शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

हरियाणातील ‘जिंद’ जिंकल्याने भाजपा जोरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 06:34 IST

अंतर्गत वाद सोडविण्यात काँग्रेस मग्न; सुरजेवालांमुळे ज्येष्ठ कार्यकर्ते नाराज

- सुहास शेलारऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय प्रतिष्ठेचा विषय बनलेल्या जिंद विधानसभा पोटनिवडणुकीत मिळालेल्या विजयामुळे भाजपा कार्यकर्त्यांत पुन्हा उत्साह निर्माण झाला. हाच उत्साह लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपर्यंत टिकवून ठेवण्यासाठी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर प्रयत्नशील आहेत. तर दुसरीकडे प्रतिस्पर्धी काँग्रेस मात्र अंतर्गत वादविवाद सोडविण्यात मग्न आहे.तीन राज्यांतील पराभवानंतर भाजपाच्या हरियाणा गडालाही सुरूंग लावण्याचा मनसुबा राहुल गांधी यांनी आखला. त्यासाठीची पूर्वतयारी म्हणून जिंद पोटनिवडणुकीची निवड केली. राष्ट्रीय प्रवक्ते रणजीत सुरजेवाला यांना तेथून आखाड्यात उतरवले. ते मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, अशी अपेक्षा होती. मात्र, अपेक्षाभंगच झाला. सुरजेवाला यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. जाटांचा प्रभाव असलेल्या या मतदारसंघात पहिल्यांदाच कमळ खुलले. त्यामुळे भाजपाच्या गडाच्या शिळा निखळण्याऐवजी घट्ट झाल्या.ज्येष्ठ नेत्यांना डावलून सुरजेवाला यांना उमेदवारी दिल्याने स्थानिक काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी बंड केले. ‘हरियाणातील काही नेत्यांनी अप्रत्यक्षरित्या माझ्या विरोधात प्रचार करण्याची सूचना कार्यकर्त्यांना दिली’, असा आरोप थेट आरोप पत्रकार परिषदेतून करत सुरजेवाला यांनी स्थानिक नेत्यांना आपल्या पराभवास जबाबदार धरले. शिवाय पक्षश्रेष्ठी या पराभवाची मीमांसा करून अंतर्गत बंडखोरांना जागा दाखवतील, अशी तंबीही त्यांनी या वेळी दिली. त्यामुळे सुरजेवाला राहुल गांधींचे कान भरतात, अशी भावना मनात ठेवून तेथील ज्येष्ठ नेते सध्या वावरत आहेत. त्यामुळे जेथे भाजपाच्या प्रचाराला उभारी मिळाली आहे, तेथे काँग्रेस कार्यकर्त्यांत मात्र निरुत्साह आहे.तुल्यबळ प्रतिस्पर्धी नाहीच.हरियाणात काँग्रेसच्या प्रचाराला जरी गती मिळत नसली, तरी इंडियन नॅशनल लोकदल (इनेलो)ने मात्र जोरदार प्रचाराला सुरूवात केली आहे. हांसी येथील इनेलोच्या रॅलीला मिळालेला प्रतिसाद पाहता भाजपाला त्यांच्याकडून कडवी टक्कर मिळण्याची शक्यता आहे.मात्र, ऐन निवडणुकीच्या तोंडावर चार आमदार आणि अनेक वरिष्ठ नेत्यांनी इनेलोला रामराम ठोकत जननायक जनता पार्टीत प्रवेश केल्याने त्यांना मोठा हादरा बसला आहे. दुसरीकडे जननायक जनता पार्टी या नवोदीत पक्षाने जिंदच्या पोटनिवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवून सगळ््यांनाच आश्चर्यचकीत केले होते. त्यावेळेस ‘आप’ने त्यांना पाठिंबा दिला होता. मात्र, आता आप स्वबळावर लढण्याची तयारी करीत आहे. त्यामुळे भाजपाचा रथ रोखण्यासाठी त्यांनी मोठी घोडदौड करावी लागणार आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मात्र, सर्वसामान्य मतदारांना खूष करण्यासाठी अनेक घोषणा करण्यात आल्या. त्यांना मतदार भुलतील का? हे निकालानंतरच कळेल.भाजपा देणार आयारामांना संधी?मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचे माध्यम सल्लागार राजीव जैन यांनी एका कार्यक्रमादरम्यान पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटले होते की, ‘हरियाणात भाजपाला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता सर्वेक्षणांनी वर्तविली आहे. जिंद पोटनिवडणुकीच्या विजयानंतर विरोधी पक्षातील अनेक नेत्यांना भाजपाच्या विजयाचा अंदाज आल्याने ते भाजपात येऊ इच्छित आहेत. त्यामुळे निवडणूक जाहीर झाल्यानंतर विरोधी पक्षातील अनेक ज्येष्ठ नेते भाजपात दिसल्यास नवल वाटायला नको.’

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९BJPभाजपाHaryanaहरयाणाcongressकाँग्रेस