शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

भाजपाचं मिशन बिहार, पंतप्रधान मोदींच्या डझनभर सभा होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2020 14:43 IST

भाजपाने बिहार निवडणुकीत जयदू (यु)सोबत आघाडी केली आहे. त्यामुळे बिहारची निवडणूक रंगतदार होणार आहे. सत्ताधारी पक्षाचे नितीशकुमार हेच रालाओकडून मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असणार आहेत

ठळक मुद्देभाजपाने यंदाच्या निडणुकीत पंतप्रधान मोदींच्या तब्बल 12 सभा बिहारमध्ये लावल्या आहेत. महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते आणि बिहार विधानसभा निवडणुकांचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात माहिती दिली.

नवी दिल्ली - बिहार विधानसभेची यंदाची निवडणूक ही दुरंगी न राहता बहुरंगी बनली आहे. २०१५ च्या आधी लहान पक्षांचे उमेदवार निवडणूक लढवत होते; पण यंदासारखे त्यांचे तगडे आव्हान कधी पाहण्यास मिळाले नव्हते. यंदाच्या निवडणुकीत बहुतांश मतदारसंघांत तुल्यबळ उमेदवारांमध्ये चौरंगी लढत होत आहेत. त्यामुळे, भाजपानेही यंदाची निवडणूक अतिशय मनावर घेतल्याचं दिसून येतंय, कारण, पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमध्ये तब्बल 12 सभा घेणार असल्याची माहिती बिहारचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

भाजपाने बिहार निवडणुकीत जयदू (यु)सोबत आघाडी केली आहे. त्यामुळे बिहारची निवडणूक रंगतदार होणार आहे. सत्ताधारी पक्षाचे नितीशकुमार हेच रालाओकडून मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असणार आहेत. तर, काँग्रेस आणि राजद यांच्यासह मित्रपक्षातील आघाडीतही तगडे उमेदवार असणार आहेत. त्यामुळे, भाजपाने यंदाच्या निडणुकीत पंतप्रधान मोदींच्या तब्बल 12 सभा बिहारमध्ये लावल्या आहेत. महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते आणि बिहार विधानसभा निवडणुकांचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात माहिती दिली. 

राज्यातील सासाराम येथे २३ ॲाक्टोबर रोजी मोदींची पहिली सभा होणार असून त्याचदिवशी गया आणि भागलपूर येथेही सभा होणार आहेत. म्हणजे प्रत्येक दिवशी तीन सभा, असं नियोजन भाजपाकडून आखण्यात आलं आहे. त्यानंतर,  २८ ॲाक्टोबर रोजी दरभंगा, मुझफ्फरपूर, पाटणा येथे दुसऱ्या दौऱ्यात सभा होतील. तर, १ नोव्हेंबर रोजी छपरा, पूर्व चंपारण आणि समस्तीपूर येथे मोदी जनतेला संबोधित करणार आहेत. त्यानंतर, प्रचाराच्या अंतिम टप्प्यात म्हणजे ३ नोव्हेंबर रोजी पश्चिम चंपारण, सहरसा आणि फारबीसगंज येथे मोदींच्या सभा होतील. फारबीसगंज येथील अखेरच्या सभेतून प्रचाराची सांगता होणार आहे.  

बिहारमध्ये यंदा बहुरंगी लढत

यंदाच्या निवडणुकीत मात्र प्रत्येक मतदारसंघानुसार गणित बदललेले आहे. भाजप, जनता दलाची (यु) रालोआ कागदावर वरचढ दिसत असली तरी प्रत्यक्ष मैदानात मात्र त्यांच्या उमेदवारांना राजद-काँग्रेस महागठबंधनसह जीडीएसएफ (उपेंद्रसिंह कुशवाह), एलजेपी, पीडीए (पप्पू यादव), एलजेपी (चिराग पासवान) या पक्षांच्या उमेदवारांचे कडवे आव्हान आहे. ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत लोकजनशक्ती पक्षाचे (एलजेपी) प्रमुख रामविलास पासवान यांचे झालेले निधन व पासी समाजाकडून मिळत असलेले समर्थन, निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या अनेक नेत्यांनी केलेला पक्ष प्रवेश, केंद्रात मोदी; पण बिहारमध्ये नितीशऐवजी कोणी, अशा भूमिकेमुळे एलजेपी यावेळी गेमचेंजरच्या भूमिकेत दिसत आहे. त्याचप्रमाणे जीडीएसएफदेखील धक्कादायक निकाल देण्याच्या परिस्थितीत दिसते. पप्पू यादव यांच्या पीडीए आघाडीच्या उमेदवारांसह डाव्या पक्षांनीदेखील तगडे आव्हान निर्माण केले आहे. तसेच कोरोनाची परिस्थिती, सरकारविरोधी भावना अन् सक्षम विरोधी पक्षाच्या अभावामुळे यंदाच्या निवडणुकीत बहुरंगी साठमारीत कोण कोणाला हरवणार व कोण कोणाला जिंकण्यासाठी मदत करणार, याचा अंदाज लावणे कठीण झाले आहे. प्रत्येक पक्ष आपले जास्तीत जास्त उमेदवार आणून निकालानंतरच्या राजकारणात गुंतलेला दिसत आहे.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस