शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
4
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
5
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
6
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
7
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
8
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
9
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
10
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
11
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
12
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
13
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
14
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
15
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
16
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
17
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
18
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
19
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
20
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती

भाजपचे संकल्पपत्र; ६० वर्षांवरील शेतकरी व व्यापाऱ्यांना देणार पेन्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 05:47 IST

काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम रद्द करू, राम मंदिरास आम्ही बांधील

नवी दिल्ली : ‘सब का साथ, सबका विकास’ हे मुख्य लक्ष्य ठेवून गेल्या पाच वर्षांत आखलेली धोरणे व राबविलेल्या योजना सर्वसमावेशक करून भारताला एक सशक्त, समृद्ध व स्वाभिमानी राष्ट्र म्हणून जगात ताठ मानेने उभे करण्याचा संकल्प सादर करून भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा पूर्ण बहुमताने सत्तेवर आणण्याचे आवाहन सोमवारी मतदारांना केले. मात्र या जाहीरनाम्यात राम मंदिर, काश्मीरबाबतचे राज्यघटनेतील ३५ ए व ३७0 कलम रद्द करणे आणि समान नागरी कायदा यांचा उल्लेख असून, त्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे या संकल्पपत्रामध्ये पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केलेली नोटाबंदी, त्या काळात रांगेत उभे राहिलेल्यांपैकी काहींचे झालेले मृत्यू जीएसटीमुळे व्यापारी व उद्योजक यांना झालेला त्रास, त्यामुळे गेलेल्या नोकऱ्या व वर्षाला दोन कोटी रोजगार यांचा उल्लेख यामध्ये नाही.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान सुरू व्हायला दोन दिवस राहिले असताना पक्षाने आपला जाहीरनामा ‘संकल्पपत्रा’च्या स्वरूपात प्रसिद्ध केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत पक्षाच्या जाहीरनामा समितीचे प्रमुख व केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी ‘संकल्पित भारत, सशक्त भारत’ या शीर्षकाची ४५ पानी पुस्तिका जारी केली. मात्र या पत्रकारांना प्रश्न विचारण्याची मुभाच देण्यात आली नाही. संकल्पपत्र जारी केल्यानंतर सारे नेते लगेचच व्यासपीठावरून निघून गेले.

अयोध्येत राम मंदिराची उभारणी, काश्मीरला देशाच्या मुख्य प्रवाहातून वेगळे ठेवणारे राज्यघटनेचे ३५ ए व ३७० हे अनुच्छेद रद्द करणे आणि समान नागरी कायदा या मुद्द्यांचाही पक्ष हिरीरीने पाठपुरावा करणे सुरुच ठेवेल, असे राजनाथ सिंग यांनी स्पष्ट केले.या संकल्पपत्रात पक्षाने विविध क्षेत्रांशी संबंधित अशी एकूण ७५ वचने पक्षाने मतदारांना दिली आहेत. या संकल्पपत्राचा आढावा घेता असे दिसते की त्यात पूर्णपणे नवी अशी कोणतीही घोषणा वा योजना नाही. सध्या सुरु असलेल्या वा निवडणुकीच्या तोंडावर सुरु करण्यात आलेल्या विविध योजनांची व्याप्ती वाढवून त्यांचा लाभ अधिक समाजघटकांना देण्याचे त्यात योजले आहे.

सन २०२२ मध्ये येणारा देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व सन २०४७ मधील सुवर्ण महोत्सव ही दोन मुख्य लक्ष्य डोळ््यापुठे ठेवून तोपर्यंत भारताला विकसित देश करण्याचे स्वप्न त्यात दाखविण्यात आले आहे. गेल्या ७० वर्षांच्या भूतकाळाशी नाळ तोडून नवा मार्ग आखण्याचे काम गेल्या पाच वर्षांत आमच्या सरकारने केले, असा दावा करत असताना यापुढील झेप घेण्यासाठी भक्कम पाया घालण्याचे काम येत्या पाच वर्षांत केले जाईल, असे आश्वासन भाजपने दिले आहे.
वादग्रस्त मुद्दे कायमराम मंदिर, समान नागरी कायदा, काश्मीरसंबंधीचे अनुच्छेद ३५ ए व ३७० रद्द करणे, बेकायदा घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी मोहीम देशभर राबविणे आणि छळाला कंटाळून पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानातील अल्पसंख्याकांना (हिंदू) नागरिकत्व देण्यासाठी ‘सिटिझनशिप अमेंडमेंट बिल’ संसदेत मंजूर करून घेणे या वादग्रस्त मुद्द्यांची कासही भाजप सोडणार नसल्याचे स्पष्ट होते.

टॅग्स :BJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी