शहरं
Join us  
Trending Stories
1
CBSE अभ्यासक्रमात छत्रपती शिवरायांचा इतिहास फक्त ६८ शब्दांत, सत्यजीत तांबेंचा विधानसभेत संताप
2
भारतात येत असताना...! विनफास्ट अमेरिकेत डीलरशीप बंद करू लागली; संख्या दोन डझनांखाली आली...
3
मुंबईतील ७० टक्के मुस्लीम बहुल भागात एकनाथ शिंदेंना पसंती; भाजपाच्या सर्व्हेतून काय आलं समोर?
4
टेस्लाला मोठा झटका! जागतिक विक्री ४ वर्षांतील नीचांकी पातळीवर; भारतात तर डोकेही वर निघेना...
5
इंडिगोचं विमान ऐनवेळी रद्द, मुलाची परीक्षा चुकू नये म्हणून वडिलांनी रात्रभर चालवली कार, अखेरीस... 
6
"ज्येष्ठ नेते शिवराज पाटील यांच्या निधनाने अनुभवी, अभ्यासू व सुसंकृत नेतृत्व हरपले’’,  हर्षवर्धन सपकाळ यांनी वाहिली श्रद्धांजली
7
Garud Puran: गरुड पुराणानुसार विवाह बाह्य संबंध ठेवणाऱ्यांना मिळते 'ही' भयानक शिक्षा!
8
या अभिनेत्रीचे वडील उरीमध्ये दहशतवाद्यांशी लढताना झाले होते शहीद, ८०० कोटींच्या सिनेमातून रातोरात झाली लोकप्रिय
9
नात्याला काळीमा! इस्रायलचं स्वप्न, विम्याच्या रकमेसाठी लेक झाला हैवान; वडिलांचा काढला काटा
10
मोठी बातमी! वेनेझुएलावर अमेरिकेने हल्ला केलाच, रशिया संरक्षण करणार; मादुरो यांना पुतीन यांचा फोन गेला...
11
नोकरीचं राहुद्या आता अमेरिकेत फिरायला जाणेही कठीण! ट्रम्प म्हणाले 'या' हेतूने येणाऱ्यांना पर्यटन व्हिसा नाही
12
लूथरा बंधूंच्या मागे आता ईडी देखील हात धुवून लागणार; दिल्लीतील एकाच पत्त्यावर ४२ बनावट कंपन्या...
13
११ वर्षांच्या यशस्वी मोहिमेनंतर NASA च्या 'MAVEN' मार्स ऑर्बिटरशी अचानक संपर्क तुटला; वैज्ञानिक चिंतेत
14
Astro Tips: तिन्ही सांजेला 'या' ५ चुका करणे म्हणजे घरी आलेली लक्ष्मी परतावून लावणे!
15
इंडिगो संकटाची मोठी किंमत! DGCAची कठोर कारवाई, निष्काळजीपणा आढळताच ४ अधिकारी निलंबित
16
Vaibhav Suryavanshi : षटकार-चौकारांची 'बरसात'! वादळी शतकासह वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
17
बँक खाते, पेन्शन, टॅक्स स्लॅब ते GST बदल... २०२५ मध्ये पैशांसंबंधी झाले ७ मोठे बदल; तुम्हाला किती फायदा?
18
ब्रह्मोसपेक्षा वेगवान; भारताला मिळणार 300 रशियन R-37M क्षेपणास्त्रे, सुखोई विमानात बसवले जाणार
19
Shashi Tharoor: "पत्नीच्या संमतीशिवाय संबंध ठेवणे वैवाहिक बलात्कारच, पतीला सूट का द्यावी?"- शशी थरूर
20
"शिवराज पाटील यांची अलीकडेच भेट झाली होती, ते..." PM नरेंद्र मोदींनी दिला आठवणींना उजाळा
Daily Top 2Weekly Top 5

पंजाबमध्ये भाजपची चांगली कामगिरी - हरदीप पुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 11:16 IST

भाजपच्या वतीने पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पर्यवेक्षणाची अतिरिक्त जबाबदारी सध्या पेट्रोलियम आणि नगरविकास आणि गृहनिर्माण कामकाज खात्याचे मंत्री हरदीप पुरी यांच्याकडे आहे. ‘लोकमत’चे नॅशनल एडिटर हरीश गुप्ता यांनी त्यांची घेतलेली मुलाखत.

