शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

भाजपचे संकल्पपत्र; ६० वर्षांवरील शेतकरी व व्यापाऱ्यांना देणार पेन्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 05:47 IST

काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम रद्द करू, राम मंदिरास आम्ही बांधील

नवी दिल्ली : ‘सब का साथ, सबका विकास’ हे मुख्य लक्ष्य ठेवून गेल्या पाच वर्षांत आखलेली धोरणे व राबविलेल्या योजना सर्वसमावेशक करून भारताला एक सशक्त, समृद्ध व स्वाभिमानी राष्ट्र म्हणून जगात ताठ मानेने उभे करण्याचा संकल्प सादर करून भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा पूर्ण बहुमताने सत्तेवर आणण्याचे आवाहन सोमवारी मतदारांना केले. मात्र या जाहीरनाम्यात राम मंदिर, काश्मीरबाबतचे राज्यघटनेतील ३५ ए व ३७0 कलम रद्द करणे आणि समान नागरी कायदा यांचा उल्लेख असून, त्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे या संकल्पपत्रामध्ये पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केलेली नोटाबंदी, त्या काळात रांगेत उभे राहिलेल्यांपैकी काहींचे झालेले मृत्यू जीएसटीमुळे व्यापारी व उद्योजक यांना झालेला त्रास, त्यामुळे गेलेल्या नोकऱ्या व वर्षाला दोन कोटी रोजगार यांचा उल्लेख यामध्ये नाही.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान सुरू व्हायला दोन दिवस राहिले असताना पक्षाने आपला जाहीरनामा ‘संकल्पपत्रा’च्या स्वरूपात प्रसिद्ध केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत पक्षाच्या जाहीरनामा समितीचे प्रमुख व केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी ‘संकल्पित भारत, सशक्त भारत’ या शीर्षकाची ४५ पानी पुस्तिका जारी केली. मात्र या पत्रकारांना प्रश्न विचारण्याची मुभाच देण्यात आली नाही. संकल्पपत्र जारी केल्यानंतर सारे नेते लगेचच व्यासपीठावरून निघून गेले.

अयोध्येत राम मंदिराची उभारणी, काश्मीरला देशाच्या मुख्य प्रवाहातून वेगळे ठेवणारे राज्यघटनेचे ३५ ए व ३७० हे अनुच्छेद रद्द करणे आणि समान नागरी कायदा या मुद्द्यांचाही पक्ष हिरीरीने पाठपुरावा करणे सुरुच ठेवेल, असे राजनाथ सिंग यांनी स्पष्ट केले.या संकल्पपत्रात पक्षाने विविध क्षेत्रांशी संबंधित अशी एकूण ७५ वचने पक्षाने मतदारांना दिली आहेत. या संकल्पपत्राचा आढावा घेता असे दिसते की त्यात पूर्णपणे नवी अशी कोणतीही घोषणा वा योजना नाही. सध्या सुरु असलेल्या वा निवडणुकीच्या तोंडावर सुरु करण्यात आलेल्या विविध योजनांची व्याप्ती वाढवून त्यांचा लाभ अधिक समाजघटकांना देण्याचे त्यात योजले आहे.

सन २०२२ मध्ये येणारा देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व सन २०४७ मधील सुवर्ण महोत्सव ही दोन मुख्य लक्ष्य डोळ््यापुठे ठेवून तोपर्यंत भारताला विकसित देश करण्याचे स्वप्न त्यात दाखविण्यात आले आहे. गेल्या ७० वर्षांच्या भूतकाळाशी नाळ तोडून नवा मार्ग आखण्याचे काम गेल्या पाच वर्षांत आमच्या सरकारने केले, असा दावा करत असताना यापुढील झेप घेण्यासाठी भक्कम पाया घालण्याचे काम येत्या पाच वर्षांत केले जाईल, असे आश्वासन भाजपने दिले आहे.
वादग्रस्त मुद्दे कायमराम मंदिर, समान नागरी कायदा, काश्मीरसंबंधीचे अनुच्छेद ३५ ए व ३७० रद्द करणे, बेकायदा घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी मोहीम देशभर राबविणे आणि छळाला कंटाळून पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानातील अल्पसंख्याकांना (हिंदू) नागरिकत्व देण्यासाठी ‘सिटिझनशिप अमेंडमेंट बिल’ संसदेत मंजूर करून घेणे या वादग्रस्त मुद्द्यांची कासही भाजप सोडणार नसल्याचे स्पष्ट होते.

टॅग्स :BJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी