंकांपेक्षा अधिक घसरला बाजार, २५,८०० च्या खाली निफ्टी
6
Bihar Election: सरकार स्थापन करण्यासाठी किती जागा आवश्यक? समजून घ्या बहुमताचं गणित!
7
बॉलिवूड पार्ट्यांमध्ये अंडरवर्ल्डकडून ड्रग्ज सप्लाय; श्रद्धा कपूर, नोरा फतेही, ओरीसह टॉप सेलिब्रिटींची नावं आल्यानं खळबळ
8
ICUमध्ये धर्मेंद्र आणि देओल कुटुंबाचा गुपचूप व्हिडीओ बनवणं पडलं महागात, हॉस्पिटलचा कर्मचारी अटकेत
9
"माझे काही फोटो अश्लील पद्धतीने...", अचानक व्हायरल झाल्यावर गिरीजा ओकने व्यक्त केली चिंता
10
बंडखोरीवर उपाय: अर्ज भरल्यावर भाजप जाहीर करणार उमेदवारांची यादी; ८०% नावे निश्चित
11
जबरदस्त रिटर्न देईल 'ही' स्कीम, केवळ ₹५,००० ची गुंतवणूक देईल ₹२६ लाखांपेक्षा जास्त फंड; पाहा कॅलक्युलेशन
12
दिल्लीत स्फोट घडवणाऱ्यांना कडक इशारा; मास्टरमाईंड डॉ. उमरचे पुलवामातील घर IED स्फोटकांनी उडवले!
13
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
14
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
15
“अजित पवार सत्तेसाठी लाचार असल्याने ते सत्तेतून बाहेर पडण्याचा प्रश्नच नाही”; काँग्रेसची टीका
16
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
17
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
18
मुंब्रा रेल्वे अपघात; ‘त्या’ दोन अभियंत्यांना कोणत्याही क्षणी अटक? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
19
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
20
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदीच्या वर्षपूर्तीला काँग्रेस-भाजपा आमनेसामने, विरोधक आज पाळणार काळा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 05:48 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदीच्या निर्णयाला बुधवारी एक वर्ष पूर्ण होत असून, त्यानिमित्ताने काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी ८ नोव्हेंबर हा काळा दिवस पाळण्याचे ठरविले आहे

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदीच्या निर्णयाला बुधवारी एक वर्ष पूर्ण होत असून, त्यानिमित्ताने काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी ८ नोव्हेंबर हा काळा दिवस पाळण्याचे ठरविले आहे, तर सत्ताधारी भाजपाने काळा पैसाविरोधी दिन म्हणून तो साजरा करण्याचे ठरवले आहे. या वर्षपूर्तीच्या आदल्या दिवशी मंगळवारी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी नोटाबंदीवर पुन्हा कडाडून टीका केली, तर नोटाबंदीचे जोरदार समर्थन करताना, अर्थमंत्री अरुण जेटली यांनी या निर्णयामुळे प्रचंड बेहिशेबी पैसा बँकांमध्ये जमा झाला, त्याला चेहरा मिळाला, असा दावा केला.जेटली म्हणतात...लोकांनी १५.४४ लाख कोटी रुपयांच्या बाद नोटा नावागावासकट सर्व माहिती देत बँकांमध्ये जमा केल्याने चलनातील बहुतांश पैशाला आता चेहरामोहरा मिळाला आहे. हा पैसा आता निनावी रहिलेला नाही. त्याआधी लोकांकडे खासगी व निनावी स्वरूपात असलेला हा पैसा आता अधिकृतपणे व्यवस्थेत आला आहे.डॉ. सिंग म्हणाले...हा दिवस भारतीय अर्थव्यवस्था व लोकशाही यादोन्हींच्या दृष्टीने ‘काळा दिवस’ ठरला आहे. अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले आहे. एवढेच नव्हे तर या निर्णयाने नेमके काय फायदे-तोटे झाले, याचे वास्तववादी मूल्यमापन करायला केंद्र सरकार अजूनही तयार नाही, हे त्याहीपेक्षा वाईट आहे.नोटाबंदीचे उद्दिष्ट सफलनवी दिल्ली : गेल्या वर्षी ८ नोव्हेंबर रोजीजे प्रमुख उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आला होता, ते साध्य झाले आहे. त्यामुळे हा दिवस अर्थव्यवस्थेच्या इतिहासात क्रांतिकारक म्हणून स्मरणात राहील, असा दावा केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी मंगळवारी केला.जेटली यांनी लिहिले आहे की, याचे फायदे दिसत नसले तरी भारत पूर्वीपेक्षा अधिक स्वच्छ, पारदर्शी व प्रामाणिक वित्तीय व्यवस्था असलेला देश झाला आहे. भावी पिढीला प्रामाणिक व्यवस्थेत आयुष्य घडविण्याची संधी मिळाल्याने ही पिढी नोव्हेंबर २०१६ मधील या आर्थिक घटनेकडे अभिमानाने पाहील.निर्णय ठरला पूर्ण घातकीअहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने जबरदस्तीने लादलेले नोटाबंदी आणि ‘जीएसटी’ हे निर्णय देशाच्या दृष्टीने पूर्णपणे विनाशकारी ठरले आहेत आणि त्यामुळे छोट्या उद्योग-व्यवसायांचे कंबरडे पार मोडून गेले आहे, अशी टीका माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी मंगळवारी येथे केली.नोटाबंदीच्या निर्णयाचा ८ नोव्हेंबर हा दिवस काँग्रेस देशभर ‘काळा दिवस’ म्हणून पाळणार आहे. त्या अनुषंगाने येथील सरदार पटेल राष्ट्रीय स्मारकात व्यापारी आणि उद्योजकांच्या एका मेळाव्यात स्वत: नामवंत अर्थतज्ज्ञ असलेले डॉ. सिंग म्हणाले की, नोटाबंदीमुळे देशाच्या आयातीत एक वर्षात २३ टक्के एवढी न भूतो अशी वाढ झाली आणि यात चीनकडून आयातीतील वाढ मोठी होती.रोख चलनाचा वापर कमी करणे हा नोटाबंदीचा प्रमुख उद्देश होता. रोख रकमा काळ्या पैशासाठी पोषक असतात. काळ्या पैशास आळा घालण्यासाठी रोख चलनाचा वापर कमी करणे गरजेचे होते.- अरुण जेटली‘बुलेट ट्रेन’बद्दल शंका घेणाºयांना देशद्रोही ठरवायचे. नोटाबंदी व ‘जीएसटी’वर टीका केली की त्याची करबुडवे म्हणून हेटाळणी करायची ही सत्ताधारी पक्षाची वृत्ती लोकशाहीला मारक आहे.- डॉ. मनमोहन सिंग

टॅग्स :Note BanनोटाबंदीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा