शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

भाजपाचे चाणक्य शहा यांची रणनीती अपयशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2018 06:42 IST

लोकसभापूर्वी मोठा फटका; काँग्रेसमुक्त भारताचे स्वप्न जमीनदोस्त

- नितीन अग्रवालनवी दिल्ली : पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुकीच्या आधी राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत भाजपाला मोठा फटका बसला. या राज्यांतील निकालांनी पक्षाचे चाणक्य मानले जाणारे अमित शहा यांनी आखलेली रणनीती पूर्णपणे नाकारली गेली. शहा यांचे काँग्रेसमुक्त भारताचे स्वप्न जमीनदोस्त झाले. निवडणुकीत ना भाजपाचा विकासाचा दावा कामी आला ना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जादू, ना राममंदिराची नाव त्याला वाचवू शकली. मतदारांनी छत्तीसगड आणि मध्यप्रदेशात गेल्या १५ वर्षांतील कामाला नाकारलेच सोबत नरेंद्र मोदी सरकारच्या विकास योजनाही भाजपाला विजयी करू शकल्या नाहीत.निवडणुकीच्या आधी भाजपाने राममंदिर व हिंदुत्वाचा मुद्दा प्रकर्षाने मांडला. शहा आणि नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर मंदिर बनण्यात अडथळे आणल्याचा आरोप केला. संघ आणि त्याच्याशी संबंधित संघटनांनी सर्वोच्च न्यायालयालाही सोडले नाही. तरीही भाजपाला सरकार बनवण्याएवढ्या जागा मिळाल्या नाहीत.भाजपाने ३ राज्यांतील सुमारे २० ते ३० टक्के विद्यमान आमदारांना तिकिटे नाकारली. सत्तेच्या विरोधातील लाटेचा फटका चुकवण्यासाठी गुजरात मॉडेल स्वीकारून अनेक ठिकाणी मंत्र्यांनाही तिकीट नाकारले. युवकांना प्राधान्य दिले गेले. भाजपाची यात मोठी हानी झाल्याचे बोलले जाते. तिकिटे नाकारलेले भाजपासाठी भस्मासुर बनले. त्यांनी आपल्याच पक्षाच्या उमेदवारांच्या यशाचा खेळ उधळून लावला.सोशल मीडियाही कामाला आला नाही. अविश्रांतपणे निवडणुकीच्या तयारीत असलेले शहा फार पूर्वीपासून प्रत्येक राज्यात बुथस्तरीय कार्यकर्ता संमेलन घेत आले. पन्नाप्रमुखांच्या साह्याने मतदारांना प्रभावित करण्याची व्यापक व दूरगामी रणनीतीही त्यांनी बनवली. सोशल मीडिया वॉरियर्सची मोठी फौजही त्यांच्या कामाला आली नाही. भाजपा त्यांच्या साह्याने व्हर्च्युअल वर्ल्डमध्ये काँग्रेसविरोधात आक्रमक होत गेली; परंतु पक्षाचा पराभव टळला नाही.पक्षाचे नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी निकालांना भाजपाचा अहंकार जबाबदार असल्याचे सांगितले. सिन्हा यांनी टष्ट्वीट केले की, ‘जे निवडणूक हरले त्यांचा अहंकार, अतिआत्मविश्वास व खालावलेली कामगिरी कारणीभूत ठरली. त्यांना लवकरच सुबुद्धी मिळावी, अशी आशा आणि प्रार्थना करतो. जेवढी लवकर येईल तेवढे चांगले. लोकशाही विजयी होवो. जय हिंद!’तिन्ही राज्यांच्या नेतृत्वात लवकरच बदल अपेक्षितनिवडणुकीनंतर मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानातील नेतृत्वात मोठे बदल अपेक्षित आहेत. शिवराज चौहान, रमणसिंह आणि वसुंधरा राजे यांना आगामी लोकसभा निवडणूक पाहता भाजपा आता त्यांना केंद्रात आणू शकते. या तिन्ही राज्यांत असे नेतृत्व उभे केले जाईल की, ज्याच्या आधारे पक्ष २०१९ मधील निवडणुकीत जनतेला सामोरे जाऊ शकेल.शहा यांची रणनीती याआधीही ठरलीय अपयशीशहा यांची रणनीती अपयशी ठरण्याची ही काही पहिली वेळ नाही. या आधी त्यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली, बिहार आणि कर्नाटकमध्ये भाजपाला सत्तेची चव चाखता आली नाही. मोदी-शहा जोडीने त्यांच्या राज्यात यशाचे जे दावे केले होते तेथेही यश मिळाले नव्हते. पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपा नेते पत्रकारांच्या प्रश्नांना टाळताना दिसले. सोशल मीडियात अति सक्रिय असलेला भाजपा जवळपास सायलेंट मोडवर आला.

टॅग्स :Amit Shahअमित शाहLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Chhattisgarhछत्तीसगडRajasthanराजस्थानMadhya Pradeshमध्य प्रदेश