शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

भाजपाच्या बंडखोर नेत्यानेच दिला झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना धोबीपछाड  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2019 22:52 IST

झारखंडमध्ये भाजपाला दुहेरी धक्का बसला आहे. पक्षाच्या पराभवाबरोबरच भाजपाचे मुख्यमंत्री रघुवर दास यांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे.

रांची - झारखंड विधानसभा निवडणुकीत भाजपाला दारुण पराभव पत्करावा लागला आहे. झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल यांच्या आघाडीने भाजपाला धोबीपछाड दिला आहे. भाजपाचे मुख्यमंत्री रघुवर दास यांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे. मात्र रघुवर दास यांचा पराभव विरोधी पक्षाच्या कुण्या उमेदवाराने नव्हे तर भाजपाच्याच एका बंडखोर ज्येष्ठ नेत्याने केला आहे. बिहार आणि झारखंडमधील मिळून तीन मुख्यमंत्र्यांना तुरुंगाची हवा खायला लावणाऱ्या आणि ऐन निवडणुकीपूर्वी भाजपाला सोडचिठ्ठी देत अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरलेल्या सरयू राय यांनी रघुवर दास यांचा पराभव केला आहे.   भाजपाचे ज्येष्ठ नेते असलेले सरयू राय हे रघुवर दास यांच्या सरकारमध्ये मंत्री होते. मात्र राय आणि दास यांच्यात अनेक मुद्द्यांवरून मतभेद होते. त्यामुळे सरयू राय हे रघुवर दास यांच्या कॅबिनेटने घेतलेल्या निर्णयांना विरोध करत असत. तसेच अनेकदा कॅबिनेटच्या बैठकीस अनुपस्थित राहत असत. दरम्यान, झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी अखेरच्या क्षणापर्यंत त्यांच्या उमेदवारीबाबत निर्णय घेण्यात आला नव्हता. त्यामुळे अखेरीस त्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत मुख्यमंत्री रघुवर दास यांच्याविरोधात जमशेदपूर पूर्व मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच निर्णय घेतला. तसेच रघुवर दास यांचा मोठ्या मताधिक्याने पराभवही करून दाखवला. सरयू राय यांनी रधुवर दास यांच्यावर निर्णायक मतांची आघाडी घेतली आहे. मात्र निवडणूक आयोगाकडून राय यांच्या विजयाची घोषणा अध्याप झालेली नाही. झारखंडमधील राजकारणाचा विचार केल्यास या राज्यात गेल्या 19 वर्षांत अनेक मुख्यमंत्र्यांना निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. आता त्यात रघुवर दास यांचेही नाव दाखल झाले आहे. दरम्यान, रघुवर दास यांना पराभूत करणाऱ्या सरयू राय यांनी पशुपालन घोटाळ्यासह अनेक घोटाळे उघडकीस आणलेले आहेत. तसेच लालू प्रसाद यादव अनेक नेत्यांना तुरुंगाची वाट दाखवली होती.  

टॅग्स :jharkhand election 2019झारखंड निवडणूक 2019BJPभाजपाPoliticsराजकारण