शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

हरियाणातील ‘जिंद’ जिंकल्याने भाजपा जोरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 06:34 IST

अंतर्गत वाद सोडविण्यात काँग्रेस मग्न; सुरजेवालांमुळे ज्येष्ठ कार्यकर्ते नाराज

- सुहास शेलारऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय प्रतिष्ठेचा विषय बनलेल्या जिंद विधानसभा पोटनिवडणुकीत मिळालेल्या विजयामुळे भाजपा कार्यकर्त्यांत पुन्हा उत्साह निर्माण झाला. हाच उत्साह लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपर्यंत टिकवून ठेवण्यासाठी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर प्रयत्नशील आहेत. तर दुसरीकडे प्रतिस्पर्धी काँग्रेस मात्र अंतर्गत वादविवाद सोडविण्यात मग्न आहे.तीन राज्यांतील पराभवानंतर भाजपाच्या हरियाणा गडालाही सुरूंग लावण्याचा मनसुबा राहुल गांधी यांनी आखला. त्यासाठीची पूर्वतयारी म्हणून जिंद पोटनिवडणुकीची निवड केली. राष्ट्रीय प्रवक्ते रणजीत सुरजेवाला यांना तेथून आखाड्यात उतरवले. ते मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, अशी अपेक्षा होती. मात्र, अपेक्षाभंगच झाला. सुरजेवाला यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. जाटांचा प्रभाव असलेल्या या मतदारसंघात पहिल्यांदाच कमळ खुलले. त्यामुळे भाजपाच्या गडाच्या शिळा निखळण्याऐवजी घट्ट झाल्या.ज्येष्ठ नेत्यांना डावलून सुरजेवाला यांना उमेदवारी दिल्याने स्थानिक काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी बंड केले. ‘हरियाणातील काही नेत्यांनी अप्रत्यक्षरित्या माझ्या विरोधात प्रचार करण्याची सूचना कार्यकर्त्यांना दिली’, असा आरोप थेट आरोप पत्रकार परिषदेतून करत सुरजेवाला यांनी स्थानिक नेत्यांना आपल्या पराभवास जबाबदार धरले. शिवाय पक्षश्रेष्ठी या पराभवाची मीमांसा करून अंतर्गत बंडखोरांना जागा दाखवतील, अशी तंबीही त्यांनी या वेळी दिली. त्यामुळे सुरजेवाला राहुल गांधींचे कान भरतात, अशी भावना मनात ठेवून तेथील ज्येष्ठ नेते सध्या वावरत आहेत. त्यामुळे जेथे भाजपाच्या प्रचाराला उभारी मिळाली आहे, तेथे काँग्रेस कार्यकर्त्यांत मात्र निरुत्साह आहे.तुल्यबळ प्रतिस्पर्धी नाहीच.हरियाणात काँग्रेसच्या प्रचाराला जरी गती मिळत नसली, तरी इंडियन नॅशनल लोकदल (इनेलो)ने मात्र जोरदार प्रचाराला सुरूवात केली आहे. हांसी येथील इनेलोच्या रॅलीला मिळालेला प्रतिसाद पाहता भाजपाला त्यांच्याकडून कडवी टक्कर मिळण्याची शक्यता आहे.मात्र, ऐन निवडणुकीच्या तोंडावर चार आमदार आणि अनेक वरिष्ठ नेत्यांनी इनेलोला रामराम ठोकत जननायक जनता पार्टीत प्रवेश केल्याने त्यांना मोठा हादरा बसला आहे. दुसरीकडे जननायक जनता पार्टी या नवोदीत पक्षाने जिंदच्या पोटनिवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवून सगळ््यांनाच आश्चर्यचकीत केले होते. त्यावेळेस ‘आप’ने त्यांना पाठिंबा दिला होता. मात्र, आता आप स्वबळावर लढण्याची तयारी करीत आहे. त्यामुळे भाजपाचा रथ रोखण्यासाठी त्यांनी मोठी घोडदौड करावी लागणार आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मात्र, सर्वसामान्य मतदारांना खूष करण्यासाठी अनेक घोषणा करण्यात आल्या. त्यांना मतदार भुलतील का? हे निकालानंतरच कळेल.भाजपा देणार आयारामांना संधी?मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचे माध्यम सल्लागार राजीव जैन यांनी एका कार्यक्रमादरम्यान पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटले होते की, ‘हरियाणात भाजपाला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता सर्वेक्षणांनी वर्तविली आहे. जिंद पोटनिवडणुकीच्या विजयानंतर विरोधी पक्षातील अनेक नेत्यांना भाजपाच्या विजयाचा अंदाज आल्याने ते भाजपात येऊ इच्छित आहेत. त्यामुळे निवडणूक जाहीर झाल्यानंतर विरोधी पक्षातील अनेक ज्येष्ठ नेते भाजपात दिसल्यास नवल वाटायला नको.’

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९BJPभाजपाHaryanaहरयाणाcongressकाँग्रेस