शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

कर्नाटक सरकार पाडण्यासाठी भाजपचे प्रयत्न; काँग्रेसचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 06:32 IST

कर्नाटकमधील घडामोडींना भाजप जबाबदार नसल्याचे सांगत, त्या पक्षाच्या केंद्रीय व स्थानिक स्तरातील नेत्यांनी हात वर केले आहेत.

बंगळुरू : कर्नाटकमधील राजीनामा दिलेल्या १३ आमदारांना बंगळुरूहून मुंबईला आणण्यासाठी ‘हाल'च्या विशेष विमानाची सोय भाजपच्या केंद्रीय नेत्यांच्या पाठिंब्यामुळेच झाली, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे. कुमारस्वामी सरकार पाडण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व भाजप प्रयत्न करीत असल्याचेही ते म्हणाले. राजकीय स्थिती आणखी बिकट झाल्यामुळे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी आपला अमेरिका दौरा अर्धवट सोडून रविवारी बंगळुरूला परतले आहेत.

कर्नाटकमधील घडामोडींना भाजप जबाबदार नसल्याचे सांगत, त्या पक्षाच्या केंद्रीय व स्थानिक स्तरातील नेत्यांनी हात वर केले आहेत. ‘वेट अँड वॉच' असे सांगून भाजपचे नेते व माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी या प्रकरणातले गूढ आणखी वाढविले आहे. शनिवारी राजीनामा दिलेल्या आमदारांपैकी नऊ काँग्रेसचे व तीन जनता दल (एस)चे आहेत. या घडामोडींमुळे कुमारस्वामींच्या सरकारला पाठिंबा देणाऱ्या आमदारांची संख्या १०५ पर्यंत खाली घसरली आहे. या सरकारला बहुमतासाठी ११३ मतांची आवश्यकत असून त्यासाठी आता आठ जणांची कमतरता जाणवत आहे. भाजप नेते येडीयुरप्पांनी सांगितले की, आमदारांनी दिलेल्या राजीनाम्याबाबत कर्नाटकचे विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेतात त्याची वाट पाहात आहोत. त्यानंतर भाजप आपला निर्णय घेईल. कर्नाटकमध्ये सध्या ज्या घडामोडी सुरू आहेत त्याच्याशी माझा व भाजपचा काहीही संबंध नाही. मात्र राज्यपालांनी सरकार स्थापन करण्यास सांगितले तर त्यासाठी आमची तयारी आहे.

माजी केंद्रीय मंत्री मल्लिकार्जून खरगे म्हणाले की, बिगरभाजपा राज्य सरकारांबद्दल मोदी सरकारने हेच घोरण अवलंबले आहे. पश्चिम बंगालपाठोपाठ आता कर्नाटकमध्येही तोच खेळ सुरू झाला आहे. पश्चिम बंगाल, गोवा, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, बिहार, झारखंडसारख्या १३-१४ राज्यांमध्ये भाजपने लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम केले आहे. कुमारस्वामी सरकारला कोणताही धोका नाही असा दावा काँग्रेसचे नेते व कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला आहे.‘ते' विमान भाजप खासदाराच्या कंपनीचेकर्नाटकमधील आमदारांना बंगळुरूहून मुंबईला ज्यातून आणले गेले, ते विशेष विमान भाजपचे राज्यसभा खासदार राजीव चंद्रशेखर यांच्या हे विमान ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे होते, असे सूत्रांनी सांगितले. चंद्रशेखर हे त्या कंपनीचे संस्थापक व अध्यक्ष आहेत. ते विमान सतत कोणी ना कोणी भाड्याने घेऊ शकते. तो आमचा व्यवसाय आहे, असे कंपनीच्या सूत्रांनी सांगितले. या विमानाचे बुकिंग कोणी कोणासाठी केले होते, याची माहिती देण्यास मात्र कंपनीच्या प्रवक्त्याने नकार दिला.

देवेगौडांशी चर्चाकर्नाटकचे जलसंपदामंत्री व काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांनी जनता दल (एस)चे प्रमुख देवेगौडा यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन राज्यातील राजकीय स्थितीवर चर्चा केली. असंतुष्ट आमदार आपले राजीनामे मागे घेतील, असा विश्वास डी. के. शिवकुमार यांनी व्यक्त केला.

मुंबईतील हॉटेलबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांची निदर्शनेमुंबई : कर्नाटकातील सत्ताधारी पक्षाच्या बंडखोर आमदारांनी शनिवारी राजीनामा देऊन थेट मुंबईतील सोफिटेल हॉटेल गाठले. एकीकडे काँग्रेस नेते मनधरणीसाठी या आमदारांची भेट घेण्याच्या प्रयत्नात आहेत, तर दुसरीकडे युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रविवारी हॉटेलबाहेर घोषणाबाजी केली.महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी या बंडखोर आमदारांची भेट घेण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी त्यांना हॉटेलबाहेरच रोखले. पोलीस पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप आ. नसीम खान यांनी केला. पोलिसांनी हॉटेलमध्ये जाण्यास मज्जाव केल्यानंतर कार्यकर्त्यांनी हॉटेलबाहेर निदर्शने करत जोरदार घोषणाबाजी केली. दुसरीकडे भाजपचे आमदार प्रसाद लाड, मोहीत भारतीय हे हॉटेलमध्ये थांबलेल्या आमदारांच्या संपर्कात आहेत. दिवसभर त्यांची ये-जा सुरू होती. कर्नाटकातील काँग्रेस आमदार महेंद्र सिंगी यांनी हॉटेलमध्ये थांबलेले बंडखोर आमदार रमेश जारकीहोळी यांची भेट घेतली. कर्नाटकातील सध्याचा पेचप्रसंग नवा नाही, लवकरच परिस्थिती निवळेल, असे सिंगी यांनी नंतर माध्यमांशी बोलताना सांगितले.

टॅग्स :Karnatakकर्नाटकKarnatak Politicsकर्नाटक राजकारण