शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

२०२४ साली ३३३ जागा जिंकण्याचे भाजपचे लक्ष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 04:19 IST

भाजपने २०२४ साली लोकसभा निवडणुकांमध्ये ३३३ जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

नवी दिल्ली : भाजपने २०२४ साली लोकसभा निवडणुकांमध्ये ३३३ जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यासाठी दक्षिण भारतातील राज्यांवर भाजप अधिक लक्ष केंद्रित करणार आहे, अशी माहिती पक्षाचे सरचिटणीस सुनील देवधर यांनी दिली. भाजपने २०१४च्या लोकसभा निवडणुकांत २८२, तर यंदा ३०३ जागा जिंकल्या आहेत. देवधर पक्षाचे आंध्र प्रदेश, त्रिपुरा या राज्यांचे प्रभारी आहेत. ते म्हणाले, पश्चिम बंगाल ते तामिळनाडू या किनारपट्टीच्या राज्यांवर भाजप अधिक लक्ष केंद्रित करणार आहे. भाजप हा हिंदी भाषिकांचा पक्ष आहे हा गैरसमज दाक्षिणात्य राज्यांतील लोकांच्या मनातून घालविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. देवधर याआधी बंगाली भाषा शिकले होते. आता ते तेलुगूचे धडे गिरवत आहेत.भाजपच्या एका नेत्याने सांगितले की, २०२४च्या लोकसभा निवडणुकांसाठी भाजपने दक्षिणेतील पाच राज्यांतील संघटना आणखी मजबूत करण्यावर जोर दिला आहे. यंदाच्या भाजपने कर्नाटकात २५ तर, तेलंगणामध्ये चार जागा जिंकल्या. मात्र तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेशमध्ये या पक्षाला खातेच उघडता आले नाही. पश्चिम बंगालमध्ये आता १८ जागा जिंकून जसा चमत्कार घडविला नेमका तोच २0२४ मध्ये दक्षिण भारतात भाजपला साधायचा आहे. बुथपातळीवर पदाधिकाऱ्यांची नेमणुक करून तसेच रा. स्व. संघाच्या साथीने हे करण्यात येईल.>विरोधी मते काँग्रेसकडेशबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश द्यावा, या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर भाजप व संघपरिवारातील संघटनांनी केरळमध्ये निदर्शने केली. मात्र त्यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेला निवडणुकांत केरळमधील जनतेने प्रतिसाद दिला नाही. तिथे डाव्या पक्षांच्या विरोधातील मते काँग्रेसकडे वळली. ती आपल्याकडे कशी आणता येतील याचेही प्रयत्न भाजप पुढील पाच वर्षांत करणार आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा