शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचे कमबॅक! त्रिपुरातील निवडणुकीत ३३४ पैकी ११२ ठिकाणी बिनविरोध विजय; २२२ जागांवर मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2021 19:38 IST

उर्वरीत २२२ जागांसाठी एकूण ७८५ उमेदवार मैदानात असून, यासाठी २५ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.

आगरतळा: देशभरात अलीकडेच लोकसभा आणि काही विधानसभांच्या रिक्त झालेल्या जागांसाठी पोटनिवडणुका झाल्या. यामध्ये भाजपला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, दुसरीकडे त्रिपुरामध्ये होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपने पराभवाचा वचपा काढल्याचे सांगितले जात आहे. त्रिपुरामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपाने एकूण ३३४ पैकी ११२ जागांवर बिनविरोध विजय मिळवला. 

निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार उमेवदारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता आणि पडताळणीची तारीख ५ नोव्हेंबर निश्चित करण्यात आली होती. उर्वरीत २२२ जागांसाठी एकूण ७८५ उमेदवार मैदानात असून, यासाठी २५ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. 

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकूण ३३४ जागा 

विरोधी पक्ष माकपाचे १५, तृणमूल काँग्रेसचे ४, काँग्रेस ८, एफआयएफबी दोन आणि सात अपक्ष उमेदवारांसह ३६ उमेदवारांनी सोमवारी आपली उमेदवारी मागे घेतली होती, असे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले. राज्यभरात अगरताळा नगरपालिकेतील ५१ वॉर्ड, १३ नगरपरिषदा आणि ६ नगर पंचयातींसह शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकूण ३३४ जागा आहेत.

भाजपने उमेदवारांना उमेदवारी मागे घ्यायल भाग पाडले

भाजपद्वारे आश्रय देण्यात आलेल्या गुंडांकडून निर्माण केल्या जात असलेल्या दहशतीमुळे त्यांच्या उमेदवारांना आपली उमेदवारी मागे घ्यायल भाग पाडले गेले, असा आरोप माकपाचे राज्य सचिव जितेंद्र चौधरी यांनी केला. राज्यात हिंसाचार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक कार्यक्रमाच्या घोषणेच्या बऱ्याच अगोदर सुरू झाली होती. आमच्या अनेक कार्यकर्त्यांवर हल्ला करण्यात आला व पाच नगरपरिषदा आणि दोन नगर पंचायतीमध्ये आमचे उमेदवार आपले अर्ज दाखल करू नाही शकले. भाजपच्या गुंडांना मोठी दहशत पसरवली आहे, असा दावाही त्यांनी केला आहे. दरम्यान, सात स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये अंबासा नगर परिषद, जिरानिया नगर पंचायत, मोहनपुर नगरपरिषद, राणीबाजार नगर परिषद, विशालगड नगरपरिषद, उदयपूर नगरपरिषद आणि संतरिबाजार नगरपरिषदेत कोणताही अपक्ष उमेदवार नाही. 

टॅग्स :Tripuraत्रिपुराBJPभाजपा