शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2024 15:32 IST

जामीनावर बाहेर आलेल्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

Arvind Kejriwal : दिल्लीतील कथित मद्य घोटाळा प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सुप्रीम कोर्टानं जामीन दिला आहे. सुप्रीम कोर्टानं केजरीवाल यांना १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. तब्बल ५० दिवसांनी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेत मी तुमच्यात परतल्याने खूप आनंदी आहे असं म्हटलं. आपण सर्वांनी मिळून आपल्या देशाला हुकूमशाहीपासून वाचवायचे आहे,असं केजरीवाल यांनी म्हटलं. यासोबत केजरीवाल यांनी उद्धव ठाकरेंबाबतही मोठं वक्तव्य केलं आहे. भाजपाचा विजय झाला तर उद्धव ठाकरेसंह इतर नेते तुरुंगात जातील, असा गंभीर दावा अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.

तिहार तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या पक्ष कार्यालयात जाऊन पहिलं निवडणुकीतील भाषण केलं. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.भाजपाने एका वर्षात आम आदमी पक्षाचे चार मोठे नेते तुरुंगात टाकले. पंतप्रधान मोदींनी आपला पूर्ण नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केला, असं म्हणत केजरीवाल यांनी मोदींवर निशाणा साधला. केजरीवाल यांनी आपल्या २१ मिनिटांच्या भाषणात महाराष्ट्राच्या राजकारवही भाष्य केलं.

"पंतप्रधान मोदी हे एक राष्ट्र, एक नेता मोहीम सध्या राबवत आहेत. त्यामुळे त्यांनी मला तुरुंगात टाकून त्यांनी देशातील सर्व विरोधकांना याचा संदेश दिला आहे. जर हेमंत सोरेन आणि अरविंद केजरीवाल यांना आम्ही तुरुंगात टाकू शकतो, तर ४ जून रोजी सत्ता आली तर देशातील कोणत्याही नेत्याला आम्ही तुरुंगात टाकू शकतो. जर ते पुन्हा जिंकले तर ममता बॅनर्जी, एमके स्टॅलिन, तेजस्वी यादव, पिनाराई विजयन, उद्धव ठाकरे आणि इतर विरोधी नेते तुरुंगात जातील," असा आरोप केजरीवालांनी केला.

"मला तुरुंगात टाकून मोदी म्हणतात की, ते भ्रष्टाचाराच्या विरोधात लढत आहेत. पण त्यांनी स्वतःच्या पक्षातच देशातील सर्वात मोठ्या भ्रष्टाचाऱ्यांना, चोरांना आश्रय दिलाय. ज्यांच्यावर १० दिवसांपूर्वी ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप केला, त्यांनाच पक्षात घेऊन उपमुख्यमंत्रीपद दिलं आणि म्हणतायत भ्रष्टाचाराच्या विरोधात लढत आहे. भ्रष्टाचाराच्या विरोधात लढाई लढायची असेल तर मोदींनी केजरीवालांकडून शिका," असेही केजरीवाल म्हणाले. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Arvind Kejriwalअरविंद केजरीवालUddhav Thackerayउद्धव ठाकरेmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४