शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

आगामी विधानसभा निवडणुकांसाठी भाजपाची नवी रणनीती; मुख्यमंत्रिपदाचा चेहरा बदलणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 22:06 IST

विधानसभा निवडणूक नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालीच लढणार असल्याचं भाजपानं योजना बनवली

नवी दिल्ली - उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये दणदणीत विजय मिळवल्यानंतर भाजपाने(BJP) या वर्षाच्या अखेरीस आणि २०२३ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांचे नियोजन सुरू केले आहे. २०२३ मध्ये मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये होणाऱ्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) भाजपचा चेहरा असतील. मात्र या निवडणुकीत भाजपाने मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या राज्यांमध्ये नव्या पिढीला पुढे आणण्याचे काम सुरू आहे. निवडणुकीनंतर मुख्यमंत्री म्हणून नवा चेहरा समोर येणार आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये गुजरात, हिमाचल आणि २०२३ मध्ये होणाऱ्या निवडणुकांसाठी भाजपाने संपूर्ण रणनीती तयार केली आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे सलग तीन वेळा मुख्यमंत्री होते. डिसेंबर २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत चौहान यांच्या नेतृत्वात भाजपाला सत्ता मिळाली नाही. भाजपा काँग्रेसपासून काही जागांनी मागे राहिली, त्यामुळे मध्य प्रदेशमध्ये १७ डिसेंबर २०१८ रोजी कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार स्थापन झाले.

दीड वर्षानंतर, भाजपाने राजकीय उलथापालथ घडवली आणि कमलनाथ सरकार पाडले, त्यानंतर मार्च २०२० मध्ये शिवराज सिंह चौहान चौथ्यांदा मुख्यमंत्री झाले. आता मध्य प्रदेशात नवे नेतृत्व घडवण्यासाठी भाजपा प्रयत्नशील आहे. शिवराजसिंह चौहान यांना केंद्राच्या राजकारणात केव्हाही आणले जाऊ शकते, त्यामुळे मध्य प्रदेशातील भावी पिढीसाठी नेतृत्व तयार होण्यास मदत होईल अशीही पक्षांतर्गत चर्चा आहे. शिवराज चौहान जोपर्यंत मध्य प्रदेशात आहेत, तोपर्यंत नवे नेतृत्व घडवणे शक्य होणार नाही. असं असलं तरी मध्य प्रदेश हे भाजपासाठी अत्यंत महत्त्वाचे राज्य आहे, जे त्यांना कोणत्याही परिस्थितीत गमावायचे नाही. ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यापासून त्यांची ताकद सातत्याने वाढत आहे. त्यांचा प्रत्येक समर्थक कोणत्या ना कोणत्या पदावर आहे.

रमण सिंह हे २००४ ते नोव्हेंबर २०१८ पर्यंत सलग तीन वेळा छत्तीसगडचे मुख्यमंत्री होते. डिसेंबर २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. तेथे काँग्रेसचे सरकार स्थापन झाले. अशा स्थितीत भाजपला आता छत्तीसगडमध्ये एक नवा चेहरा आणायचा आहे, जो पक्षासाठी दीर्घ खेळी खेळू शकेल. त्यामुळे २०२३ पूर्वी भाजपा कोणताही नवा चेहरा आणणार नाही हेही निश्चित आहे. ज्यामुळे पक्षांतर्गत गटबाजी वाढणार आहे. अशा परिस्थितीत मोदींच्या नेतृत्वाखालीच विधानसभा निवडणुका होणार आहेत. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरच नवा चेहरा समोर येईल असं वृत्त दैनिक भास्करनं दिले आहे. 

डिसेंबर २०१३ मध्ये प्रचंड बहुमताने राजस्थानमध्ये सरकार स्थापन करणाऱ्या भाजपला डिसेंबर २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत वसुंधरा राजे यांच्या नेतृत्वाखाली पराभवाला सामोरे जावे लागले होते. सहा महिन्यांनी झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोदींच्या नावावर भाजपला दणदणीत विजय मिळाला. भाजपने राज्यात २५ जागा काबीज केल्या होत्या. काँग्रेसला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. गेल्या दोन दशकांपासून राजस्थानमध्ये वसुंधरा भाजपावर वर्चस्व गाजवत आहेत, पण आता पक्ष राजस्थानमध्ये नव्या नेतृत्वाच्या शोधात आहे. वसुंधरा यांच्या समर्थकांकडून त्यांना मुख्यमंत्री म्हणून घोषित करण्याची मागणी सातत्याने केली जात आहे, मात्र राजस्थानमध्ये जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही २०२३ ची विधानसभा निवडणूक नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालीच लढणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. याआधी भाजपानं गुजरात, उत्तराखंड, कर्नाटक आणि आसाममध्ये नेतृत्व बदल केले आहेत.

टॅग्स :BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी