शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

'या' राज्यात स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत न लढताच भाजपानं ७० टक्के जागा जिंकल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2024 08:38 IST

भाजपानं १८८ जागांवर उमेदवार उतरवले आहेत. तर सीपीआय १४८ आणि काँग्रेसनं ९८ जागांवर उमेदवार उभे केले आहेत.

नवी दिल्ली - त्रिपुरामध्ये सत्ताधारी भाजपानं राज्यातील त्रिस्तरीय पंचायत व्यवस्थेत जवळपास ७० टक्के जागा बिनविरोध जिंकल्या आहेत. पंचायत प्रणालीत एकूण ६८८९ जागा आहेत. ज्यात ग्राम पंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांचा समावेश आहे. या जागांपैकी भाजपानं ४८०५ जागा बिनविरोध जिंकल्या आहेत. ग्रामपंचायतीत भाजपानं ६३७० पैकी ४५५० जागांवर बिनविरोध विजय मिळवला आहे त्यामुळे ७१ टक्के जागांवर कुठलंही मतदान होणार नाही.

राज्य निवडणूक आयोगाचे सचिव असित कुमार दास यांनी म्हटलं की, ज्या १८१९ ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार आहे. त्यात भाजपानं १८०९, सीपीआय(एम) १२२२ आणि काँग्रेसनं ७१३ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. पश्चिम त्रिपुरा जिल्ह्यातील महेशखला पंचायतीच्या एका जागेवर निवडणूक होणार नाही जिथं भाजपाच्या उमेदवाराचं निधन झालं आहे. पंचायत समितीत भाजपानं एकूण ४२३ जागांपैकी २३५ म्हणजे ५५ टक्के बिनविरोध जिंकल्या आहेत. आता १८८ जागांसाठी मतदान होणार आहे.

तसेच भाजपानं १८८ जागांवर उमेदवार उतरवले आहेत. तर सीपीआय १४८ आणि काँग्रेसनं ९८ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. भाजपानं ११६ जिल्हा परिषदेच्या जागांमध्ये २० जागांवर बिनविरोध विजय मिळवला आहे. भाजपानं सर्व ९६ जिल्हा परिषद जागांवर उमेदवार उतरवले आहे तर सीपीआयनं ८१ आणि काँग्रेसनं ७६ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. उमेदवारी अर्ज परत घेण्याची अखेरची तारीख २२ जुलै होती. याठिकाणी ८ ऑगस्टला मतदान पार पडणार आहे. तर मतमोजणी १२ ऑगस्टला होईल. मागील निवडणुकीत भाजपानं त्रिस्तरीय पंचायत प्रणालीतत ९६ टक्के जागांवर बिनविरोध विजय मिळवला होता. 

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेस