शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

काँग्रेसची फिक्स ‘व्होट बँक’ फोडण्याचा भाजपचा प्रयत्न; कुमारी शैलजा तिकीटवाटपावरून नाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2024 07:45 IST

कुमारी शैलजा यांना तिकीटवाटपात ९ जागा मिळाल्या होत्या. त्यावरून त्या नाराज होत्या. त्यांनी निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती; परंतु, काँग्रेस नेतृत्वाने त्याची परवानगी दिली नाही.

आदेश रावल

नवी दिल्ली : हरयाणात दहा वर्षे सत्तेत असलेला भाजप आगामी विधानसभा निवडणुकीत हॅटट्रिक साधण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. दुसरीकडे काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य सुरू आहे. काँग्रेसच्या मागासवर्गीय नेत्या खासदार कुमारी शैलजा तिकीटवाटपावरून नाराज आहेत. त्याचा फायदा उचलून काँग्रेसची पारंपरिक व्होट बँक फोडण्याचा प्रयत्न भाजप करीत आहे.

कुमारी शैलजा यांना तिकीटवाटपात ९ जागा मिळाल्या होत्या. त्यावरून त्या नाराज होत्या. त्यांनी निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती; परंतु, काँग्रेस नेतृत्वाने त्याची परवानगी दिली नाही. गुरुवारी जनतेला सात हमी देणारा काँग्रेसचा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध झाला. त्या कार्यक्रमालाही शैलजा अनुपस्थित होत्या.

हरयाणात मागासवर्गीय मतदार काँग्रेसच्या बाजूने आहेत, याची भाजपला जाणीव आहे. लोकसभा निवडणुकीतही राज्यघटनेच्या मुद्द्यावर मागासवर्गीयांनी ‘इंडिया’ आघाडीवरच विश्वास टाकला होता. आता भाजपचा मागासवर्गीयांच्या मतांवर डोळा आहे; आणि भाजप नेते आक्रमकतेने कुमारी शैलजा यांचा मुद्दा उचलून धरत आहेत. एका मागासवर्गीय नेत्याला काँग्रेस मुख्यमंत्री का बनवू शकत नाही, असा प्रचार भाजप करीत आहे. अशा परिस्थितीत सर्वांच्या नजरा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आगामी प्रचारसभांकडे लागल्या आहेत. त्यात नेत्यांना एकजुटीचा संदेश द्यावा लागणार आहे. त्यात काही कमतरता राहिली तर मात्र काँग्रेसला मागासवर्गीयांच्या मतांचा फटका बसू शकतो.

टॅग्स :congressकाँग्रेस