शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

भाजपाच्या बंडखोर नेत्यानेच दिला झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना धोबीपछाड  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2019 22:52 IST

झारखंडमध्ये भाजपाला दुहेरी धक्का बसला आहे. पक्षाच्या पराभवाबरोबरच भाजपाचे मुख्यमंत्री रघुवर दास यांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे.

रांची - झारखंड विधानसभा निवडणुकीत भाजपाला दारुण पराभव पत्करावा लागला आहे. झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल यांच्या आघाडीने भाजपाला धोबीपछाड दिला आहे. भाजपाचे मुख्यमंत्री रघुवर दास यांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे. मात्र रघुवर दास यांचा पराभव विरोधी पक्षाच्या कुण्या उमेदवाराने नव्हे तर भाजपाच्याच एका बंडखोर ज्येष्ठ नेत्याने केला आहे. बिहार आणि झारखंडमधील मिळून तीन मुख्यमंत्र्यांना तुरुंगाची हवा खायला लावणाऱ्या आणि ऐन निवडणुकीपूर्वी भाजपाला सोडचिठ्ठी देत अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरलेल्या सरयू राय यांनी रघुवर दास यांचा पराभव केला आहे.   भाजपाचे ज्येष्ठ नेते असलेले सरयू राय हे रघुवर दास यांच्या सरकारमध्ये मंत्री होते. मात्र राय आणि दास यांच्यात अनेक मुद्द्यांवरून मतभेद होते. त्यामुळे सरयू राय हे रघुवर दास यांच्या कॅबिनेटने घेतलेल्या निर्णयांना विरोध करत असत. तसेच अनेकदा कॅबिनेटच्या बैठकीस अनुपस्थित राहत असत. दरम्यान, झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी अखेरच्या क्षणापर्यंत त्यांच्या उमेदवारीबाबत निर्णय घेण्यात आला नव्हता. त्यामुळे अखेरीस त्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत मुख्यमंत्री रघुवर दास यांच्याविरोधात जमशेदपूर पूर्व मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच निर्णय घेतला. तसेच रघुवर दास यांचा मोठ्या मताधिक्याने पराभवही करून दाखवला. सरयू राय यांनी रधुवर दास यांच्यावर निर्णायक मतांची आघाडी घेतली आहे. मात्र निवडणूक आयोगाकडून राय यांच्या विजयाची घोषणा अध्याप झालेली नाही. झारखंडमधील राजकारणाचा विचार केल्यास या राज्यात गेल्या 19 वर्षांत अनेक मुख्यमंत्र्यांना निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. आता त्यात रघुवर दास यांचेही नाव दाखल झाले आहे. दरम्यान, रघुवर दास यांना पराभूत करणाऱ्या सरयू राय यांनी पशुपालन घोटाळ्यासह अनेक घोटाळे उघडकीस आणलेले आहेत. तसेच लालू प्रसाद यादव अनेक नेत्यांना तुरुंगाची वाट दाखवली होती.  

टॅग्स :jharkhand election 2019झारखंड निवडणूक 2019BJPभाजपाPoliticsराजकारण