शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

भाजपाची अटकळ : कुमारस्वामी सरकार लवकरच कोसळेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 00:51 IST

येडियुरप्पा, श्रीरामुलू राज्यातच राहणार

हरिश गुप्ता।नवी दिल्ली : आमदार होताच बी. एस. येडियुरप्पा यांच्यासह बी. श्रीरामुलू यांनी लगेचच खासदारकीचे राजीनामे दिले. त्यांना राज्यातच ठेवून कुमारस्वामी यांचे सरकार पडण्याची वा प्रसंगी पाडण्याची भाजपा वाट पाहत आहे. तेथील सत्ता पुन्हा काबीज करण्यासाठी या नेत्यांनी कर्नाटकातच असावे या हेतूनचे भाजपच्या श्रेष्ठींनी हा निर्णय घेतला. त्यामुळे कर्नाटकात भाजपा आमदारांची संख्या १0४ राहील आणि सरकार बनवण्याची वेळ आली तर फारशी अडचण येणार नाही, असे गणित आहे.या दोघांच्या राजीनाम्यामुळे भाजपचे लोकसभेतील संख्याबळ २७२ म्हणजे बहुमतासाठी आवश्यक असलेल्या आकड्यावर येऊ न ठेपले आहे. लोकसभा की विधानसभा याचा विचार करण्यासाठी येडियुरप्पा व श्रीरामुलू यांच्याकडे पुरेसा वेळ होता. पण या दोघांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा असा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी घेतला.भाजपची कर्नाटकमधील जबाबदारी असलेल्या अमित शहा यांच्या निकटवर्तीयाने ‘लोकमत’ला सांगितले की, कुमारस्वामी सरकारआघाडी फार काळ टिकणार नाही. शपथविधीनंतर दोन पक्षांतील अंतर्गत मतभेद उफाळून येतील व हे सरकार कोसळेल. त्यामुळे तिथे आमचे पुरेसे आमदार असणे गरजेचे आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने लगेचच बहुमत सिद्ध करायला सांगितल्यो भाजपचे सारे मनोरथ कोसळले. हे आव्हान पेलतायेणे शक्य नाही हे लक्षातआल्यानंतर येडियुरप्पा यांनी विश्वासदर्शक ठरावाला सामोरे न जाताच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.आता काँग्रेसने जनता दलाला मुख्यमंत्रीपद दिले असले तरी महत्त्वाची खाती स्वत:कडे ठेवण्यासाठी काँग्रेस कुमारस्वामींवर दबाव आणेल. त्यामुळे तीन महिन्यांतच सरकार कुचकामी असल्याचे सिद्ध होईल असे भाजपला वाटते. बिहारमध्ये लालूप्रसाद व नितीशकुमार यांची युती जशी टिकू शकली नाही, तसाच प्रकार कर्नाटकात होईल, त्यामुळे येडियुरप्पा व श्रीरामुलू तिथेच असावेत, असे भाजपाचे म्हणणे आहे.इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची शक्यताएच. डी. देवेगौडा यांना सरकार बनविण्यासाठी काँग्रेसने बाहेरून पाठिंबा दिला होता आणि १0 महिन्यांत हात वर केले. इंदरकुमार गुजराल यांना काँग्रेसने फक्त २० महिनेच पाठिंबा दिला होता. त्यानंतर देश लोकसभा निवडणुकांना सामोरा गेला. याच इतिहासाची पुनरावृत्ती कर्नाटकात होईल, असा विश्वास भाजपला आहे. तसेच २०१९च्या लोकसभा निवडणुकांआधी काँग्रेसने कुमारस्वामींचा पाठिंबा काढून घेतल्यास विधानसभा निवडणुका घ्याव्या लागतील, असाही भाजपाचा होरा आहे.

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८BJPभाजपा