शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

भाजपाचे चाणक्य शहा यांची रणनीती अपयशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2018 06:42 IST

लोकसभापूर्वी मोठा फटका; काँग्रेसमुक्त भारताचे स्वप्न जमीनदोस्त

- नितीन अग्रवालनवी दिल्ली : पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुकीच्या आधी राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत भाजपाला मोठा फटका बसला. या राज्यांतील निकालांनी पक्षाचे चाणक्य मानले जाणारे अमित शहा यांनी आखलेली रणनीती पूर्णपणे नाकारली गेली. शहा यांचे काँग्रेसमुक्त भारताचे स्वप्न जमीनदोस्त झाले. निवडणुकीत ना भाजपाचा विकासाचा दावा कामी आला ना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जादू, ना राममंदिराची नाव त्याला वाचवू शकली. मतदारांनी छत्तीसगड आणि मध्यप्रदेशात गेल्या १५ वर्षांतील कामाला नाकारलेच सोबत नरेंद्र मोदी सरकारच्या विकास योजनाही भाजपाला विजयी करू शकल्या नाहीत.निवडणुकीच्या आधी भाजपाने राममंदिर व हिंदुत्वाचा मुद्दा प्रकर्षाने मांडला. शहा आणि नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर मंदिर बनण्यात अडथळे आणल्याचा आरोप केला. संघ आणि त्याच्याशी संबंधित संघटनांनी सर्वोच्च न्यायालयालाही सोडले नाही. तरीही भाजपाला सरकार बनवण्याएवढ्या जागा मिळाल्या नाहीत.भाजपाने ३ राज्यांतील सुमारे २० ते ३० टक्के विद्यमान आमदारांना तिकिटे नाकारली. सत्तेच्या विरोधातील लाटेचा फटका चुकवण्यासाठी गुजरात मॉडेल स्वीकारून अनेक ठिकाणी मंत्र्यांनाही तिकीट नाकारले. युवकांना प्राधान्य दिले गेले. भाजपाची यात मोठी हानी झाल्याचे बोलले जाते. तिकिटे नाकारलेले भाजपासाठी भस्मासुर बनले. त्यांनी आपल्याच पक्षाच्या उमेदवारांच्या यशाचा खेळ उधळून लावला.सोशल मीडियाही कामाला आला नाही. अविश्रांतपणे निवडणुकीच्या तयारीत असलेले शहा फार पूर्वीपासून प्रत्येक राज्यात बुथस्तरीय कार्यकर्ता संमेलन घेत आले. पन्नाप्रमुखांच्या साह्याने मतदारांना प्रभावित करण्याची व्यापक व दूरगामी रणनीतीही त्यांनी बनवली. सोशल मीडिया वॉरियर्सची मोठी फौजही त्यांच्या कामाला आली नाही. भाजपा त्यांच्या साह्याने व्हर्च्युअल वर्ल्डमध्ये काँग्रेसविरोधात आक्रमक होत गेली; परंतु पक्षाचा पराभव टळला नाही.पक्षाचे नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी निकालांना भाजपाचा अहंकार जबाबदार असल्याचे सांगितले. सिन्हा यांनी टष्ट्वीट केले की, ‘जे निवडणूक हरले त्यांचा अहंकार, अतिआत्मविश्वास व खालावलेली कामगिरी कारणीभूत ठरली. त्यांना लवकरच सुबुद्धी मिळावी, अशी आशा आणि प्रार्थना करतो. जेवढी लवकर येईल तेवढे चांगले. लोकशाही विजयी होवो. जय हिंद!’तिन्ही राज्यांच्या नेतृत्वात लवकरच बदल अपेक्षितनिवडणुकीनंतर मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानातील नेतृत्वात मोठे बदल अपेक्षित आहेत. शिवराज चौहान, रमणसिंह आणि वसुंधरा राजे यांना आगामी लोकसभा निवडणूक पाहता भाजपा आता त्यांना केंद्रात आणू शकते. या तिन्ही राज्यांत असे नेतृत्व उभे केले जाईल की, ज्याच्या आधारे पक्ष २०१९ मधील निवडणुकीत जनतेला सामोरे जाऊ शकेल.शहा यांची रणनीती याआधीही ठरलीय अपयशीशहा यांची रणनीती अपयशी ठरण्याची ही काही पहिली वेळ नाही. या आधी त्यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली, बिहार आणि कर्नाटकमध्ये भाजपाला सत्तेची चव चाखता आली नाही. मोदी-शहा जोडीने त्यांच्या राज्यात यशाचे जे दावे केले होते तेथेही यश मिळाले नव्हते. पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपा नेते पत्रकारांच्या प्रश्नांना टाळताना दिसले. सोशल मीडियात अति सक्रिय असलेला भाजपा जवळपास सायलेंट मोडवर आला.

टॅग्स :Amit Shahअमित शाहLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Chhattisgarhछत्तीसगडRajasthanराजस्थानMadhya Pradeshमध्य प्रदेश