शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

राज्यपालांच्या जागांसाठी भाजपमध्ये महाशर्यत; सहा महिन्यात 10 राज्यपाल होणार निवृत्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2019 02:37 IST

दहा पदे : अनेकांची निवृत्ती जुलै ते डिसेंबरदरम्यान

हरिश गुप्ता नवी दिल्ली : दहा राज्यांचे राज्यपाल येत्या सहा महिन्यांत (जुलै ते डिसेंबर) निवृत्त होत असल्यामुळे भाजपमध्ये त्या जागांसाठी महाशर्यत सुरू झाली आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत ज्यांना संधी मिळाली नाही आणि आरोग्य व इतर कारणांनी या निवडणुकीपासून दूर राहावे लागले अशा पक्षातील ज्येष्ठ मंडळींची मोठी रांग राज्यपालपदासाठी इच्छुक आहे. यावर्षी राज्यपालपदे मोठ्या संख्येने रिक्त होणार असल्यामुळे पक्षातील अनेकांना राजकीय आखाड्यात राहता येईल असा आशेचा किरण या पार्श्वभूमीवर दिसला आहे.

एकट्या जुलै महिन्यातच चार राज्यपाल निवृत्त होत आहेत. त्याची सुरुवात गुजरातचे राज्यपाल ओम प्रकाश कोहली यांच्यापासून होईल. त्यांची मुदत १५ जुलै रोजी संपत आहे. चुकीच्या बातम्यांसाठी नेहमीच चर्चेत राहिलेले नागालँडचे राज्यपाल पद्मनाभ आचार्य यांची मुदत १९ जुलै रोजी, उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांची मुदत २१ जुलै रोजी तर पश्चिम बंगालचे राज्यपाल केसरी नाथ त्रिपाठी यांची पाच वर्षांची मुदत २३ जुलै रोजी संपत आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (रालोआ) नेमलेल्या आणखी चार राज्यपालांचा कालवधी ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पूर्ण होत आहे. या राज्यपालांत महाराष्ट्राचे सी. विद्यासागर राव (३० आॅगस्ट), गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा (३१ ऑगस्ट), कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला (एक सप्टेंबर) आणि राजस्थानचे राज्यपाल कल्याण सिंह (चार सप्टेंबर) यांचा समावेश आहे.

माजी सरन्यायाधीश पी. सथासिवम यांचा केरळच्या राज्यपालपदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ पाच सप्टेंबर रोजी संपत आहे. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या कार्यकाळात २००९ मध्ये ई. एस. एल. नरसिंमहन यांची आंध्र प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली होती. ते भारतात सध्या सर्वात जास्त काळ या पदावर राहिलेले आहेत. त्यांचा कार्यकाळ डिसेंबरमध्ये संपेल. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांच्याशी त्यांची जवळीक असल्यामुळे ते त्या पदावर आले. नायडू यांनी नरसिंहमन यांनाच त्या पदावर राहू द्या असा आग्रह धरल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यास तयार झाले. त्यांचा दहा वर्षांचा कार्यकाळ संपत आल्यामुळे ते बहुधा पदावरून दूर होतील.डॉ. मुरली मनोहर जोशी, कलराज मिश्रा, बिजोय चक्रवर्ती(आसाम), करिया मुंडा (झारखंड), भगत सिंह कोशियारी (उत्तराखंड), सुमित्रा महाजन (मध्य प्रदेश), बंडारू दत्तात्रेय (आंध्र प्रदेश) या भाजपमधील काही ज्येष्ठ नेत्यांनी लोकसभा निवडणूक लढवली नव्हती व राज्यपालपदाबाबत ते आशावादी आहेत. माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनीही लोकसभा निवडणूक लढवली नाही तरी त्या राजकीय भूमिका बजावतील अशी अपेक्षा आहे. तथापि, स्वराज यांच्यासाठी किमान यावर्षी तरी राज्यसभेची जागा उपलब्ध नाही. त्यांना २०२० पर्यंत त्यासाठी वाट पाहावी लागेल.ज्येष्ठांसाठी आशेचा किरणपंतप्रधान कार्यालयाशी जवळीक असलेल्या सूत्रांनी म्हटले की, मोदी हे नोकरशहा किंवा सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना राज्यपालपदी नेमण्यास इच्छुक नाहीत. अपवाद फक्त केंद्रशासित प्रदेशांचा. तेथे प्रशासकांची गरज असते.मोदी राजकीय व्यक्तींना राज्यपाल म्हणून नियुक्त करीत असल्यामुळे भाजपमधील ज्येष्ठांना आपल्याला राज्यपालांचे निवासस्थान मिळवता येईल, असा आशेचा किरण दिसतो आहे.

टॅग्स :BJPभाजपा