शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
4
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
5
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
6
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
7
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
8
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
9
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
10
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
11
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
12
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
13
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
14
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
15
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
16
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
17
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
18
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
19
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
20
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या

'या' राज्यात स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत न लढताच भाजपानं ७० टक्के जागा जिंकल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2024 08:38 IST

भाजपानं १८८ जागांवर उमेदवार उतरवले आहेत. तर सीपीआय १४८ आणि काँग्रेसनं ९८ जागांवर उमेदवार उभे केले आहेत.

नवी दिल्ली - त्रिपुरामध्ये सत्ताधारी भाजपानं राज्यातील त्रिस्तरीय पंचायत व्यवस्थेत जवळपास ७० टक्के जागा बिनविरोध जिंकल्या आहेत. पंचायत प्रणालीत एकूण ६८८९ जागा आहेत. ज्यात ग्राम पंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांचा समावेश आहे. या जागांपैकी भाजपानं ४८०५ जागा बिनविरोध जिंकल्या आहेत. ग्रामपंचायतीत भाजपानं ६३७० पैकी ४५५० जागांवर बिनविरोध विजय मिळवला आहे त्यामुळे ७१ टक्के जागांवर कुठलंही मतदान होणार नाही.

राज्य निवडणूक आयोगाचे सचिव असित कुमार दास यांनी म्हटलं की, ज्या १८१९ ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार आहे. त्यात भाजपानं १८०९, सीपीआय(एम) १२२२ आणि काँग्रेसनं ७१३ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. पश्चिम त्रिपुरा जिल्ह्यातील महेशखला पंचायतीच्या एका जागेवर निवडणूक होणार नाही जिथं भाजपाच्या उमेदवाराचं निधन झालं आहे. पंचायत समितीत भाजपानं एकूण ४२३ जागांपैकी २३५ म्हणजे ५५ टक्के बिनविरोध जिंकल्या आहेत. आता १८८ जागांसाठी मतदान होणार आहे.

तसेच भाजपानं १८८ जागांवर उमेदवार उतरवले आहेत. तर सीपीआय १४८ आणि काँग्रेसनं ९८ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. भाजपानं ११६ जिल्हा परिषदेच्या जागांमध्ये २० जागांवर बिनविरोध विजय मिळवला आहे. भाजपानं सर्व ९६ जिल्हा परिषद जागांवर उमेदवार उतरवले आहे तर सीपीआयनं ८१ आणि काँग्रेसनं ७६ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. उमेदवारी अर्ज परत घेण्याची अखेरची तारीख २२ जुलै होती. याठिकाणी ८ ऑगस्टला मतदान पार पडणार आहे. तर मतमोजणी १२ ऑगस्टला होईल. मागील निवडणुकीत भाजपानं त्रिस्तरीय पंचायत प्रणालीतत ९६ टक्के जागांवर बिनविरोध विजय मिळवला होता. 

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेस