शहरं
Join us  
Trending Stories
1
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
2
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
3
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
4
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
5
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
6
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
7
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
8
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
9
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
10
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
11
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
12
वयोवृद्ध जोडपं दहशतवाद्याशी भिडलं, अखेरीस एकमेकांच्या मिठीत सोडले प्राण, बोरिस आणि सोफियाची थरारक कहाणी
13
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
14
IPL 2026 Auction: विस्फोटक फलंदाज आयपीएल २०२६ च्या मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड, नाव ऐकून चकीत व्हाल!
15
बाई, हा काय प्रकार... LinkedIn वर फुल-टाइम गर्लफ्रेंडची व्हॅकन्सी, लोक विचारतात सॅलरी किती?
16
सोनं १३०६ रुपयांनी स्वस्त, चांदीही घसरली; पटापट चेक करा कॅरेटनिहाय लेटेस्ट रेट
17
Jara Hatke: अजब प्रथा: 'या' गावात लग्नाआधी तोडले जातात वधूचे दात; पण का??? वाचा 
18
मनोज जरांगे पाटील यांनी दिल्ली गाठली; अमित शाह यांच्याकडे केली मोठी मागणी, नेमके काय घडतेय?
19
IPL Auction 2026 LIVE: नवोदित कार्तिक शर्मा, प्रशांत वीर, अकिब जावेदवर पैशांचा पाऊस, लागल्या विक्रमी बोली
20
Budh Pradosh 2025: इंग्रजी वर्ष २०२५ मधील शेवटचे प्रदोष व्रत; कर्जमुक्ती, संतान प्राप्तीसाठी करा 'हे' उपाय
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचे चाणक्य शहा यांची रणनीती अपयशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2018 06:42 IST

लोकसभापूर्वी मोठा फटका; काँग्रेसमुक्त भारताचे स्वप्न जमीनदोस्त

- नितीन अग्रवालनवी दिल्ली : पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुकीच्या आधी राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत भाजपाला मोठा फटका बसला. या राज्यांतील निकालांनी पक्षाचे चाणक्य मानले जाणारे अमित शहा यांनी आखलेली रणनीती पूर्णपणे नाकारली गेली. शहा यांचे काँग्रेसमुक्त भारताचे स्वप्न जमीनदोस्त झाले. निवडणुकीत ना भाजपाचा विकासाचा दावा कामी आला ना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जादू, ना राममंदिराची नाव त्याला वाचवू शकली. मतदारांनी छत्तीसगड आणि मध्यप्रदेशात गेल्या १५ वर्षांतील कामाला नाकारलेच सोबत नरेंद्र मोदी सरकारच्या विकास योजनाही भाजपाला विजयी करू शकल्या नाहीत.निवडणुकीच्या आधी भाजपाने राममंदिर व हिंदुत्वाचा मुद्दा प्रकर्षाने मांडला. शहा आणि नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर मंदिर बनण्यात अडथळे आणल्याचा आरोप केला. संघ आणि त्याच्याशी संबंधित संघटनांनी सर्वोच्च न्यायालयालाही सोडले नाही. तरीही भाजपाला सरकार बनवण्याएवढ्या जागा मिळाल्या नाहीत.भाजपाने ३ राज्यांतील सुमारे २० ते ३० टक्के विद्यमान आमदारांना तिकिटे नाकारली. सत्तेच्या विरोधातील लाटेचा फटका चुकवण्यासाठी गुजरात मॉडेल स्वीकारून अनेक ठिकाणी मंत्र्यांनाही तिकीट नाकारले. युवकांना प्राधान्य दिले गेले. भाजपाची यात मोठी हानी झाल्याचे बोलले जाते. तिकिटे नाकारलेले भाजपासाठी भस्मासुर बनले. त्यांनी आपल्याच पक्षाच्या उमेदवारांच्या यशाचा खेळ उधळून लावला.सोशल मीडियाही कामाला आला नाही. अविश्रांतपणे निवडणुकीच्या तयारीत असलेले शहा फार पूर्वीपासून प्रत्येक राज्यात बुथस्तरीय कार्यकर्ता संमेलन घेत आले. पन्नाप्रमुखांच्या साह्याने मतदारांना प्रभावित करण्याची व्यापक व दूरगामी रणनीतीही त्यांनी बनवली. सोशल मीडिया वॉरियर्सची मोठी फौजही त्यांच्या कामाला आली नाही. भाजपा त्यांच्या साह्याने व्हर्च्युअल वर्ल्डमध्ये काँग्रेसविरोधात आक्रमक होत गेली; परंतु पक्षाचा पराभव टळला नाही.पक्षाचे नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी निकालांना भाजपाचा अहंकार जबाबदार असल्याचे सांगितले. सिन्हा यांनी टष्ट्वीट केले की, ‘जे निवडणूक हरले त्यांचा अहंकार, अतिआत्मविश्वास व खालावलेली कामगिरी कारणीभूत ठरली. त्यांना लवकरच सुबुद्धी मिळावी, अशी आशा आणि प्रार्थना करतो. जेवढी लवकर येईल तेवढे चांगले. लोकशाही विजयी होवो. जय हिंद!’तिन्ही राज्यांच्या नेतृत्वात लवकरच बदल अपेक्षितनिवडणुकीनंतर मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानातील नेतृत्वात मोठे बदल अपेक्षित आहेत. शिवराज चौहान, रमणसिंह आणि वसुंधरा राजे यांना आगामी लोकसभा निवडणूक पाहता भाजपा आता त्यांना केंद्रात आणू शकते. या तिन्ही राज्यांत असे नेतृत्व उभे केले जाईल की, ज्याच्या आधारे पक्ष २०१९ मधील निवडणुकीत जनतेला सामोरे जाऊ शकेल.शहा यांची रणनीती याआधीही ठरलीय अपयशीशहा यांची रणनीती अपयशी ठरण्याची ही काही पहिली वेळ नाही. या आधी त्यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली, बिहार आणि कर्नाटकमध्ये भाजपाला सत्तेची चव चाखता आली नाही. मोदी-शहा जोडीने त्यांच्या राज्यात यशाचे जे दावे केले होते तेथेही यश मिळाले नव्हते. पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपा नेते पत्रकारांच्या प्रश्नांना टाळताना दिसले. सोशल मीडियात अति सक्रिय असलेला भाजपा जवळपास सायलेंट मोडवर आला.

टॅग्स :Amit Shahअमित शाहLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Chhattisgarhछत्तीसगडRajasthanराजस्थानMadhya Pradeshमध्य प्रदेश