शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

कर्नाटक सरकार पाडण्यासाठी भाजपचे प्रयत्न; काँग्रेसचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 06:32 IST

कर्नाटकमधील घडामोडींना भाजप जबाबदार नसल्याचे सांगत, त्या पक्षाच्या केंद्रीय व स्थानिक स्तरातील नेत्यांनी हात वर केले आहेत.

बंगळुरू : कर्नाटकमधील राजीनामा दिलेल्या १३ आमदारांना बंगळुरूहून मुंबईला आणण्यासाठी ‘हाल'च्या विशेष विमानाची सोय भाजपच्या केंद्रीय नेत्यांच्या पाठिंब्यामुळेच झाली, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे. कुमारस्वामी सरकार पाडण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व भाजप प्रयत्न करीत असल्याचेही ते म्हणाले. राजकीय स्थिती आणखी बिकट झाल्यामुळे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी आपला अमेरिका दौरा अर्धवट सोडून रविवारी बंगळुरूला परतले आहेत.

कर्नाटकमधील घडामोडींना भाजप जबाबदार नसल्याचे सांगत, त्या पक्षाच्या केंद्रीय व स्थानिक स्तरातील नेत्यांनी हात वर केले आहेत. ‘वेट अँड वॉच' असे सांगून भाजपचे नेते व माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी या प्रकरणातले गूढ आणखी वाढविले आहे. शनिवारी राजीनामा दिलेल्या आमदारांपैकी नऊ काँग्रेसचे व तीन जनता दल (एस)चे आहेत. या घडामोडींमुळे कुमारस्वामींच्या सरकारला पाठिंबा देणाऱ्या आमदारांची संख्या १०५ पर्यंत खाली घसरली आहे. या सरकारला बहुमतासाठी ११३ मतांची आवश्यकत असून त्यासाठी आता आठ जणांची कमतरता जाणवत आहे. भाजप नेते येडीयुरप्पांनी सांगितले की, आमदारांनी दिलेल्या राजीनाम्याबाबत कर्नाटकचे विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेतात त्याची वाट पाहात आहोत. त्यानंतर भाजप आपला निर्णय घेईल. कर्नाटकमध्ये सध्या ज्या घडामोडी सुरू आहेत त्याच्याशी माझा व भाजपचा काहीही संबंध नाही. मात्र राज्यपालांनी सरकार स्थापन करण्यास सांगितले तर त्यासाठी आमची तयारी आहे.

माजी केंद्रीय मंत्री मल्लिकार्जून खरगे म्हणाले की, बिगरभाजपा राज्य सरकारांबद्दल मोदी सरकारने हेच घोरण अवलंबले आहे. पश्चिम बंगालपाठोपाठ आता कर्नाटकमध्येही तोच खेळ सुरू झाला आहे. पश्चिम बंगाल, गोवा, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, बिहार, झारखंडसारख्या १३-१४ राज्यांमध्ये भाजपने लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम केले आहे. कुमारस्वामी सरकारला कोणताही धोका नाही असा दावा काँग्रेसचे नेते व कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला आहे.‘ते' विमान भाजप खासदाराच्या कंपनीचेकर्नाटकमधील आमदारांना बंगळुरूहून मुंबईला ज्यातून आणले गेले, ते विशेष विमान भाजपचे राज्यसभा खासदार राजीव चंद्रशेखर यांच्या हे विमान ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे होते, असे सूत्रांनी सांगितले. चंद्रशेखर हे त्या कंपनीचे संस्थापक व अध्यक्ष आहेत. ते विमान सतत कोणी ना कोणी भाड्याने घेऊ शकते. तो आमचा व्यवसाय आहे, असे कंपनीच्या सूत्रांनी सांगितले. या विमानाचे बुकिंग कोणी कोणासाठी केले होते, याची माहिती देण्यास मात्र कंपनीच्या प्रवक्त्याने नकार दिला.

देवेगौडांशी चर्चाकर्नाटकचे जलसंपदामंत्री व काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांनी जनता दल (एस)चे प्रमुख देवेगौडा यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन राज्यातील राजकीय स्थितीवर चर्चा केली. असंतुष्ट आमदार आपले राजीनामे मागे घेतील, असा विश्वास डी. के. शिवकुमार यांनी व्यक्त केला.

मुंबईतील हॉटेलबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांची निदर्शनेमुंबई : कर्नाटकातील सत्ताधारी पक्षाच्या बंडखोर आमदारांनी शनिवारी राजीनामा देऊन थेट मुंबईतील सोफिटेल हॉटेल गाठले. एकीकडे काँग्रेस नेते मनधरणीसाठी या आमदारांची भेट घेण्याच्या प्रयत्नात आहेत, तर दुसरीकडे युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रविवारी हॉटेलबाहेर घोषणाबाजी केली.महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी या बंडखोर आमदारांची भेट घेण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी त्यांना हॉटेलबाहेरच रोखले. पोलीस पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप आ. नसीम खान यांनी केला. पोलिसांनी हॉटेलमध्ये जाण्यास मज्जाव केल्यानंतर कार्यकर्त्यांनी हॉटेलबाहेर निदर्शने करत जोरदार घोषणाबाजी केली. दुसरीकडे भाजपचे आमदार प्रसाद लाड, मोहीत भारतीय हे हॉटेलमध्ये थांबलेल्या आमदारांच्या संपर्कात आहेत. दिवसभर त्यांची ये-जा सुरू होती. कर्नाटकातील काँग्रेस आमदार महेंद्र सिंगी यांनी हॉटेलमध्ये थांबलेले बंडखोर आमदार रमेश जारकीहोळी यांची भेट घेतली. कर्नाटकातील सध्याचा पेचप्रसंग नवा नाही, लवकरच परिस्थिती निवळेल, असे सिंगी यांनी नंतर माध्यमांशी बोलताना सांगितले.

टॅग्स :Karnatakकर्नाटकKarnatak Politicsकर्नाटक राजकारण