शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

भाजपचे कमबॅक! त्रिपुरातील निवडणुकीत ३३४ पैकी ११२ ठिकाणी बिनविरोध विजय; २२२ जागांवर मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2021 19:38 IST

उर्वरीत २२२ जागांसाठी एकूण ७८५ उमेदवार मैदानात असून, यासाठी २५ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.

आगरतळा: देशभरात अलीकडेच लोकसभा आणि काही विधानसभांच्या रिक्त झालेल्या जागांसाठी पोटनिवडणुका झाल्या. यामध्ये भाजपला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, दुसरीकडे त्रिपुरामध्ये होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपने पराभवाचा वचपा काढल्याचे सांगितले जात आहे. त्रिपुरामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपाने एकूण ३३४ पैकी ११२ जागांवर बिनविरोध विजय मिळवला. 

निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार उमेवदारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता आणि पडताळणीची तारीख ५ नोव्हेंबर निश्चित करण्यात आली होती. उर्वरीत २२२ जागांसाठी एकूण ७८५ उमेदवार मैदानात असून, यासाठी २५ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. 

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकूण ३३४ जागा 

विरोधी पक्ष माकपाचे १५, तृणमूल काँग्रेसचे ४, काँग्रेस ८, एफआयएफबी दोन आणि सात अपक्ष उमेदवारांसह ३६ उमेदवारांनी सोमवारी आपली उमेदवारी मागे घेतली होती, असे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले. राज्यभरात अगरताळा नगरपालिकेतील ५१ वॉर्ड, १३ नगरपरिषदा आणि ६ नगर पंचयातींसह शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकूण ३३४ जागा आहेत.

भाजपने उमेदवारांना उमेदवारी मागे घ्यायल भाग पाडले

भाजपद्वारे आश्रय देण्यात आलेल्या गुंडांकडून निर्माण केल्या जात असलेल्या दहशतीमुळे त्यांच्या उमेदवारांना आपली उमेदवारी मागे घ्यायल भाग पाडले गेले, असा आरोप माकपाचे राज्य सचिव जितेंद्र चौधरी यांनी केला. राज्यात हिंसाचार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक कार्यक्रमाच्या घोषणेच्या बऱ्याच अगोदर सुरू झाली होती. आमच्या अनेक कार्यकर्त्यांवर हल्ला करण्यात आला व पाच नगरपरिषदा आणि दोन नगर पंचायतीमध्ये आमचे उमेदवार आपले अर्ज दाखल करू नाही शकले. भाजपच्या गुंडांना मोठी दहशत पसरवली आहे, असा दावाही त्यांनी केला आहे. दरम्यान, सात स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये अंबासा नगर परिषद, जिरानिया नगर पंचायत, मोहनपुर नगरपरिषद, राणीबाजार नगर परिषद, विशालगड नगरपरिषद, उदयपूर नगरपरिषद आणि संतरिबाजार नगरपरिषदेत कोणताही अपक्ष उमेदवार नाही. 

टॅग्स :Tripuraत्रिपुराBJPभाजपा