हरीश गुप्ता, ‘लोकमत’चे नॅशनल एडिटर -

भाजपच्या वतीने पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पर्यवेक्षणाची अतिरिक्त जबाबदारी सध्या पेट्रोलियम आणि नगरविकास आणि गृहनिर्माण कामकाज खात्याचे मंत्री हरदीप पुरी (Hardeep Puri) यांच्याकडे आहे. ‘लोकमत’चे नॅशनल एडिटर हरीश गुप्ता यांनी त्यांची घेतलेली मुलाखत.

पंजाबला तुम्ही वारंवार भेट देता. अकाली भाजपपासून  दुरावल्यानंतर आता तुमचा पक्ष भाजपचा प्रवास कसा आहे?- ते प्रकरण आता मागे पडले. पंजाबच्या तुकडीचा सदस्य असण्याची जबाबदारी पक्षाने मला आता दिली आहे. भाजप खूपच चांगली कामगिरी करीत असल्याचे मी तुम्हाला सांगू शकतो.तुमचा पक्ष शर्यतीतही नाही, असे सगळ्या मतदान चाचण्या सांगत असताना तुमच्या विधानाचा आधार कोणता?- या मतदान चाचण्या कशा असतात, हे तुम्हाला माहीत आहे. राज्यांमागून राज्यात त्या भरकटल्या आहेत.भाजप किती जागा जिंकणार?- जनतेला बदल हवा आहे. काँग्रेस आत्मघाती मार्गावर आहे. मी भाजपबद्दल बोलतोय. ११७ सदस्यांच्या विधानसभेत भाजप हा सर्वात मोठा पक्ष असेल.तुम्ही कॅप्टन अमरिंदर सिंग आणि एस. एस. धिंडसा यांच्यासोबत युती करून ६५ जागा लढवत आहात आणि तुम्ही म्हणता की, भाजप हा सर्वात मोठा पक्ष असेल.- अमरिंदर सिंग यांच्या पक्षाच्या ८ उमेदवारांसह आम्ही ७३ जागा भाजपच्या चिन्हावर लढवत आहोत. भाजप हा हिंदूंचा पक्ष असल्याचे समजण्याचे दिवस आणि तो २३ जागांवर मर्यादित राहिल्याचे दिवस आता नाहीत. तुमच्या आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल?- शब्दांचा खेळ करणारा मी नाही. आज पंजाब त्रिशंकू विधानसभेकडे वाटचाल करीत आहे. परंतु, हे दृश्य मोदीजींनी प्रचार सुरू करताच बदलून जाईल. भाजप जागा जिंकणार त्या किती?- आम्हाला पंजाबमध्ये स्वबळावर ३० जागांची अपेक्षा आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी ४०-४५ जागांपर्यंत जाऊ शकेल. निवडणुकीनंतर अकालींसोबत युती होणार नाही?- अजिबात नाही. ४० वर्षांत आम्ही युतीमध्ये विस्तार करण्यात अपयशी ठरलो. आता आम्ही चालकाच्या जागी आहोत.तुमचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण?- आमदार ठरवतील आणि पक्षश्रेष्ठी निकालानंतर निर्णय घेतील.तरी तुम्ही किती जागा जिंकणार?- मी तुम्हाला खात्रीने सांगतो की, काँग्रेस प्रत्यक्षात प्रभाव गमावणार असून लोकांनी तर अकालींना निरुपयोगी म्हणून टाकून दिले आहे. जमीन, वाळू आणि अमली पदार्थांचे माफियांनी राज्याला नष्ट केले असून, लोक त्या दोघांबद्दलही निराश झाले आहेत. आम आदमी पक्षाबद्दल काही चांगले न बोललेले बरे.  

टॅग्स :Punjab Assembly Election 2022पंजाब विधानसभा निवडणूक २०२२BJPभाजपा