शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

दिल्ली, पंजाब, चंदिगढमधील उमेदवारांच्या निश्चितीवरून भाजपची द्विधा मन:स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2019 6:53 AM

दिल्लीतील सातपैकी काही खासदारांना संधी नाही; गौतम गंभीरच्या नावाचा विचार सुरू

- हरीश गुप्ता

नवी दिल्ली : दिल्ली, पंजाब, चंदिगढ आणि हरियाणातील दोन जागांबद्दल काय निर्णय घ्यावा या द्विधा मन:स्थितीत भाजपचे नेतृत्व सापडले आहे. पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी ४०६ उमेदवारांची नावे आतापर्यंत जाहीर केली असून ३१ जागांवरील नावे मागेच ठेवली आहेत. त्यात दिल्लीतील सर्व सात, पंजाबमधील १३ पैकी तीन आणि चंदिगढमधील एकमेव व हरियाणातील दोन जागांचा समावेश आहे.

काहीच दिवसांपूर्वी भाजपमध्ये दाखल झालेले क्रिकेटपटू गौतम गंभीर यांना नवी दिल्ली मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. पक्षाच्या काही धोरणांवरून उदित राज हे काळजीचा सूर आळवत आहेत. राज यांना मोठा गाजावाजा करून आणले गेले. परंतु, मतदारसंघातील त्यांची कामगिरी काळजीचा विषय ठरली आहे. तिसरा बळी हा महेश गिरी यांचा असू शकेल. गिरी यांच्या मतदारसंघात केंद्रीय कॅबिनेट मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांना कदाचित पाठवले जाईल आणि काँग्रेस आणि आम आदमी पक्षाची (आप) आघाडी झाली तर काँग्रेसचे कपिल सिबल हे विरोधकांचे एकत्रित उमेदवार असू शकतील त्या चांदणी चौक मतदारसंघात नवा चेहरा दिला जाऊ शकतो. मोदी यांची लाट असल्याचा दावा आणि विद्यमान खासदारांबद्दलची नाराजी असल्यामुळे नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची इच्छा असलेले भाजपचे नेतृत्व कमालीचे काळजीत पडले आहे. काँग्रेस-आपची आघाडी झाल्यास ती भाजपला तोंड देण्यास सक्षम आहे. कारण मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे समाजातील गरीब वर्गात चांगले वजन आहे.

दिल्लीतील तीन जागांच्या बदल्यात हरियाणा, पंजाब आणि गोव्यातील जागा काँग्रेसकडून मान्य करून घेण्यातील केजरीवाल यांच्या कौशल्यामुळे भाजपच्या उमेदवारांची नावे जाहीर होण्यात विलंब होत आहे. भाजपमधील अनेकांना पक्षाचा हा दुबळेपणा असल्याचे व त्यामुळे चुकीचे संकेत जात असल्याचे वाटते. येत्या ४८ तासांत भाजप हरियाणा, पंजाब व दिल्लीतील उर्वरित जागांसाठीच्या उमेदवारांची नावे जाहीर करण्याची शक्यता आहे. रोहटकमध्ये उमेदवार जाट द्यावा की नाही याचा निर्णय भाजपच्या नेतृत्वाचा अजून होत नाही, असे समजते. हुड्डा यांच्याविरुद्ध जाटेतर समाज असल्यामुळे येथून जाट उमेदवार नको, असे मनोहरलाल खट्टर यांना वाटते. २०१४ मध्ये मोदी यांची भरभक्कम लाट असतानाही भाजपला हरियाणात रोहटकसह तीन जागा जिंकण्यात अपयश आले होते.तीन खासदारांना घरचा रस्ता दाखवणार?दिल्लीतील विद्यमान सातपैकी काही खासदारांबद्दल तीव्र नाराजी असल्यामुळे नेतृत्वाला मोठी शस्त्रक्रिया करायची इच्छा आहे. भाजपमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लोकसभेच्या विद्यमान तीन खासदारांपैकी किमान तिघांना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल व त्यात नवी दिल्लीतील मीनाक्षी लेखी, उदित राज (वायव्य) आणि महेश गिरी (पूर्व) यांचा समावेश आहे.